मुख्य सामग्रीवर वगळा

एक अनोखी भेट

नेहमीप्रमाणे आज शेताच्या गावाला काही कामानिमित्त भेट द्यायला गेलो होतो,माझे काम आवरून मी शेतातून परतीच्या वाटेला निघालो होतो.....

पण नेमका त्या वस्तीपाशी येऊन मनात विचार आला की आज त्या वस्तीला भेट द्यायचीच,मग काय गाडी खाली लाऊन उंच टेकडीवर असलेल्या त्या वस्तीकडे पाऊले चालायला लागली. फारतर तीस चाळीस झोपडीवजा असलेली घरे,दोनशेच्या आसपास संख्या असलेली ही वस्ती.तशी ही वस्ती लहानपणा पासूनच ओळखीची होती,कारण शेताच्या वाटेला ती लागायची.....

इथे प्रामुख्याने भिल्लं,ठाकर,गोपाळ लोक असतात,ते त्यांचे पारंपरिक व्यवसाय करतात. सध्या ऊसतोड चालू असल्यामुळे वस्तीवर माझा खेरीच फक्त पन्नास साठ माणसे,लहान लहान मुलं असतील. त्यातली जे काही होती ती सकाळ सकाळी कामाला जायच्या गरबडीत होती, मग मी काही त्यांना बोलू शकलो नाही....

पण मग ठरवलं की आज येथील प्राथमिक शाळेला भेट द्यायची,शाळेत गेलो तर अजबच काही मुले तिथे खेळत बसली होती. अजून त्यांचा मॅडम पण आल्या नव्हत्या,साहजिक आहे ते मुलं इथच राहत असल्यामुळे ही शाळाच त्यांचे घर झाल्या सारखी असावी....

कुणी सिसो,कुणी झोका,कुणी घसरगुंडी खेळत होते,अंगणवाडी मध्ये असणारे मुलं शाळेच्या ओट्यावर लोळत होती. कुणी दप्तराचे बंद खात होती कुणी हापश्या वर चढून बसले होते....

अश्यात मी शाळेची एक दोन फोटो घेतले अन् आजू बाजूचा परिसर बघत बसलो. त्यातल्या काही मुलांना विचारले मॅडम कधी येतील रे ? तर ते मुलं बोले यतील  थोड्या वख्तानं. मी मॅडम ची वाट पाहत बसलो होतो.....

त्या अंगवडीच्या पिल्लांना बघत होतो,तितक्यात शाळेतील मदतनीस बाई आल्या. ज्या खुप दूरवरून प्यायच्या पाण्याचा हंडा घेऊन आल्या,  मला मनातच कसेतरी वाटले. एकीकडे शहरातल्या सरकारी शाळा अन् एकीकडे ही एकांतात असलेली ही शाळा.....

परंतु मला मनापासून भारत सरकारा बद्दल मनात अभिमान वाटत होता,इतक्या निर्जन अन् दूरवर असलेल्या भागात प्राथमिक शाळा उघडलेली होती, हे महत्त्वाचे अन् वाखण्या जोगे होते....

मला या वस्तीवरल्या,तांड्या वरल्या,केव्हा पालघर,वसई,विरार या आदिवासी भागातील त्या पाड्या वरल्या शाळेचे खुप आकर्षण आहे शहरी शाळा पेक्षा....

मी बघत होतो त्या मदतनीस बाईंनी आल्या आल्या अंगणवाडीच्या मुलांना लाडू पोषण आहार दिला,नंतर काहीतरी शिजवायला ही टाकले त्या मुलांसाठी....

मग पुढे काही वेळानी प्राथमिक केंद्र अन् अंगणवाडी केंद्राच्या प्रमुख सेविका ताई या मीटिंग करून येतच होत्या, त्या दूरवरून येतच असताना तेथील मुलांनी ताईंना तुम्हाला भेटण्यासाठी कुणीतरी आलेय हे सांगितले,क्षणातच मी अवाक झालो(कारण मी कुणी अधिकारी नव्हतो एक सामान्य मुलगा होतो)....

ताई आल्या तसे ताईंनी माझे आनंदाने स्वागत केले,मला ऑफिस मध्ये भेटण्यासाठी आत बोलावले. मी गेलो मग विचारपूस झाली विद्यार्थांच्या प्रतिसादाबद्दल विचारले,सरकार अशा शाळांसाठी चालवणार्या योजना बद्दल विचारले....

एकुण सर्व समाधान कारक होत,पण ताईंनी एक खंत बोलून दाखवली. की पालक लोक मुलांना नियमित शाळेत पाठवत नाही,त्यांना खुप वेळा यासाठी प्रवृत्त करुनही ते फारसे मनावर घेत नाही. परंतु ताईंची मेहनत अन समोरील परिस्थिती बघता एकुण व्यवस्थित शाळा चालू होती.अंगणवाडी अन् पहिली ते तिसरी वर्गातील पटावर जवळपास ७५ मुलं या शाळेत शिकत होते, हे खुप अभिमानास्पद होते.....

वेळे अभावी मला आता निघायचे होते पण निघत असतांनी ताईंनी माझ्याकडुन एक इच्छा व्यक्त केली, की मी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात या शाळेबद्दल लिखाण करावे....

त्या साठीचा हा एक छोटासा प्रयत्न एकुण आजचा दिवस माझा साठी खास होता,अन् मग मी ताईंचा निरोप घेऊन निघालो.....

शाळा:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी, एकलव्य नगर,अंधानेर.
तालुका:कन्नड,जिल्हा: औरंगाबाद.

#एक_भेट_त्या_ओळखीच्या_माझ्या_शाळेला....
लेखन:भारत लक्ष्मन सोनवणे.(कन्नड, औरंगाबाद).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ