मुख्य सामग्रीवर वगळा

निसर्ग,आयुष्य अन् गणितं..!

निसर्ग,आयुष्य अन् गणितं..!


आयुष्याचं गणित जुळवायचं म्हणजे वेळेची गणितं वेळेतच सुटायला हवी.नाहीतर ; आयुष्यभर आयुष्याचं गणित जुळत नाही मग वेळेची अन् आयुष्याची होणारी वेळोवेळी होणारी फरफट ठरलेली असते..!

असंच काहीसं आयुष्यात आलेल्या माणसांच्या बाबतीत आहे.आयुष्यात आलेली काही माणसं वेळीच सोडचिठ्ठी देऊन देऊन सोडता आली पाहिजे अन् ;काही आयुष्यभर आपल्या सोबत हवी म्हणून त्यांना जपता आली पाहिजे.आयुष्यात ही गणितं जमली की मग पुढील आयुष्य सहज,सुखकर होवून जातं..!

हल्ली लिहायला फारसं मन धजावत नाही पण आभाळ दाटून यावं तसं सध्याच्या आयुष्यात मळभ दाटून येतं अन् मग त्यापासून मोकळीक म्हणून काही दोन-चार दिवसांनी या दोन-चार ओळी लिहण्याचा मनाचा अट्टहास असतो.जो पूर्णत्वाला नाही गेला की,राहून राहून दिवसभर काहीतरी चुकत असल्याचे भास होत राहतात. अन् सोप्पं असलेलं आयुष्य मग मला गुंतागुंतीचं वाटायला लागतं..!

मग ते लिहणं विचारांनी पोजिटीव्ह असो वा निगेटीव्ह ते असं लिहून टाकायला हवं आहे.कोण वाचल,कोण काय म्हणेल,कोणाला कसे वाटेल हा विचार अश्यावेळी माझ्या मनात येत नाही.बरेच दिवस हे पाळत असल्यानं सवयीचं झालेलं आहे..!

हल्ली पहाटेची सुरुवात डोंगर,दऱ्या,खोऱ्यात तर कधी मैदानावर होते.त्यामुळे निसर्गाला घेऊन हळवं होत असलेलं माझं मन फारवेळ मी कसा निसर्गाचा होवून राहील,निसर्गाच्या समीप राहील याचा विचार करत असतं.
पहाटेची भटकंती तिकडे होतेच पण कधीतरी सायंकाळी मनावर एकाकीपणाचे मळभ दाटून आले की मी माणसांच्या सहवासाला टाळत टाळत मला निसर्गाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा जवळ करू लागतो..!

एरवी असंही मी माणसांचा असून माणसांचा राहिलेलो नाही अशी जाणीव मला प्रकर्षाने होते.मित्र बोलत राहता मी ऐकत राहतो पण माझे विचार हे तुलना करत राहते की निसर्गाचा सहवास माणसांच्या सहवासापेक्षा कितीपट चांगला आहे.

कारण एकच असते,मनाला हवा असणारा एकांत तासंतास डोळ्यांना विस्फारून विस्मयचकित होऊन डोळ्यासमोरचा निसर्ग डोळ्यात कैद करत रहायचं,हातात काही येत नाही.

निसर्गाचं गणितच असं आहे की तुमच्या हातात काही येत नाही एकदा निसर्गाला घेऊन अनुभवण्याचा क्षण निघून गेला की तो पुन्हा नाही.त्यामुळं असा कुठला क्षण सुटायला नको म्हणून ही ओढ आहे..!

काही घटकाभर निसर्गाच्या सान्निध्यात राहून परतीच्या वाटेला लागले की माणसाने उभ्या केलेल्या वास्तू खुणावू लागतात,अनोळखी माणसे ओळखीची वाटू लागतात.मग अनेक प्रश्न पडू लागतात ज्यांना माझे मन उत्तरे शोधू लागते..!

बाकी मागे खूप काही सुटून गेलं आहे.बरीच जी नको  वाचायला वाटतात अशी पुस्तकं वाचण्यावाचून टेबलवर पडून आहे.आवडते काहीतरी वाचायला हवं आहे पण पुस्तकांचा साठा माझ्या मुर्खासारखे वाचत राहण्याच्या सवयीमुळे संपला आहे.हल्ली लिखाणाच्या भुकेपेक्षा मला वाचनाची भूक खूप आहे.

बरंच अधुरे लेखन पूर्णत्वाची वाट बघत आहे पण दिलेल्या पूर्णविरामनंतर मनात खूप काही लिहायला असूनही हात लिहायला धजावत नाहीये.त्यामुळं कसं सगळं थांबलं आहे..!

हल्ली पाऊस ओळखीचा झाला आहे,अधूनमधून तो येऊन जातो त्यामुळं मनावर दाटलेलं मळभ काही अंशी का होईना दूर होतं.अजुन भिजणं झालं नाही पाऊसात,तशी वेळ येऊन गेली पण मी टाळत राहिलो.पाऊसापासून घटकाभरचा विसावा म्हणून निसर्गात हरवलेल्या माझ्या निवाऱ्याला शोधत राहिलो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड