मुख्य सामग्रीवर वगळा

डुंब्य्रावाडीचा दुष्काळ...

#डुंब्य्रावाडीचादुष्काळ....

भर दुपारची वेळ हाताला काम नसल्यामुळे परसदारच्या चौकटीतून नदीपल्याड दिसणाऱ्या दगडी पुलावर मी बसून होतो.चहूकडे कोरड्या वाऱ्याच्या सोसट्यात लाल मातीची धूळ आसमंताला भिडत होती,लाल मातीच्या उडण्याने अंगावर आलेल्या घामाला बकरीच्या मुत्रट मातीचा झोंबलेला वास येत होता.डोक्याला लावायला तेल नसल्यामुळे डोक्यातील केस पार जट झाल्यागत रुक्ष आणि वाऱ्यातून येणाऱ्या मुत्रट वासाच्या मातीने माखले होते.

डोक्यातून येणारा घामाचा ओघळ कबरेच्या लवणातून खाली घरंगळत जाताना अंगाला जाणवत होता,घामाचा ओघळांनी सारा सदरा मळकट अन् सद्र्यावर कुत्रं मुतल्यागत झाला होता.हाताला नसलेलं काम अन् डोक्याला नसलेला ताण म्हणून मी येणारी जाणारी एखाद दुसरी गाडी न्याहाळत पुलावर बसलो होतो...

गावाला यंदाच्या सालचा पडलेला दुष्काळ त्यामुळं माझ्यासगट सारा गाव रिकामाच होता.गाव,गावातील गडी माणूस रिकामा असून रिकामा नव्हता, कुणी चुल्हीला जळतंन आणायला भर पहाटच्याला बोडक्या झालेल्या टेकडीच्या वाटानं सरपण आणाया गेलं होतं.बायका काम नसल्यानं गप्पा झोडीत बसल्या होत्या तर कुणी शेवटच्या घटका मोजणाऱ्या हापशीवरून हंड्या-कळशी ने पाणी भरत होतं,गावात यंदाच्या सालाला दरसाल होणारी पंचमी होणार नसल्याने माझ्यासारखी तरणीबांड पोरं गावच्या जुन्या पडक्या शाळेत पत्त्याचा डाव मांडून बसली होती...

दुपारचा पार कलला अन् मी घराच्या वाटेनं निघालो,माळावरून सरपणाचे भारे घेऊन येणारी गडी माणसं दिसत होती.उन्हाच्या तुटत्या झळा तुटत होत्या अन् या तुटत्या झळामध्ये गावची काळी,काम करुन करून,ओझे उचलून बुटकुली राहीलीली माणसं अजुन तुटतांना दिसत होती...

अनवाणी पावलांनी मी पुलाच्या मोहरच्या पायवाटेनं खोकल्याईच्या पांदीला लागलो.दूरवर नजरेत दिसणारं खोकल्याईचं देऊळ अन् एस्टी थांब्याजवळ असलेला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नजरी पडत होता.वीस सालापुर्वी धोंडु आन्ना रझाकार यांनी त्यांच्या रिटायरमेंट झाल्यावर तो बांधला होता,त्याच्या खालोखाल धोंडु आन्ना रझाकार यांचा पुतळा धोंडु आन्ना वारल्यानंतर गावकऱ्यांनी गाव वर्गणीतून बांधला होता...

पूर्वीचे लोकं म्हणता की धोंडु आन्ना रझाकार पिसळेल कुत्रं डसल्यानी येडा झाला. अन् पिंपळाच्या पारावर बसला की तो नेहमीच म्हणायचा की माझा मेल्यावर यशी महुर पुतळा बांधा,नायतर माझा गावाला तळतळाट लागल....

मग काय गावातील सारी यडीखुळी लोकं बिच्चारी ते तरी काय करतील भोळी बाभडी बांधला बीचाऱ्यांनी धोंडु आन्ना रझाकार यांचा पुतळा...

क्रमशः
वरील पोस्ट कॉपीराईट असल्यामुळे माझ्या नावासहित शेअर करायला माझी हरकत नाही...
Sketch,
R.K.LAXMAN.
Written by,
©® Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...