मुख्य सामग्रीवर वगळा

एक उमदे नेतृत्व...

एक उमदे नेतृत्व..!

आज अनेकांना माझी ही पोस्ट बघुन जरा आश्चर्य वाटेल.कारण साहित्याच्या पलिकडे माझ्या वॉलवरती इतर विषयावरील पोस्ट या जवळजवळ नसतातच.पण काहीवेळा हे आपलेपण डावलून काहीतरी वेगळं लिहावं लागतं आणि ते आज या कारणासाठी लिहावं लागते आहे याचे दुःख वाटते.

तसा राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेला मी जेव्हा हे लिहतो तेव्हा लिहायला थोडं जड जात असल्यासारखे वाटत आहे.
कारण राजीवजी सातव यांच्या सारख्या अभ्यासू,सुसंस्कृत, उमदे व्यक्तिमत्त्वाचे आपल्याला सोडून जाणं हे खुप दुःखद आहे.

राजीवजी सातव हे काँग्रेसचा आश्वासक चेहरा होते.तरुणांचे लाडके नेते होते,तरुणांची योग्य नस,ओढ,कल ओळखलेले ते एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व.राजकारण अन् त्या पलिकडची एक सामान्य व्यक्ती कशी असावी तर ती राजीवजी सातव यांच्यासारखी.

देशाच्या राजकारणात युवा पिढी जेव्हा उतरते आहे, जिची निकटच्या काळात फार आवश्यकता आहे आणि हे जाणून राहुल गांधी काँग्रेस पक्षाची विस्कटलेली घडी युवा नेत्यांना सोबत घेऊन व्यवस्थित पुन्हा बसवू बघत आहेत.या सर्वा जडणघडणीत त्यांना राजीवजी यांची कायमची साथ होती,त्यामुळे कुठलाही निर्णय घ्यायचा असो किंवा काही चर्चा घडवायची असो त्यावेळी राहुल गांधी राजीवजी यांचे मत विचारत घेत असायचे.

फक्त चर्चेचा बोलबाला न करता,सतत केंद्रस्थानी न राहता दिल्लीत आपल्या व्यक्तीमत्त्वामुळे हक्काची जागा निर्माण करणारे व काॅंग्रेस पक्षात आपल्यात असलेली योग्य निर्णयक्षमता,राजकारण जोडीला समाजकारण,काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये एक मोठी जबाबदारी पार पाडणारे एक उच्चशिक्षित,सभ्य नेता,युवानेतृत्व म्हणजे राजीवजी सातव.

त्यांच असे अकाली जाणं हा काँग्रेसला बसलेला खूप मोठा धक्का तर आहेच,परंतु युवावर्ग ज्या नेत्याकडे बघून राजकारणात,समाजात आपले स्वतंत्र मत व्यक्त करायला शिकला होता ते फक्त राजीवजी सातव यांच्यामुळे ज्यांच्या जाण्याने आपण देशाच्या राजकारणातील एका उमदे नेतृत्व आज गमावून बसलो याचे दुःख वाटते...

- Bharat.L.Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...