मुख्य सामग्रीवर वगळा

एक होता कार्व्हर..!


सध्याच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करु बघणारं "एक होता कार्व्हर" हे पुस्तक आहे....

वीणा गवाणकर लिखित एक होता कार्व्हर वाचलं अन्  सध्याच्या या वाईट परिस्थितीला मानव कीती कारणीभूत आहे हे कळुन चुकलं.मुळात पुस्तकाचा हा विषय नाही पण माझ्या नजरेतून जेव्हा मी हे पुस्तक वाचत आहे तेव्हा विचार करण्याच्या व्रृत्तीला हा काळ डोळ्यांच्या सामोरा येताना दिसला....

शतकाचा महानायक ठरवता येईल असा तो "कार्व्हर" त्याच्या संघर्षपूर्ण काळात महानायक ठरलाच पण त्यानंतर मात्र हे कसब क्वचित,हातावर मोजता येईल इतपत लोकांमध्ये दिसून आले म्हणून आजही कार्व्हर माझ्या दृष्टीने महानायक ठरतोय...

आज जगाच्या पाठीवर जो देश सत्ता गाजवतो तो महासत्ता असलेला देश अमेरिकेला तिथे असलेल्या निर्जीव दक्षिण प्रदेशाला अमरत्व देणारा महामानव म्हणजेच "कार्व्हर"
निष्काम कर्मयोगी हे पदवी ज्याच्या कर्तुत्वाशी जुळते असा तो  कार्व्हर...
"शून्यातून विश्व निर्माण करणे" हा वाकप्रचार  ज्याला लागू पडतो तो कार्व्हर ज्याच उभ आयुष्य जगण्यासाठी असलेला संघर्ष त्याचा प्रवास हा त्या वाईट काळातही मानवतावाद जपून ठेवण्यास कारणीभूत ठरला. त्यामुळेच मानवतावादावरचा विश्वास अजून घट्ट झाला अन् अमेरिका सारखा देश महासत्ता म्हणून उदयास आला...


अश्या या सामान्य पण विचारांच्या पलिकडेचे जीवन जगलेल्या कार्व्हर जगासमोर आणण्याच काम विणा गवाणकर यांनी मराठी भाषेत पुस्तक रुपात अवघ्या देशासमोर आणलं कार्व्हर यांच्या बद्दल जाणुन घ्यायला वाचायला जेव्हा आपल्याला इतकं सुंदर वाटतं तेव्हा विणा गवाणकर यांना कार्व्हर यांचे जीवन आपल्या शब्दात उत्रवणे ही भावना खूप सुखदायक आहे...


कार्व्हरांचं चरित्र आपल्याला बरंच काही शिकवून जातं. आजच्या आमच्या गोंधळलेल्या पिढीसाठी ते फक्त प्रेरणादायी नव्हे तर एक उत्तम मार्गदर्शक पण ठरु शकतात. ध्येय म्हणजे काय याचं उत्तर कार्व्हरांची जीवनगाथा वाचली कि उमगउमगत...

Written by,

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...