मुख्य सामग्रीवर वगळा

उन्हाच्या झळा..!

उन्हाच्या झळा..!

सकाळ सरून दुपार येते,सूर्य आकाशाच्या मध्यावर येतो अन् मग आपसूक पावलं त्या वाटेला लागतात,जिथं माणसाच्या अस्तीत्वाच्या पुसट खुणा आजही जपून ठेवल्या जात आहे.
मानवाचे अस्तित्व म्हणजे आता अस्तित्व नाही का..?

तर अस्तित्व आहे पण काही शतके वर्षांपूर्वी माणूस ज्या अवस्थेत होता ते अस्तित्व आता समुळपने नष्ट झालं आहे बऱ्यापैकी,मग या अश्या त्या नष्ट झालेल्या काळाच्या काही पुसट खुणा दिसल्या की त्याबद्दल जाणून घेण्याच्या ओढीने नकळत ती तांड्या,वस्तीला जाणारी वाट धरली जाते...
जिथं हाती काही लागणारं नाही पण माणूस म्हणून आजवर जगत असल्येल्या,त्या एका समाजाशी नव्याने आपली ओळख होते.जिने आपल्याला आपल्या देशाची पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचे दर्शन घडवले....

उन्हाच्या काहिलीत,लाल मातीच्या फुफाट्यात पावलं तांड्याची वाट जवळ करत असतात.वाळून गेलेलं तन,अधूनमधून रस्त्याने झुकलेल्या बोडक्या बाभळी ज्या उन्हाच्या या ताफ्यात वाळून गेल्या अन् काट्यानिशी झडू लागल्या.उन्हाच्या झळांनी बोडक्या बाभळीला लगडलेली पिवळी धम्मक फुलं भर रस्त्यावर सडा पडल्यागत चहूकडे उडत आहे,आसमंतात कोऱ्यालख्ख उन्हाचा टोचणारा,बोचणारा स्पर्श,वाढलेल्या केसांच्या डोक्यातून घरंगळत येणारा घामाचा थेंब अन् रूतणारा पायाला मुरमाड जमिनीतला खडा,तरिही पावलं चालत रहातात....

दूरवर कुडाची,लाल मातीची शेणानं लिपलेली घरं दिसु लागतात अन्  काळजात तिथे वास्तव्यास असणाऱ्या लोकांना जाणुन घेण्यासाठी घरघर सुरू होते....
गल्ली,बोळात उडणारा उन्हाच्या झळाईतला पालापाचोळा,गव्हाचा निवडुन उरलेला कांडा नालीत टाकुण दिल्यानं तो ओला होवुन डोक्याला भंणभंण करायला लावणारा आंबट वास,त्याच्यात भर म्हणून की काय कुरडईसाठी ओला दळून चिक काढुन ठेवलेल्या कोंड्याचा वास,त्यावर घोंगावणार्या माश्या....

तांड्याच्या वस्तीला आलं की या दिवसात या सर्व गोष्टींची सवय करून घ्यावी लागते,कारण उन्हाळी हंगाम म्हणजे हीच कामं सुरू झालेली असतात,मुळात गावात टोळीला घेऊन ऊस तोडणीसाठी हिवाळ्यात जाणाऱ्या मजुरांची ही परतीची वेळ...

माणसांवाचून शांत झालेला तांडा पुन्हा एकदा माणसांच्या गलबलीत अन् त्यांच्या भाषेत होणाऱ्या संवादांनी जिवंत असल्याचा भास करून देतो. तांड्यात,वस्तीला,पाड्यात या दिवसांत मेहनतीची कामे संपलेली असतात अन् आराम करण्याचा मोसम सुरू झालेला असतो हो पण सोबतच हाताला काम असलं की मग ते करायचं,ते सोडायचं नाही.
कारण आज काम आहे उद्या नाही या तत्त्वावर जगणारी ही लोकं....

आज शहराला नोकरीसाठी नोकरी लागून सेटलही तितकीच झालेली अन् अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे कसोटीच्या संसाराला हातभार लावत आपली पूर्वापार चालत असणारी संस्कृती जपत जगणारी सुद्धा तितकीच ही लोकं आहेत.कितीही श्रीमंत झाला आपल्यातला माणूस तरीही,जमिनीवर राहून दर सणाला आपल्या माणसात सण साजरा करणारा हा समाज (खरंतर समाज ही संकल्पना मला मंजूर नाही,पण हे किती जणांना रूचेल हे कळायला पर्याय नाही.यावेळी इतकंच म्हणेल,आपल्या देशात पूर्वापार चालत असलेली संस्कृती तिचे जतन,जपवणूक करणारा हा एक समूह जो संपूर्ण देशभरात आढळतो.).

उन्हाळ्याचे दिवस काम नसल्यामुळे दुपारच्या या वेळेला कुणी झाडाखाली,कुणी ओट्यावर कुणी खाटीवर निजलेलं असते,कुणी दळण दळत आहे,कुणी धूनेभांडी करत आहे, कुणी काय,कुणी काय...
आपण फक्त बघत राहायचं,कारण शहराला राहून हे क्षण अनुभवता येत नाही ते इथे येऊन अनुभवयाला सुद्धा आपण तितकं पाईक असावं लागतं, नाहीतर आपल्याला हे उगाच नकोसे वाटणारे वाटेल....

Written by,
Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड