मुख्य सामग्रीवर वगळा

निसर्ग,आयुष्य अन् गणितं..!

निसर्ग,आयुष्य अन् गणितं..!


आयुष्याचं गणित जुळवायचं म्हणजे वेळेची गणितं वेळेतच सुटायला हवी.नाहीतर ; आयुष्यभर आयुष्याचं गणित जुळत नाही मग वेळेची अन् आयुष्याची होणारी वेळोवेळी होणारी फरफट ठरलेली असते..!

असंच काहीसं आयुष्यात आलेल्या माणसांच्या बाबतीत आहे.आयुष्यात आलेली काही माणसं वेळीच सोडचिठ्ठी देऊन देऊन सोडता आली पाहिजे अन् ;काही आयुष्यभर आपल्या सोबत हवी म्हणून त्यांना जपता आली पाहिजे.आयुष्यात ही गणितं जमली की मग पुढील आयुष्य सहज,सुखकर होवून जातं..!

हल्ली लिहायला फारसं मन धजावत नाही पण आभाळ दाटून यावं तसं सध्याच्या आयुष्यात मळभ दाटून येतं अन् मग त्यापासून मोकळीक म्हणून काही दोन-चार दिवसांनी या दोन-चार ओळी लिहण्याचा मनाचा अट्टहास असतो.जो पूर्णत्वाला नाही गेला की,राहून राहून दिवसभर काहीतरी चुकत असल्याचे भास होत राहतात. अन् सोप्पं असलेलं आयुष्य मग मला गुंतागुंतीचं वाटायला लागतं..!

मग ते लिहणं विचारांनी पोजिटीव्ह असो वा निगेटीव्ह ते असं लिहून टाकायला हवं आहे.कोण वाचल,कोण काय म्हणेल,कोणाला कसे वाटेल हा विचार अश्यावेळी माझ्या मनात येत नाही.बरेच दिवस हे पाळत असल्यानं सवयीचं झालेलं आहे..!

हल्ली पहाटेची सुरुवात डोंगर,दऱ्या,खोऱ्यात तर कधी मैदानावर होते.त्यामुळे निसर्गाला घेऊन हळवं होत असलेलं माझं मन फारवेळ मी कसा निसर्गाचा होवून राहील,निसर्गाच्या समीप राहील याचा विचार करत असतं.
पहाटेची भटकंती तिकडे होतेच पण कधीतरी सायंकाळी मनावर एकाकीपणाचे मळभ दाटून आले की मी माणसांच्या सहवासाला टाळत टाळत मला निसर्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा जवळ करू लागतो..!

एरवी असंही मी माणसांचा असून माणसांचा राहिलेलो नाही अशी जाणीव मला प्रकर्षाने होते.मित्र बोलत राहता मी ऐकत राहतो पण माझे विचार हे तुलना करत राहते की निसर्गाचा सहवास माणसांच्या सहवासापेक्षा कितीपट चांगला आहे.

कारण एकच असते,मनाला हवा असणारा एकांत तासंतास डोळ्यांना विस्फारून विस्मयचकित होऊन डोळ्यासमोरचा निसर्ग डोळ्यात कैद करत रहायचं,हातात काही येत नाही.

निसर्गाचं गणितच असं आहे की तुमच्या हातात काही येत नाही एकदा निसर्गाला घेऊन अनुभवण्याचा क्षण निघून गेला की तो पुन्हा नाही.त्यामुळं असा कुठला क्षण सुटायला नको म्हणून ही ओढ आहे..!

काही घटकाभर निसर्गाच्या सान्निध्यात राहून परतीच्या वाटेला लागले की माणसाने उभ्या केलेल्या वास्तू खुणावू लागतात,अनोळखी माणसे ओळखीची वाटू लागतात.मग अनेक प्रश्न पडू लागतात ज्यांना माझे मन उत्तरे शोधू लागते..!

बाकी मागे खूप काही सुटून गेलं आहे.बरीच जी नको  वाचायला वाटतात अशी पुस्तकं वाचण्यावाचून टेबलवर पडून आहे.आवडते काहीतरी वाचायला हवं आहे पण पुस्तकांचा साठा माझ्या मुर्खासारखे वाचत राहण्याच्या सवयीमुळे संपला आहे.हल्ली लिखाणाच्या भुकेपेक्षा मला वाचनाची भूक खूप आहे.

बरंच अधुरे लेखन पूर्णत्वाची वाट बघत आहे पण दिलेल्या पूर्णविरामनंतर मनात खूप काही लिहायला असूनही हात लिहायला धजावत नाहीये.त्यामुळं कसं सगळं थांबलं आहे..!

हल्ली पाऊस ओळखीचा झाला आहे,अधूनमधून तो येऊन जातो त्यामुळं मनावर दाटलेलं मळभ काही अंशी का होईना दूर होतं.अजुन भिजणं झालं नाही पाऊसात,तशी वेळ येऊन गेली पण मी टाळत राहिलो.पाऊसापासून घटकाभरचा विसावा म्हणून निसर्गात हरवलेल्या माझ्या निवाऱ्याला शोधत राहिलो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...