मुख्य सामग्रीवर वगळा

बलुतं- दया पवार

बलुतं.
लेखक - दया पवार.

पु. ल. देशपांडे यांनी लिहिल्याप्रमाणे खरोखर "बलुतं" वाचल्याने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या श्रद्धा गळून पडतात...

'बलुतं' दया पवार यांचे प्रचंड गाजलेलं व जातिव्यवस्थेवर भाष्य करणारं हे पुस्तक,जे खुप चर्चेत राहिले,आजही आहे.हे पुस्तक मराठी भाषेतील,साहित्यातील पहिले दलित आत्मचरित्र म्हणून याकडे पाहिलं जातं.धगधगत समाजवास्तव्य त्यातील दाहकता उपेक्षित,वंचित,शोषित अशा सर्वहारा माणसाचं जगणं आणि जाणीव या पुस्तकाने मांडली.

जात,वर्ग,लिंगभेदाच्या वर्तुळात अडकलेल्या भारतीय समाज आणि भांडवलशाहीने घोटलेला गळा अशा गुदमरलेल्या अवस्थेतंल जमीनेचे दुःख आकाशाला टांगण्याचे काम या 'बलुतं' ने केले.देशात बऱ्यापैकी स्वातंत्र्याचे वारे चौफेर वाहू लागले होते.देश स्वतंत्र झाला पण देशाचा नागरिक मात्र जाती व्यवस्था,धर्म,परंपरागत चालत असलेल्या रुढी परंपरा यात बरबटलेला.समाज मात्र स्वतंत्र मिळवूनही जातीव्यवस्था,धर्म यांना धरून असलेले रुढीजात विचार यामुळे स्वातंत्र्यातही पारतंत्र्य अनुभवत होता.

जातिवादाशी तो लढा देत होता,यासर्वात परिवर्तन व्हावं म्हणून एका बाजुला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आधुनिक विचारांची कास धरून सामान्य जनतेला नव्या विचारांना आपल्या जीवनात स्वीकारून जगण्यासाठी शिकवत होते,पिढीजात चालत असलेल्या परंपरांना बदलू बघत होते....

परंतु एकीकडे समाज हे स्वीकारायला तयार नव्हता अन् यातूनच मानव असंख्य अडचणींना सामोरं जात होता,हे बऱ्याच जणांना कळत होते.बदल व्हावा त्यांनाही वाटत होते पण "अठरा विश्व दारिद्र्य" मोठ्यांचा मान यापुढे काही करता येत नव्हते.कुठेतरी एक आशेचा किरण दिसत होता,परिवर्तनाची लाट निर्माण होत होती या सर्वात "दया पवार" यांचा सर्व काही कळूनही जीवनाशी चालू असलेला संघर्ष या ठिकाणी त्यांनी "बलुतं" मधुन लिहला आहे....

"दया पवार" यांचे जीवन जातिव्यवस्थेचे (त्यातही ती भारतातील ग्रामीण भागातील) त्यांनी अनुभवलेले चटके यांचे चित्रण या पुस्तकात त्यांनी शब्दांची जोड देत चितारले आहे.हे वाचून नक्कीच जातिव्यवस्थेमुळे एक सामान्य माणसाला किती गोष्टींना सामोरे जावे लागते याचे जिवंत वर्णन यामाध्यमातून त्यांनी केलं आहे,जे वाचतांना नकळत डोळ्यासमोर तो काळ येऊन जातो.आपसूक मनी एक हुरहूर मनास लागून जाते आज समाजात झालेले परिवर्तन,सुशिक्षित झालेला समाज यामुळे आज कुठेतरी हे सहन न होणाऱ्या चटक्यांची धग कमी होण्यास कारणी ठरत आहे...

जी कामं घाणेरडी,ज्या नोकऱ्या उच्चजातीतील लोक करणार नाहीत,त्या नोकऱ्या दलितांच्या.हे वास्तव जसं "बलुतं" मधील दगडू पवारने अनुभवलं, तसंच आपल्या समाजातील हजारो दगडू आज देखील अनुभवत आहेत,परिवर्तनाची लाट अन् बदलणारे विचार यामुळे आता यात हळूहळू बदल होत आहे,पण त्यावेळी हे सर्व बदल स्वीकारताना दगडूला आलेल्या असंख्य अडचणी,बालवयात त्याच्या मनावर झालेलं तो आघात त्यातून सावरत,शिक्षणाची मशाल हाती घेत बदल घडवू बघणारा दगडू अन् वेळोवेळी याला आड येणारे आपलेच माणसं याचं सविस्तर वर्णन दया पवार या पुस्तकाच्या माध्यमातून करत आहेत.

पिढ्यानपिढ्या गावातील ज्या गलिच्छ कामांचे दलित गुलाम होते,ती कामं नाकारल्यानंतर गावच्या अर्थव्यवस्थेने देखील दलितांना नाकारलं आणि शहरांतील टीचभर जागेत गुलामीचं नवं जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली.यात चहूकडून होणारी त्यांची ससेहोलपट या पुस्तकांतुन त्यांनी व्यक्त केली आहे,नक्कीच वाचावं असं हे पुस्तक जे परिवर्तनाची पहाट रोजच आपल्या सोनेरी पानांतून समाजाला देत आहे...

Written by,
©®Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड