मुख्य सामग्रीवर वगळा

Happy New year....2020

सुरुवात करण्या आधीच काय लिहु ? व कोणत्या विषयवार लिहु ? याबद्दल काही सुचत नसल्यामुळे दोन-तीन शब्द टाइप करून पुन्हा डिलीट करतोय,पुन्हा लिहितोय,पण आज लिहायचे आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काहीतरी म्हणुन हा प्रयत्न...

माझ्यासाठी २०१९ हे वर्ष शैक्षणिक,समाजिक,आर्थिक,नोकरी,लेखन,इत्यादींसाठी कसे होते ?
हा प्रश्न पडला त्याला उत्तर म्हणुन हा एक प्रयत्न...

हे वर्ष खरतर प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देणारे ठरले.जग झपाट्याने कसे बदलत आहे,माणसे कसे बदलत आहे,कोण चांगले कोण वाईट हे ओळखण्यासाठीचे काही प्रमाणात यावर्षी मला अनुभव आले....

प्रत्येक गोष्टींसाठी वाढलेली स्पर्धा,मेहनत घेण्याची आपल्यात असलेली कुवत व सर्वात महत्त्वाचे आपल्यातील अंतर्गत कौशल्य,राहणे,बोलणे,इतरांसमोर आपण स्वताला नकली मुखवटा न घालता कसे present करायचे हे ज्ञान  यावर्षी भेटले.मग ते शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,कुठल्याही क्षेत्रातून असो....

शिक्षण:माझ्यासाठी शैक्षणिक बाबतीत सांगायचे झाले तर हे वर्ष माझ्यासाठी सर्वात यशस्वी वर्ष आता पर्यंतचे होते. CET देऊन मी MBA सारख्या शिक्षणासाठी मी प्रवेश मिळवला,जे की माझं स्वप्न होते.शैक्षणिक क्षेत्रात पुढेही खूप मार्ग,अडचणी,अभाव असेल तेव्हा हे सातत्य कायम टिकवण्याचे प्रयत्न माझा असेल....

समाज:सामाजिकदृष्ट्या बघायचं झाले तर हे वर्ष माझ्यासाठी कुठेतरी मला कसोटींचे गेले. कारण समाजात अंधश्रद्धा,लोकांची मतमतांतरे, जात,धर्म,लिंग याविषयी असलेले विचार जरा नेहमीपेक्षा स्पष्ट समजायला लागले होते.नाहीतर मी त्यापुरक आता झालो होतो म्हणून मला ते प्रत्येक वेळी खटकत होते.परंतु समाजात काही चांगले लोक आहे याची प्रचितीही यावर्षी पेक्षा आदी कधी अनुभवायला भेटली नाही. कारण सांगली,सातारा,कोल्हापूर,नाशिक,पुणे,मुंबई,यांसरख्या शहरात आलेला महापुर व त्यासाठी लोकांनी दाखवलेलं माणुसकीचं,आपल्या माणसांना जपण्याचं खरेखुरे देवपण यावर्षी अनुभवले.मी सुध्दा या मदतीच्या कार्यात माझा छोटेखानी हातभार लावला याचा सार्थ अभिमान वाटत आहे.....

आर्थिक:आर्थिक बाबतीत हे वर्ष माझ्यासाठी खुप काही नवीन संकल्पना घेऊन आले.आर्थिक बाबतीत मी पूर्णपणे मागास जरी असलो,परंतु त्याचे नियोजन ती व्यवस्था हाताळण्याचे गणितं यावर्षी काही प्रमाणात अनुभवायला भेटली.आर्थिक विश्वातही अनोख्या घडामोडी यावर्षाने जगाला दिल्या,एकूण हे वर्ष आर्थिक बाबतीत खुप महत्त्वाचे वाटले.

नौकरी व व्यवसाय:यावर्षी माझ्यासाठी आयुष्यातील नौकरीसाठी हे माझे सर्वात वाईट वर्ष असलेले वर्ष ठरले आहे. खूप वाईट अनुभव मला येत गेले,काही कारणास्तव ते मी स्वीकारही केले.आयुष्यातील दुसरा जॉब जो मी तब्बल सहा वर्षापासून करत होतो तो मी या वर्षी सोडला, त्याला अनेक कारण होते मग शैक्षणिक असो, फील्डमध्ये झालेले बदल असो.परंतु नवीन वर्षात पुन्हा तितकीच मेहनत करून एका नवीन नौकरीला मिळवायचे आहे,जी पुरेपूर माझ्या शिक्षणाशी जोडलेली असेल.व्यवसायबद्दल बोलायचे तर आमची परंपरागत चालत आलेली शेती पाऊस,उन,वारा,संकटे,रोगराई यांमुळे काही प्रमाणात नुकसानीची राहीली.उत्पन्न ही बऱ्यापैकी असेल याची खात्री राहील,पण यावर्षी अवकाळी पाऊस,मक्कावर आलेली लष्करी अळी यामुळे खुप मोठे नुकसान शेतकऱ्याचे झाले.पण शेती ही तिच्या लेकराला कधी उपाशी ठेवत नाही  काहीतरी देतच असते.फक्त मेहनत असावी लागते तर हे वर्ष शेतीसाठी सुध्दा चांगले राहीलं....

लेखन,वाचन:हे वर्ष लेखन करण्यासाठी जो माझा छोटेखानी एक छंद आहे,तो जोपासण्यासाठी खुप छान राहिले.यावेळी अनेक कविता,पटकथा,हे प्रकार तोडक-मोडके लिहण्याचा माझा प्रयत्न राहिला. दोन संमेलनालाही मी हजेरी लावली आता हतनूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तिफन संमेलनाला ही जायचे ठरले आहे.असे अनेक प्रयत्न कामातून वेळ काढून छंद जोपासण्यासाठी करत आहे....वाचन म्हणाल तर यावर्षी मी बऱ्यापैकी यशस्वी झालो आहे.श्यामची आई,शेतकऱ्याचा आसूड,नवा करार,श्री चित्कल मुक्ताबाई चरित्र्य हे पुस्तक मी वाचले,अजूनही वाचनाची भूक वाढवावी यासाठी प्रयत्न करत राहणार आहे.साहीत्य क्षेत्रात उपलब्धतेनुसार बरेच वाचन यावर्षी करू शकलो....

तर असे होते माझे २०१९ हे वर्ष....नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....

#बाय_बाय_२०१९...
#वेलकम_२०२०....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...