मुख्य सामग्रीवर वगळा

मालगुडी डेज एक गोड आठवण...

जेवण झाले अन् मी खुप दिवसांनी माझा अडगळीतल्या खोलीत फेरफटका मारायला गेलो. साधारण तीन चार महिने झाले असेल मला त्या खोलीत जाऊन,गेलो कावडाची कडी खोलली. अन् आत गेलो खोलीत सर्विकडे जाळे अन् धुळ होती मग एका झाडूने सर्व झाडून काढले. आतापर्यंत नाकातून शिंका यायला सर्वात झाली होती, का तर मला दुळीची एलर्जी आहे. मग काय सर्व आवरून येऊन बसलो खुर्चीवर अन् न्याहाळत बसलो खोलीला तिचामध्ये खुप सर्व जुने ग्रंथ,पुस्तकं, वह्या, डायरी ठेवलेल्या होत्या. ज्या खुप जुन्या होत्या आमचा घराण्यात वाचनलेखन करायला माझा आजोबांना खूप आवडायचे. त्यांचा नंतर कदाचित मीच या खोलीत आलो असल, बाबांचं ते पुस्तकी ज्ञान पाहायला.कारण या खोलीकडे बाबा वारल्या नंतर कुणी फिरकलेच नाही मी प्रत्येक पुस्तक बघत होतो खुश होत होतो.आता बाबांचा प्रती मनात अजून एक नवीन आदरच स्थान निर्माण झालं होतं,एक वहीत बाबांनी लिखाण केलेलं ही सापडले अन् मी खुश झालो. कारण बाबांचा हा वारसा मी आता जपवत होतो काही वेळानं मी पण लिखाण करायला बसलो. थोडेफार लिखाण केले अन् पुन्हा बसून राहिलो मग YouTube वर search करत बसलो. अन् एकदम हिस्ट्री मध्ये मालगुडी डेज चे काही भाग दिसले त्यातला सर्वात आवडता माझा भाग एक गरीब आदमी मी बघत बसलो. जो मी आदी खुप वेळा बगितला आहे मला खूप आवडतो तो भाग दोन वेळा बगून झाले अन् मग झोप यायला लागली.  मग काय त्या खोलीतच आजोबांचे जुने गोधडी चादर पडलेले होते ते घेतले अन् झोपलो, खरच आनंद वाटत होता आज कारण हल्ली वाचन फारसं कुणी करतच नाही. परंतु हे संस्कार मला लहानपणीच माझा आजोबाकडन भेटत गेले जेव्हा मला यातले फारसे काही समजत ही नव्हते. तर अशी ही माझी अडगळीतली खोली जिथं खुप आठवणी आहेत जिवंतरूपानं....
#एकखोलीअडगळीतली....
लिखित: भरत सोनवणे (सौमित्र).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ