मुख्य सामग्रीवर वगळा

एक उमदे नेतृत्व...

एक उमदे नेतृत्व..!

आज अनेकांना माझी ही पोस्ट बघुन जरा आश्चर्य वाटेल.कारण साहित्याच्या पलिकडे माझ्या वॉलवरती इतर विषयावरील पोस्ट या जवळजवळ नसतातच.पण काहीवेळा हे आपलेपण डावलून काहीतरी वेगळं लिहावं लागतं आणि ते आज या कारणासाठी लिहावं लागते आहे याचे दुःख वाटते.

तसा राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेला मी जेव्हा हे लिहतो तेव्हा लिहायला थोडं जड जात असल्यासारखे वाटत आहे.
कारण राजीवजी सातव यांच्या सारख्या अभ्यासू,सुसंस्कृत, उमदे व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला सोडून जाणं हे खुप दुःखद आहे.

राजीवजी सातव हे काँग्रेसचा आश्वासक चेहरा होते.तरुणांचे लाडके नेते होते,तरुणांची योग्य नस,ओढ,कल ओळखलेले ते एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व.राजकारण अन् त्या पलिकडची एक सामान्य व्यक्ती कशी असावी तर ती राजीवजी सातव यांच्यासारखी.

देशाच्या राजकारणात युवा पिढी जेव्हा उतरते आहे, जिची निकटच्या काळात फार आवश्यकता आहे आणि हे जाणून राहुल गांधी काँग्रेस पक्षाची विस्कटलेली घडी युवा नेत्यांना सोबत घेऊन व्यवस्थित पुन्हा बसवू बघत आहेत.या सर्वा जडणघडणीत त्यांना राजीवजी यांची कायमची साथ होती,त्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायचा असो किंवा काही चर्चा घडवायची असो त्यावेळी राहुल गांधी राजीवजी यांचे मत विचारत घेत असायचे.

फक्त चर्चेचा बोलबाला न करता,सतत केंद्रस्थानी न राहता दिल्लीत आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे हक्काची जागा निर्माण करणारे व काॅंग्रेस पक्षात आपल्यात असलेली योग्य निर्णयक्षमता,राजकारण जोडीला समाजकारण,काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये एक मोठी जबाबदारी पार पाडणारे एक उच्चशिक्षित,सभ्य नेता,युवानेतृत्व म्हणजे राजीवजी सातव.

त्यांच असे अकाली जाणं हा काँग्रेसला बसलेला खूप मोठा धक्का तर आहेच,परंतु युवावर्ग ज्या नेत्याकडे बघून राजकारणात,समाजात आपले स्वतंत्र मत व्यक्त करायला शिकला होता ते फक्त राजीवजी सातव यांच्यामुळे ज्यांच्या जाण्याने आपण देशाच्या राजकारणातील एका उमदे नेतृत्व आज गमावून बसलो याचे दुःख वाटते...

- Bharat.L.Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...