मुख्य सामग्रीवर वगळा

धोंड्याईचा गाव..!

धोंड्याईचा गाव..!


सुर्य सांजेकडे कलायला लागला तसं रानातल्या लोकांनी घराच्या वाटा धरल्या,जसजसा सुर्य अस्ताला जातो आहे तसतसा पायांचा वेग वाढत आहे.घराची लागलेली ओढ अन् घरी गेल्यावर कधी एकदा कोरा काळा चहा पिऊन पाठ घंटाभर ओसरीला लांब करू असे धोंड्याईला वाटत होतं...

उतरत्या वयात वावरातले बैठे काम आता तिला सहन होत नव्हते पण आले दिवस कसेतरी ढकलायचे अन् चालू शरीराला घास कुटका खाऊन तगते जगते ठेवायचं.
इतकचं काय धोंडाईच्या रोजच्या जगण्यातील दिनक्रम होता...

धोंडाईने रानाचा रस्ता मागं टाकला अन् गावच्या वाटाला धोंडाई लागली,डोक्यावर रस्त्यानं चालता-चालता जमा केलेल्या काटक्यांच पेंडक घेऊन धोंडाई त्याला सावरत चालली होती.
इतक्यात धोंडाईला समिणाबी आपा,अंजुम खाला अन् शांता आक्का भेटली,धोंडाईने सरपनाला सावरत शांत आक्काला पुसले...

अय शांते कुठशिक गेली होती ओ माय कामाला..?
शांता आक्का बोलायला लागली : अगं व माय ते लक्ष्मी आयच्या देऊळा खाल्ल्या रांनची झुंब्रा माळीन हायना तिच्या वावराले गेली होती...
धोंडाई:काय काम करायला गेली होती ओ माय..?
समिणाबी आपा: अरे ओ बुड्डी ओ कपास चुंनने को गयेल थे...
धोंडाई: बरं बरं माय लेकी अंजुम तू  इन्के सोबत गेलती का..?
अंजुम खाला - हां जी बुड्डी घरपे भी क्या करे..?
सलम्या का बुढ्ढा काम को नाहीं जाता,तो खानेको कोण देगा..?
तो करती हू थोडा बहुत...

इतक्यात शांता आक्का बोलायला लागली: मायवं चल जातू गं मलाबी मुसनमान मोहल्यात जायचं हायसा शब्बीर मामु च्या घरला कापुस यचला त्याचं पैकं आणाया...

धोंडाई मारुतीच्या देवळापासून एकटी वाटेनं घराकडे निघाली.
दिवसभर गावात शुकशुकाट असतो पण सांजेच्या वेळेला मात्र गावात जीव लागतो,रस्त्यानं कोणी गाडीवर दुधाची क्यान घेऊन घरला जात होते तर कुणी गाडीबैलात जात होते.
धोंडाई बिच्चारी चालली होती एक एक पाऊल टाकत,दिवस कलला होता अंधारून आलं होतं.

पाटलाचा शिवाज्या मारुतीच्या देवळात दिवा घेऊन चालला होता,सावता माळ्याच्या मंदिरात पाच-सहा धोंडाईच्या पिढीतले म्हातारे हरिपाठ म्हणत बसले होते,त्यातल्या आसऱ्या बाबांनी धोंडाईला आवाज दिला...
अय धोंडाई आज एकटीच का,लेवुक कुठशिक गेला अन् पार बोडक्या बाभळीगत झाली हायसा ते लाकडाचं पेंडक कश्याला घेऊन यु राहिली..

धोंडाई एक नाय का दोन नाय मुकाट्यानं मान हालत तिच्या घराच्या गल्लीने निघुन गेली....

धोंड्याई जात होती तिच्या मार्गाला मी बसलो होतो देवळा महुरच्या पारावर    गावचा येता-जाता माणूस मला ईचारत हुता...
काय छोटे सरकार कौशिक आलासा शहरावरून..?
मी एकच उत्तर देत होतो काल संच्याला.

शिवणामाय भर उन्हाळ्यात ही अजून तुडंब भरुन वाहत होती,यावर्षी पावसाची कृपा म्हणुन गाव खुश होता.माझ्या मनात शहरातले असंख्य प्रश्न होती त्यांना या नदी पात्रात नजर लावून उत्तर शोधत होतो,पूर्वी असलेले शहराचं आकर्षण आता कमी होवू लागलं होतं.पण कुठलाही विलाज नव्हता कारण माझा गाव मला कधीच परका झाला होता,मी बसलो होतो शिवणामायच्या पात्रात डोळे लावून बघत कधीचाच...

धोंड्याई घरला पोहचली अन् डोक्यावरचं पेंडके अंगणात टाकून कटूर्यात पाणी घेऊन अंगणातल्या दगडावर हातपाय धुवत,घासत बसली.हातपाय धुवून देवाला दिवाबत्ती करून धोंड्याईन चूल पेटवली,धगधगता चुलीच्या निखाऱ्याने धोंड्याईला जरा बरं वाटलं...

चुल्हीवर कोरा चहा उकळत होता,साऱ्या घरात त्या कोऱ्या चहाचा सुगंध दरवळत होता...
धोंड्याईन सांडशित पातीले पकडुन ढवळ्या कपात चहा गाळून घेतला,चुल्हीच्या उजेडात एक हाताने बशी सावरत अन् एका हाताने नाकातली लांब झुबक्याची नथ सावरत धोंड्याई चहा पित होती...
चहा पिऊन झाली अन् धोंड्याईने भाकरी थापायला परातीत पीठ घेतलं भाकरी थापायचा आवाज माझ्या बसल्या पारा पहूर येत होता अन् मी त्यात गुंग होवून माझ्या शिवणामायला न्याहाळत बसलो होतो....

Written by,
Bharat sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ