मुख्य सामग्रीवर वगळा

डुंब्य्रावाडीचा दुष्काळ...

#डुंब्य्रावाडीचादुष्काळ....

भर दुपारची वेळ हाताला काम नसल्यामुळे परसदारच्या चौकटीतून नदीपल्याड दिसणाऱ्या दगडी पुलावर मी बसून होतो.चहूकडे कोरड्या वाऱ्याच्या सोसट्यात लाल मातीची धूळ आसमंताला भिडत होती,लाल मातीच्या उडण्याने अंगावर आलेल्या घामाला बकरीच्या मुत्रट मातीचा झोंबलेला वास येत होता.डोक्याला लावायला तेल नसल्यामुळे डोक्यातील केस पार जट झाल्यागत रुक्ष आणि वाऱ्यातून येणाऱ्या मुत्रट वासाच्या मातीने माखले होते.

डोक्यातून येणारा घामाचा ओघळ कबरेच्या लवणातून खाली घरंगळत जाताना अंगाला जाणवत होता,घामाचा ओघळांनी सारा सदरा मळकट अन् सद्र्यावर कुत्रं मुतल्यागत झाला होता.हाताला नसलेलं काम अन् डोक्याला नसलेला ताण म्हणून मी येणारी जाणारी एखाद दुसरी गाडी न्याहाळत पुलावर बसलो होतो...

गावाला यंदाच्या सालचा पडलेला दुष्काळ त्यामुळं माझ्यासगट सारा गाव रिकामाच होता.गाव,गावातील गडी माणूस रिकामा असून रिकामा नव्हता, कुणी चुल्हीला जळतंन आणायला भर पहाटच्याला बोडक्या झालेल्या टेकडीच्या वाटानं सरपण आणाया गेलं होतं.बायका काम नसल्यानं गप्पा झोडीत बसल्या होत्या तर कुणी शेवटच्या घटका मोजणाऱ्या हापशीवरून हंड्या-कळशी ने पाणी भरत होतं,गावात यंदाच्या सालाला दरसाल होणारी पंचमी होणार नसल्याने माझ्यासारखी तरणीबांड पोरं गावच्या जुन्या पडक्या शाळेत पत्त्याचा डाव मांडून बसली होती...

दुपारचा पार कलला अन् मी घराच्या वाटेनं निघालो,माळावरून सरपणाचे भारे घेऊन येणारी गडी माणसं दिसत होती.उन्हाच्या तुटत्या झळा तुटत होत्या अन् या तुटत्या झळामध्ये गावची काळी,काम करुन करून,ओझे उचलून बुटकुली राहीलीली माणसं अजुन तुटतांना दिसत होती...

अनवाणी पावलांनी मी पुलाच्या मोहरच्या पायवाटेनं खोकल्याईच्या पांदीला लागलो.दूरवर नजरेत दिसणारं खोकल्याईचं देऊळ अन् एस्टी थांब्याजवळ असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नजरी पडत होता.वीस सालापुर्वी धोंडु आन्ना रझाकार यांनी त्यांच्या रिटायरमेंट झाल्यावर तो बांधला होता,त्याच्या खालोखाल धोंडु आन्ना रझाकार यांचा पुतळा धोंडु आन्ना वारल्यानंतर गावकऱ्यांनी गाव वर्गणीतून बांधला होता...

पूर्वीचे लोकं म्हणता की धोंडु आन्ना रझाकार पिसळेल कुत्रं डसल्यानी येडा झाला. अन् पिंपळाच्या पारावर बसला की तो नेहमीच म्हणायचा की माझा मेल्यावर यशी महुर पुतळा बांधा,नायतर माझा गावाला तळतळाट लागल....

मग काय गावातील सारी यडीखुळी लोकं बिच्चारी ते तरी काय करतील भोळी बाभडी बांधला बीचाऱ्यांनी धोंडु आन्ना रझाकार यांचा पुतळा...

क्रमशः
वरील पोस्ट कॉपीराईट असल्यामुळे माझ्या नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही...
Sketch,
R.K.LAXMAN.
Written by,
©® Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड