मुख्य सामग्रीवर वगळा

एक अनोखी भेट

नेहमीप्रमाणे आज शेताच्या गावाला काही कामानिमित्त भेट द्यायला गेलो होतो,माझे काम आवरून मी शेतातून परतीच्या वाटेला निघालो होतो.....

पण नेमका त्या वस्तीपाशी येऊन मनात विचार आला की आज त्या वस्तीला भेट द्यायचीच,मग काय गाडी खाली लाऊन उंच टेकडीवर असलेल्या त्या वस्तीकडे पाऊले चालायला लागली. फारतर तीस चाळीस झोपडीवजा असलेली घरे,दोनशेच्या आसपास संख्या असलेली ही वस्ती.तशी ही वस्ती लहानपणा पासूनच ओळखीची होती,कारण शेताच्या वाटेला ती लागायची.....

इथे प्रामुख्याने भिल्लं,ठाकर,गोपाळ लोक असतात,ते त्यांचे पारंपरिक व्यवसाय करतात. सध्या ऊसतोड चालू असल्यामुळे वस्तीवर माझा खेरीच फक्त पन्नास साठ माणसे,लहान लहान मुलं असतील. त्यातली जे काही होती ती सकाळ सकाळी कामाला जायच्या गरबडीत होती, मग मी काही त्यांना बोलू शकलो नाही....

पण मग ठरवलं की आज येथील प्राथमिक शाळेला भेट द्यायची,शाळेत गेलो तर अजबच काही मुले तिथे खेळत बसली होती. अजून त्यांचा मॅडम पण आल्या नव्हत्या,साहजिक आहे ते मुलं इथच राहत असल्यामुळे ही शाळाच त्यांचे घर झाल्या सारखी असावी....

कुणी सिसो,कुणी झोका,कुणी घसरगुंडी खेळत होते,अंगणवाडी मध्ये असणारे मुलं शाळेच्या ओट्यावर लोळत होती. कुणी दप्तराचे बंद खात होती कुणी हापश्या वर चढून बसले होते....

अश्यात मी शाळेची एक दोन फोटो घेतले अन् आजू बाजूचा परिसर बघत बसलो. त्यातल्या काही मुलांना विचारले मॅडम कधी येतील रे ? तर ते मुलं बोले यतील  थोड्या वख्तानं. मी मॅडम ची वाट पाहत बसलो होतो.....

त्या अंगवडीच्या पिल्लांना बघत होतो,तितक्यात शाळेतील मदतनीस बाई आल्या. ज्या खुप दूरवरून प्यायच्या पाण्याचा हंडा घेऊन आल्या,  मला मनातच कसेतरी वाटले. एकीकडे शहरातल्या सरकारी शाळा अन् एकीकडे ही एकांतात असलेली ही शाळा.....

परंतु मला मनापासून भारत सरकारा बद्दल मनात अभिमान वाटत होता,इतक्या निर्जन अन् दूरवर असलेल्या भागात प्राथमिक शाळा उघडलेली होती, हे महत्त्वाचे अन् वाखण्या जोगे होते....

मला या वस्तीवरल्या,तांड्या वरल्या,केव्हा पालघर,वसई,विरार या आदिवासी भागातील त्या पाड्या वरल्या शाळेचे खुप आकर्षण आहे शहरी शाळा पेक्षा....

मी बघत होतो त्या मदतनीस बाईंनी आल्या आल्या अंगणवाडीच्या मुलांना लाडू पोषण आहार दिला,नंतर काहीतरी शिजवायला ही टाकले त्या मुलांसाठी....

मग पुढे काही वेळानी प्राथमिक केंद्र अन् अंगणवाडी केंद्राच्या प्रमुख सेविका ताई या मीटिंग करून येतच होत्या, त्या दूरवरून येतच असताना तेथील मुलांनी ताईंना तुम्हाला भेटण्यासाठी कुणीतरी आलेय हे सांगितले,क्षणातच मी अवाक झालो(कारण मी कुणी अधिकारी नव्हतो एक सामान्य मुलगा होतो)....

ताई आल्या तसे ताईंनी माझे आनंदाने स्वागत केले,मला ऑफिस मध्ये भेटण्यासाठी आत बोलावले. मी गेलो मग विचारपूस झाली विद्यार्थांच्या प्रतिसादाबद्दल विचारले,सरकार अशा शाळांसाठी चालवणार्या योजना बद्दल विचारले....

एकुण सर्व समाधान कारक होत,पण ताईंनी एक खंत बोलून दाखवली. की पालक लोक मुलांना नियमित शाळेत पाठवत नाही,त्यांना खुप वेळा यासाठी प्रवृत्त करुनही ते फारसे मनावर घेत नाही. परंतु ताईंची मेहनत अन समोरील परिस्थिती बघता एकुण व्यवस्थित शाळा चालू होती.अंगणवाडी अन् पहिली ते तिसरी वर्गातील पटावर जवळपास ७५ मुलं या शाळेत शिकत होते, हे खुप अभिमानास्पद होते.....

वेळे अभावी मला आता निघायचे होते पण निघत असतांनी ताईंनी माझ्याकडुन एक इच्छा व्यक्त केली, की मी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात या शाळेबद्दल लिखाण करावे....

त्या साठीचा हा एक छोटासा प्रयत्न एकुण आजचा दिवस माझा साठी खास होता,अन् मग मी ताईंचा निरोप घेऊन निघालो.....

शाळा:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी, एकलव्य नगर,अंधानेर.
तालुका:कन्नड,जिल्हा: औरंगाबाद.

#एक_भेट_त्या_ओळखीच्या_माझ्या_शाळेला....
लेखन:भारत लक्ष्मन सोनवणे.(कन्नड, औरंगाबाद).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...