मुख्य सामग्रीवर वगळा

Gautala wildlife sanctuary... Part-3

Gautala wildlife sanctuary...


काल परवा रौद्ररूप धारण केलेल्या वादळांसोबत संपूर्ण महाराष्ट्रभर कमी-जास्त प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या आणि आता पावसाळा फार दूर नाही याची चिन्ह दिसू लागली.पावसाळा म्हंटले की चहूकडे निसर्गाने आपल्या सौंदर्यावर पांघरलेली हिरवी जरीची शाल,जिथवर नजरेला नजरेने न्याहाळता येईल तिथवर सुंदर निसर्ग,दवाच्या पडण्याने खुललेले तनाचे सौदर्य,वाऱ्याच्या झुळकेमुळे चहुकडे पडलेली फुलांची आरास हे सर्व खूप सुंदर आहे...

तेव्हा आज हेच क्षण अनुभवायला मी भरत सोनवणे आपल्याला अश्याच एका अभयारण्यला भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहे.आपण महाराष्ट्राची इतिहासिक राजधानी म्हणुन ओळखले जाणारे शहर म्हणजेच औरंगाबाद येथील गौताळा अभयारण्याला भेट देणार आहोत,तर चला आज मी तुम्हाला औरंगाबाद जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य भटकंतीसाठी घेऊन जातो...


खूप दिवस झाले lockdown मुळं घरात बसून कंटाळा आला आहे,परंतु पावसाळा आता काही दिवसांवर आला आहे आणि ट्रेकर्सही सज्ज झाले आहे.खूप दिवस ट्रॅव्हल बॅग घरात एका कोपऱ्यात स्वस्थ पडून होती अन् ती आपल्याला आता पुन्हा ट्रेकिंग जाण्यासाठी खुणावते आहे.घरोघरी यावर्षी पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे हा विषय घेऊन चर्चा होत आहेत तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून माझा हा तुमच्यासाठी गौताळा अभयारण्य सैर करण्याचा एक प्रवास,त्यानिमित्ताने माझ्या माध्यमातून गौताळा अभयारण्याची पुन्हा एकदा आपल्याला ओळख होईल...

तर सकाळच्या प्रहरी बॅग पॅक करून,शूज घालून मी निघालो आहे आजच्या या सफरीवर तर मित्र/मैत्रणींनो गौताळा अभायरण्य अन् सभोवतालचा परिसर याविषयी मी प्रथम काही माहिती सांगतो.

गौताळा अभयारण्य हे मराठवाड्यातील सर्वाधिक मोठे अभयारण्य आहे.थोडक्यात या ठिकाणी आल्यावर तुमची कुठलीही निराशा होणार नाही,कारण एकाच तालुक्यात तुम्हाला  ट्रेकिंग करण्यासाठी खूप मोठे अभयारण्य आहे,अनेक व्हिव पॉइंट,विविधतेने नटलेली वृक्ष,वेली संपदा, धबधबे,धरणे,किल्ले,लेणी अन् विविध दर्शनीय स्थळे हे आपल्याला काही 40 ते 50 किलोमीटर आतील अंतरात बघण्यास मिळेल,सोबतीने विविध प्राणी,पक्षी यांचे विलोभनीय दर्शनही होईल...

तर चला गौताळा अभयारण्याच्या दिशेला कन्नडहून 2 कि.मी पुढे गेल्यानंतर एक हिवरखेडा फाटा आहे.या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचतो जे की कन्नड शहराच्या उत्तर दिशेला आहे.प्रवेशद्वराजवळ पोहचले की सर्वप्रथम आपण आपली नोंद एक पर्यटक म्हणून या ठिकाणी भेट द्यायला आलो आहे म्हणुन करायची आहे आणि आपल्या सोबत आणलेली वाहने तिथे लावून वनविभागाची परवानगी घेऊन, नियमांचे कुठलेही उल्लंघन होणार नाही हा नियम पाळत आपण आता भटकंतीसाठी निघू शकतो...

प्रवेशद्वारापासून सरळ पुढे चालत गेले की,रस्त्याच्या लागून काही अंतराने आपल्याला सर्वप्रथम चंदननाला दिसतो.याचे नाव चंदन नाला यासाठी दिले आहेत की या ठिकाणी पुर्वी बरेचसे चंदनचे झाडे होते पण मानवाच्या वृक्षतोडीमुळे ही झाडे इथे नामशेष होण्याच्या कगारावर आहे,त्यामुळे क्वचितच आपल्याला आता इथे ही झाडे दिसतील.या चंदन नाल्याचे पाणी डोंगरातून वाहून येत असल्याने संपूर्ण नितळ असे असते,अभयारण्यातील बरेचसे प्राणी रात्रीच्या वेळी याठिकाणी पाणी पिण्यास येतात.पाण्यात बरेचसे गप्पी मासे आहे,खेकडे आहे....

आपण पुढे याच वाटेनं चालत गेलो की वनविभागाचा आदीपथ्याखाली येथे पक्षी,प्राणी,झाडे निरीक्षण करण्यासाठी साधारण वीस फूट उंचीचा मनोरा बांधला आहे.ज्यावर चढुन आपण अभयारण्याचे विलोभनीय दृश्य बघू शकतो,रात्रीच्यावेळी वनविभागाचे कर्मचारी या मनोर्याचा उपयोग अभयारण्य संरक्षणासाठी करतात...

यापुढे आपण त्याच पाऊलवाटेनं पुढे चालत गेलं की,आपल्याला बरेचसे चिंचोळे झरे पाहायला मिळतील. सूर्यकीरनात झऱ्यातील चमकणारे पाणी हे अभयारण्याचे सौदर्य अजूनच खुलवून टाकते.इथेही आपल्याला पाण्यातील विविध पानकोंबड्या, छोटूली मासे पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे सरकताना दिसतात, आणि नकळत आपण त्यांना कॅमेरात कैद करू लागतो...

पुढे हिरवाईने नटलेल्या रानात चालत गेले की काहीवेळाने आपण वाटेत लागणारं चढण चढून एका छोट्या तळ्याजवळ येतो. त्या तळ्यामध्ये खूप सुंदर अशी रानकमळाची फुलं आहेत,बाजूला असलेला संपूर्ण परिसर रानात आढळणाऱ्या रानफुलांनी सजलेला आहे.

इथे एक छोटीशी दर्गा आहे तिचे दर्शन घेऊन आपण पुढे निघालो की,आपल्याला अभयारण्यातील विविध झाडे,वेली दिसतात.ज्यामधे बहुतांश वनस्पती औषधी वनस्पती आहेत जसे की बांबू,पळस,रानपिंपळ,कडुनिंब,साग,करवंदाच्या जाळ्या,आवळा असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणकोंबडी,खेकडे,साप,आणि इतर पक्षी,जलचर प्राणी आहे सोबतच जसे कावळा,चिमणी,सुतारपक्षी,बगळा,बुलबुल,मोर,पोपट अन् काही अशी परदेशी पक्षीही या ठिकाणी या काळात स्थलांतर करतात जे इथे काही दिवस आपला मुक्काम करत असतात.


तळ्याशेजारी पुन्हा एक छोटा निरीक्षण मनोरा आहे,या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतोतेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे,धावडा,पिंपळ, पळस, करवंद,बोर,आवळा, सोबतच प्राणी,पक्षी पाहू शकतो.अभयारण्यात बिबट्या,लांडगे,चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर,मोर,रान डुक्कर यांसह इतर 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.यातील बरेचसे पक्षी प्राणी आपणी दिवसाही बघू शकतो.मनोऱ्यावरून दिसणारा हा नजारा डोळ्यांना एक सुंदर अनुभव देणारा ठरतो,हेच क्षण केमेर्यात कैद करायला मात्र विसराचे नाही हं...

पुढे याच ठिकाणी पुरातन काळातील राम,लक्ष्मण,सीता यांचे मंदिर आहे जे की उंच डोंगरात आहे,पुढे पुढे यांबद्दलही आपण जाणुन घेऊया.जसजसे आपण अभयारण्यात आत जातो आपल्याला तसतसे  विविध छोटेमोठे धबधबे लक्ष वेधून घेतात,यात मग धवलतीर्थ धबधबा,मगाशी बघितलेला चंदन नाला आणि असे बरेच जीवंत पाण्याचे झरे या ठिकाणी निरिक्षणास पडतात.

पुढे चालत गेलो की आपल्याला अभयारण्यातील सर्वात सुंदर विव्हपॉइंट बघायला भेटतो,जिथुन आपण गौताळा अभयारण्याचे बहुतांश सौदर्यरुप डोळ्यात साठवु शकतो.दुरदुर दिसणारा हिरवा सुंदर असा परिसर,अभयारण्याला लागून असलेली छोटीछोटी गावं,तिथील डोळ्यांना दिसणारी छोटुली झोपडीवजा घरे.

पुढे गेलो की अभयारण्याच्या हिरवाईत काळ्यापाषाण दगडात साकारलेली सितान्हाणी जीचा इतिहास भगवान रामचंद्र यांच्या काळातील गौताळा अभयारण्याची आपल्याला आठवण करून देतो.अन नकळत आपल्याला आपले मन त्या काळात घेऊन जाते,विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठ्याप्रमाणात असते...

उंच डोंगरात असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मग आपले पावले डोंगराकडे जाणाऱ्या पाऊला वाटेला लागतात.पावसाळ्यात सततच्या पावसामुळे निसरडी झालेली ही पाऊलवाट डोंगर चढतांना आपले कसब पणाला लावते.परंतु जेव्हा आपण ही वाट चढुन मंदीराजवळ पोहचतो तेव्हा डोळ्यांना दिसणारा नजारा बगून आपल्याला आलेला सर्व थकवा काही क्षणात नाहीसा होतो...

एरवी सूर्य अस्ताला जातांना दिसत असतो,मंदिराचे दर्शन घेऊन काहीवेळ तिथे असलेल्या कोरीव दगडांच्या जागेत बसून निसर्गाने निर्माण केलेल्या टाक्यातील थंडगार पाणी पिवून आपण तृप्त होवून जातो आणि आता आपण परतीच्या वाटेला लागलेलो असतो.पावलांना सावरत हळुवार आपण खाली आलो की सर्व परिसर पुन्हा एकदा आपण नजरेत सामावून घेतो....

आता मात्र परतीची जाणीव आपल्याला आपले मन करून देते अन् काहीशा जड अंतःकरणाने आपण हे सर्व अनुभवत परतीच्या वाटेला लागतो.रस्त्यानं दिसणारा सर्व सुंदर नजारा,अंगाला स्पर्शुन जाणारा वारा आतापर्यंत आलेला सर्व थकवा नाहीसा करतो.आपण परतीच्या वाटेला लागतो....

गौताळा अभयारण्य बघून झाले की,जवळपास अनेक स्थळं ही बघण्यासारखे आहेत.जसे की,अंतुरचा कील्ला,सातमाळ डोंगररांगा,अंबाडी प्रकल्प,कालीमठ कालिकामाता मंदिर,जगप्रसिद्ध पितळखोरा लेणी,भामासाद महाराज यांची अंधानेर येथील समाधी,रेल नावडी येथील भैरवनाथ मंदिर,उंच डोंगरावर असणारी शेकमारू बाबांची दर्गाह,पाटणादेवी,विविध ठिकाण हे बघण्यासारखे व आनंद,माहीती देणारे आहेत...

या ठिकाणांना भेट दिल्यावर औरंगाबादच्या जवळपास अनेक जगप्रसिद्ध ठीकाणंही बघण्यासारखे आहेत...
औरंगाबाद शहराची ओळखच ऐतिहासिक शहर असल्याने ते पुर्ण शहर बघण्यासारखे आहेच सोबत वेरूळ,अजिंठा लेणी,कैलास आश्रम,भद्रा मारुती मंदिर,थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ,देवगिरी किल्ला हे सर्व ठिकाण बघण्यासारखे आहे...

तेव्हा नक्कीच तुम्हीही लवकर भेट द्यायला या गौताळा अभयारण्य तुमचे स्वागत करत आहे....

लेखक -भारत लक्ष्मण सोनवणे.
कन्नड,औरंगाबाद.
संपर्क-9075315960.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड