मुख्य सामग्रीवर वगळा

बालपण आठवणीतले.....

लहानपण खरच किती निरागस असते नाही का ?

म्हणजे त्यावेळी नसते आपल्याला कुठली समज, काय वाईट,काय चांगले फक्त पोटभर खायला, फिरायला,अन् टवाळक्या मरायला भेटलं की बस काही लागत नसायचे....

लहानपणी अनेक गोष्टींचे आकर्षण असते ते पुढे आयुष्यभर कायम सोबत असते असे मला तरी वाटते. मग ते चांगले कपडे,चांगले बुट,चप्पल,कटिंग,केव्हा आई कुठे बाहेर गेली की उंच ठिकाणी ठेवलेला साखर,शेंगदाण्याचा डब्बा काढणे असो हे आपल्याला खुप आवडायचे....

लहानपणी मला किचन मधले जवळ जवळ सर्व डब्बे कुठे असता हे पाट होते.हा साखरेचा,तो पत्तीचा,मसाल्याचा,चटणीचा,शेंगदाण्याचा, खोबऱ्याचा,लाडूचा,चिवड्याचा,सर्व...

आता मात्र या उलट आहे जसा मोठा होत गेलो तसे किचनमध्ये जाणे कमी झाले.काळाच्या ओघात आता आईच म्हणते अरे खाऊन घे,भूक लागली नाही का ? अन् ते डब्बेही आता मला कुठे ठेवले आहे सापडेनासे झाले आहे....

लहानपणी माझा दिनक्रम एकूण असा असायचा   मोठा दादा व एक छोटी दीदी आहे मला.मग लहानपणी दादा शाळेत जायचा तेव्हा त्याचे अनुकरण मी करायचो....

मग मलापण त्याच्या सारखे दप्तर,पुस्तक,पाटी होती,डब्बा होता मग दादा शाळेत गेला की माझी शाळा आमच्या ओट्यावर असलेल्या गेलरीत भरायची.आई काम आवरून दिदीला सांभाळत असायची,मी आपले काडूमाडू काही तरी लिहायचं,मोठ्यानं दहा पर्यंत येणारी उजळणी म्हणत राहायचं....

मग आई मला घरा पासून दूर असलेल्या किराणा दुकानात एक पेटी (माचिस) आणायला एक रुपया द्यायची.एक पेटी व मला ८ संत्र्याच्या गोळ्या त्यात यायच्या,मग काय आपली मज्जा असायची. हे काम मला खूप आवडायचे लक्षात राहावे,म्हणुन मी रस्त्याने मोठ्याने घोकत चालायचं....

मला लहानपणी बुटांचे खूप आकर्षण होते,मग कपडे थोडे जुने जरी असले तरी मला चालायचं. माझ्याकडे नेहमी दोन जोड तरी शिल्लक असायचे,कुठेही फिरायला गेलो की मला फक्त बुट घ्यायला आवडायचे.अजूनही हे वेड तितकेच आहे किंचितही यात बदल झालेला नाही....

कटिंग हा माझा आयुष्यातला एक अनोखा आवडता प्रकार तेव्हा होता,आम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी कटिंग करायचो.म्हणजे कटिंगवाले ते बाबाच आमच्या घरी यायचे ओळखीचे होते ते फार,त्यांना ऐकायला कमी यायचे पण कटिंग भारी करून द्यायचे.....

एक पिशवी त्यात कैची,कंगवा,साबण,फुटका आरसा,असे त्यांचे साहित्य असायचे,धोतर घातलेले ते बाबा डोक्यात टोपी अन् बारीक शरीरयष्टी असलेले होते. आजही ते कटिंग करतात अन् मलापण ओळखतात,अजूनही भेटले की आवर्जून त्यांची विचारपूस होते....

नंतर मग थोडे मोठे झाल्यावर आम्ही तिघे भाऊ बहीण मम्मी बरोबर नाक्यावर असलेल्या त्या सलून मध्ये जायचो.ते सलून अन् तिथले काका अजूनही ओळखीचे आहे,मला कटिंग करायला खुप आवडायचे कटिंग करतानी ती मानेला होणारे गुद्गुद्द्दी अजुनही भारी वाटते....

कटिंग म्हणजे आमच्यासाठी सोहळा असायचा, ज्याची वाट मी नियमित बघत असायचो.एकूण असा होतो मी जरा वेगळा की इतरां सारखाच हे मात्र अजुन उमगले नाही....

#बालपण_आठवणीतले.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...