जेवण झाले अन् मी खुप दिवसांनी माझा अडगळीतल्या खोलीत फेरफटका मारायला गेलो. साधारण तीन चार महिने झाले असेल मला त्या खोलीत जाऊन,गेलो कावडाची कडी खोलली. अन् आत गेलो खोलीत सर्विकडे जाळे अन् धुळ होती मग एका झाडूने सर्व झाडून काढले. आतापर्यंत नाकातून शिंका यायला सर्वात झाली होती, का तर मला दुळीची एलर्जी आहे. मग काय सर्व आवरून येऊन बसलो खुर्चीवर अन् न्याहाळत बसलो खोलीला तिचामध्ये खुप सर्व जुने ग्रंथ,पुस्तकं, वह्या, डायरी ठेवलेल्या होत्या. ज्या खुप जुन्या होत्या आमचा घराण्यात वाचनलेखन करायला माझा आजोबांना खूप आवडायचे. त्यांचा नंतर कदाचित मीच या खोलीत आलो असल, बाबांचं ते पुस्तकी ज्ञान पाहायला.कारण या खोलीकडे बाबा वारल्या नंतर कुणी फिरकलेच नाही मी प्रत्येक पुस्तक बघत होतो खुश होत होतो.आता बाबांचा प्रती मनात अजून एक नवीन आदरच स्थान निर्माण झालं होतं,एक वहीत बाबांनी लिखाण केलेलं ही सापडले अन् मी खुश झालो. कारण बाबांचा हा वारसा मी आता जपवत होतो काही वेळानं मी पण लिखाण करायला बसलो. थोडेफार लिखाण केले अन् पुन्हा बसून राहिलो मग YouTube वर search करत बसलो. अन् एकदम हिस्ट्री मध्ये मालगुडी डेज चे काही भाग दिसले त्यातला सर्वात आवडता माझा भाग एक गरीब आदमी मी बघत बसलो. जो मी आदी खुप वेळा बगितला आहे मला खूप आवडतो तो भाग दोन वेळा बगून झाले अन् मग झोप यायला लागली. मग काय त्या खोलीतच आजोबांचे जुने गोधडी चादर पडलेले होते ते घेतले अन् झोपलो, खरच आनंद वाटत होता आज कारण हल्ली वाचन फारसं कुणी करतच नाही. परंतु हे संस्कार मला लहानपणीच माझा आजोबाकडन भेटत गेले जेव्हा मला यातले फारसे काही समजत ही नव्हते. तर अशी ही माझी अडगळीतली खोली जिथं खुप आठवणी आहेत जिवंतरूपानं....
#एकखोलीअडगळीतली....
लिखित: भरत सोनवणे (सौमित्र).
मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख. खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे... तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा