मुख्य सामग्रीवर वगळा

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

एकावेळी दोन आयुष्य जगणारी माणसं..!

खिडकी पल्ल्याड असलेल्या जगाला अलिकडे कित्येकदा निरखून बघत असतो.जसं मन अस्तित्वाच्या शोधार्थ भटकंती करायला लागलं आहे तसे हे खिडकी पल्ल्याड असलेलं जग खिडकीतून न्याहाळत असताना मला छान वाटायला लागलं आहे..!

कुणाच्या आयुष्यात खूप सर्व उजेड असल्यानं त्याचं आयुष्य खूप सुखाचे क्षण देऊ करणारं किवा प्रकाशमान झालेलं मला भासू लागलं आहे. सोबतच अनेकांच्या आयुष्यात ठरलेला तो कायमचा अंधार आणि काळोखात माखलेले त्यांचे आयुष्य बघितलं की,आयुष्याला घेऊन आपण उगाच अनेक नको त्या अपेक्षा करत बसतो याची प्रचिती होते..!

अलीकडे खिडकीत बसून अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकाग्र चित्ताने बसलं की आपोआपच सुटतात,त्यामुळं हे विंडोग्रीलच्या आधाराला बसून बाहेरचं जग न्याहाळणे आवडायला लागले आहे मला हल्ली..!

खूपवेळा विंडोग्रीलच्या आधाराला बसून असले की,अश्या काळोखाच्या रात्री स्ट्रीटलाईटच्या उजेडाखाली आयुष्य जगणारी माणसं मला खूप आवडतात.ते त्यांचे जीवन एका स्वतंत्र आयुष्यात जगत असतात,स्वतंत्र म्हणजे असे एकाच वेळी दोन आयुष्य,एक दाखवण्याचं अन् एक त्यांच्या विचारात विचार करत आपल्याच कोशात रममाण राहून जगत असलेलं आयुष्य...!
ही माणसं आयुष्याला घेऊन फार Positive नसतात पण एखाद्या गोष्टीचा लागलेला ध्यास त्यांना स्वस्त बसू देत नसतो,मग दिवसातील बराच वेळ त्या गोष्टीसाठी ते विचार करत असतात..!

खूपवेळा ठरवून अश्या माणसांना भेटायचा प्रयत्न केला.दिवसा ही माणसं क्वचितच बोलतात पण जसं काळोख होवू लागतो,तसे ही माणसे आपल्या मनातील चालू असलेले विचार किंवा आपलं दुसरे आयुष्य कुणी जाणून घ्यावं म्हणून प्रयत्न करत असतात..!
त्यांना अशी व्यक्ती फार सहज मिळत नाही,म्हणून ते काळोखात बसून आपल्याशीच बडबडत आपली आपल्या आयुष्याची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज स्वतः करून गणितं सोडवत राहतात.गणितं ती असता तरी कोणती,एकाचवेळी दोन आयुष्याची अन् सोबतच कित्येक माणसांची...!

कित्येकदा ठरवून बोलायचं ठरवतो अश्या या एकाकी आयुष्य झालेल्या माणसांना.परंतु त्यांनी मला रोजच जेव्हा काळोखात विंडोग्रीलच्या आधाराला बसून बाहेरचं जग न्याहाळताना पाहिलं होतं,तेव्हा त्यांनी केलेलं ते भेसुरी हास्य बघून माझ्या जीवाचा थरकाप झालेला..!
हे सर्व आठवून आपणही एका वेळी दोन आयुष्य जगतो,हे कोडं त्यांना सुटलं की काय..?
हा प्रश्न पडला म्हणून अलिकडे त्यांचा सहवास टाळतो आहे..!

पण मी सांगितल्याप्रमाणे या एकावेळी दोन आयुष्य जगणाऱ्या लोकांना जसा अंधार प्रिय असतो अन् प्रकाश नको असतो अन् काळोखात ज्याप्रमाणे या माणसांना आपलं ऐकून घेणारे कुणी हवं असतं अश्यावेळी मी त्यांना बोलावं असंही मला वाटतं..!
त्यांनाही वाटत असेल पण आम्ही एकाच वेळी दोन आयुष्य जगणारी माणसं जे आम्हाला दोघांना कळून चुकलं आहे,तेव्हा काळोखात काय बोलू आम्ही..!
म्हणून मग मी विंडोग्रीलच्या आधाराला बसून स्ट्रीट लाईटच्या उजेडात आपलं आयुष्य शोधणारी माणसं बघत बसतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...