मुख्य सामग्रीवर वगळा

बालपण आठवणीतले.....

लहानपण खरच किती निरागस असते नाही का ?

म्हणजे त्यावेळी नसते आपल्याला कुठली समज, काय वाईट,काय चांगले फक्त पोटभर खायला, फिरायला,अन् टवाळक्या मरायला भेटलं की बस काही लागत नसायचे....

लहानपणी अनेक गोष्टींचे आकर्षण असते ते पुढे आयुष्यभर कायम सोबत असते असे मला तरी वाटते. मग ते चांगले कपडे,चांगले बुट,चप्पल,कटिंग,केव्हा आई कुठे बाहेर गेली की उंच ठिकाणी ठेवलेला साखर,शेंगदाण्याचा डब्बा काढणे असो हे आपल्याला खुप आवडायचे....

लहानपणी मला किचन मधले जवळ जवळ सर्व डब्बे कुठे असता हे पाट होते.हा साखरेचा,तो पत्तीचा,मसाल्याचा,चटणीचा,शेंगदाण्याचा, खोबऱ्याचा,लाडूचा,चिवड्याचा,सर्व...

आता मात्र या उलट आहे जसा मोठा होत गेलो तसे किचनमध्ये जाणे कमी झाले.काळाच्या ओघात आता आईच म्हणते अरे खाऊन घे,भूक लागली नाही का ? अन् ते डब्बेही आता मला कुठे ठेवले आहे सापडेनासे झाले आहे....

लहानपणी माझा दिनक्रम एकूण असा असायचा   मोठा दादा व एक छोटी दीदी आहे मला.मग लहानपणी दादा शाळेत जायचा तेव्हा त्याचे अनुकरण मी करायचो....

मग मलापण त्याच्या सारखे दप्तर,पुस्तक,पाटी होती,डब्बा होता मग दादा शाळेत गेला की माझी शाळा आमच्या ओट्यावर असलेल्या गेलरीत भरायची.आई काम आवरून दिदीला सांभाळत असायची,मी आपले काडूमाडू काही तरी लिहायचं,मोठ्यानं दहा पर्यंत येणारी उजळणी म्हणत राहायचं....

मग आई मला घरा पासून दूर असलेल्या किराणा दुकानात एक पेटी (माचिस) आणायला एक रुपया द्यायची.एक पेटी व मला ८ संत्र्याच्या गोळ्या त्यात यायच्या,मग काय आपली मज्जा असायची. हे काम मला खूप आवडायचे लक्षात राहावे,म्हणुन मी रस्त्याने मोठ्याने घोकत चालायचं....

मला लहानपणी बुटांचे खूप आकर्षण होते,मग कपडे थोडे जुने जरी असले तरी मला चालायचं. माझ्याकडे नेहमी दोन जोड तरी शिल्लक असायचे,कुठेही फिरायला गेलो की मला फक्त बुट घ्यायला आवडायचे.अजूनही हे वेड तितकेच आहे किंचितही यात बदल झालेला नाही....

कटिंग हा माझा आयुष्यातला एक अनोखा आवडता प्रकार तेव्हा होता,आम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी कटिंग करायचो.म्हणजे कटिंगवाले ते बाबाच आमच्या घरी यायचे ओळखीचे होते ते फार,त्यांना ऐकायला कमी यायचे पण कटिंग भारी करून द्यायचे.....

एक पिशवी त्यात कैची,कंगवा,साबण,फुटका आरसा,असे त्यांचे साहित्य असायचे,धोतर घातलेले ते बाबा डोक्यात टोपी अन् बारीक शरीरयष्टी असलेले होते. आजही ते कटिंग करतात अन् मलापण ओळखतात,अजूनही भेटले की आवर्जून त्यांची विचारपूस होते....

नंतर मग थोडे मोठे झाल्यावर आम्ही तिघे भाऊ बहीण मम्मी बरोबर नाक्यावर असलेल्या त्या सलून मध्ये जायचो.ते सलून अन् तिथले काका अजूनही ओळखीचे आहे,मला कटिंग करायला खुप आवडायचे कटिंग करतानी ती मानेला होणारे गुद्गुद्द्दी अजुनही भारी वाटते....

कटिंग म्हणजे आमच्यासाठी सोहळा असायचा, ज्याची वाट मी नियमित बघत असायचो.एकूण असा होतो मी जरा वेगळा की इतरां सारखाच हे मात्र अजुन उमगले नाही....

#बालपण_आठवणीतले.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...