मुख्य सामग्रीवर वगळा

बालपण आठवणीतले.....

लहानपण खरच किती निरागस असते नाही का ?

म्हणजे त्यावेळी नसते आपल्याला कुठली समज, काय वाईट,काय चांगले फक्त पोटभर खायला, फिरायला,अन् टवाळक्या मरायला भेटलं की बस काही लागत नसायचे....

लहानपणी अनेक गोष्टींचे आकर्षण असते ते पुढे आयुष्यभर कायम सोबत असते असे मला तरी वाटते. मग ते चांगले कपडे,चांगले बुट,चप्पल,कटिंग,केव्हा आई कुठे बाहेर गेली की उंच ठिकाणी ठेवलेला साखर,शेंगदाण्याचा डब्बा काढणे असो हे आपल्याला खुप आवडायचे....

लहानपणी मला किचन मधले जवळ जवळ सर्व डब्बे कुठे असता हे पाट होते.हा साखरेचा,तो पत्तीचा,मसाल्याचा,चटणीचा,शेंगदाण्याचा, खोबऱ्याचा,लाडूचा,चिवड्याचा,सर्व...

आता मात्र या उलट आहे जसा मोठा होत गेलो तसे किचनमध्ये जाणे कमी झाले.काळाच्या ओघात आता आईच म्हणते अरे खाऊन घे,भूक लागली नाही का ? अन् ते डब्बेही आता मला कुठे ठेवले आहे सापडेनासे झाले आहे....

लहानपणी माझा दिनक्रम एकूण असा असायचा   मोठा दादा व एक छोटी दीदी आहे मला.मग लहानपणी दादा शाळेत जायचा तेव्हा त्याचे अनुकरण मी करायचो....

मग मलापण त्याच्या सारखे दप्तर,पुस्तक,पाटी होती,डब्बा होता मग दादा शाळेत गेला की माझी शाळा आमच्या ओट्यावर असलेल्या गेलरीत भरायची.आई काम आवरून दिदीला सांभाळत असायची,मी आपले काडूमाडू काही तरी लिहायचं,मोठ्यानं दहा पर्यंत येणारी उजळणी म्हणत राहायचं....

मग आई मला घरा पासून दूर असलेल्या किराणा दुकानात एक पेटी (माचिस) आणायला एक रुपया द्यायची.एक पेटी व मला ८ संत्र्याच्या गोळ्या त्यात यायच्या,मग काय आपली मज्जा असायची. हे काम मला खूप आवडायचे लक्षात राहावे,म्हणुन मी रस्त्याने मोठ्याने घोकत चालायचं....

मला लहानपणी बुटांचे खूप आकर्षण होते,मग कपडे थोडे जुने जरी असले तरी मला चालायचं. माझ्याकडे नेहमी दोन जोड तरी शिल्लक असायचे,कुठेही फिरायला गेलो की मला फक्त बुट घ्यायला आवडायचे.अजूनही हे वेड तितकेच आहे किंचितही यात बदल झालेला नाही....

कटिंग हा माझा आयुष्यातला एक अनोखा आवडता प्रकार तेव्हा होता,आम्ही सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी कटिंग करायचो.म्हणजे कटिंगवाले ते बाबाच आमच्या घरी यायचे ओळखीचे होते ते फार,त्यांना ऐकायला कमी यायचे पण कटिंग भारी करून द्यायचे.....

एक पिशवी त्यात कैची,कंगवा,साबण,फुटका आरसा,असे त्यांचे साहित्य असायचे,धोतर घातलेले ते बाबा डोक्यात टोपी अन् बारीक शरीरयष्टी असलेले होते. आजही ते कटिंग करतात अन् मलापण ओळखतात,अजूनही भेटले की आवर्जून त्यांची विचारपूस होते....

नंतर मग थोडे मोठे झाल्यावर आम्ही तिघे भाऊ बहीण मम्मी बरोबर नाक्यावर असलेल्या त्या सलून मध्ये जायचो.ते सलून अन् तिथले काका अजूनही ओळखीचे आहे,मला कटिंग करायला खुप आवडायचे कटिंग करतानी ती मानेला होणारे गुद्गुद्द्दी अजुनही भारी वाटते....

कटिंग म्हणजे आमच्यासाठी सोहळा असायचा, ज्याची वाट मी नियमित बघत असायचो.एकूण असा होतो मी जरा वेगळा की इतरां सारखाच हे मात्र अजुन उमगले नाही....

#बालपण_आठवणीतले.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ