मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य आणि क्युबिकल..!

आयुष्य आणि क्युबिकल..!

पावसाच्या अधूनमधून रिमझीम सरी कोसळत आहे,शहरावर धुक्यांची शाल पांघरली गेली आहे,संपूर्ण शहर धुकमय झालं आहे,आकाशातील ढगांना हात लावून अनुभवता येतंय,सोबतीला गुलाबी थंडीचा गारवाही अनुभवतोय यातच माझ्या नशिबाने मला मिळालेलं आसपासच्या हाकेच्या अंतरावर मिळालेलं निसर्ग सौंदर्य जे डोळ्यात कित्येकवेळा साठवूनही माझी भूक क्षमली नाहीये..!

कुणाला कसली भूक असते तर कुणाला कसली आमचा बाबतीत आम्हाला अश्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनसोक्त जगायला हवं असतं,बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा हे जग अनुभवलं..!

मी नेहमीच म्हणत असतो,शहराच्या चकमकीच्या फ्लेक्सच्या दुनियेत, ऑफिसच्या क्युबिकल्समध्ये आपण आपलं जगणं बंदिस्त करून घेतलं आहे.खरच आपण निसर्गाशी संवाद साधायला अन् त्याच्याशी एकरूप व्हायला विसरलो आहे..!

आपला प्रवास कधीचाच उलट्या दिशेने सुरू व्हायला हवा होता पण अजूनही कुणीतरी दुसरा तिसरा व्यक्ती शहर की और चलो..! चा नारा देतो आणि आपल्या गावाच्या प्रती,निसर्गाच्या प्रती जाग्या झालेल्या जाणिवा जाग्या होण्या आधीच मारून टाकतो आहे..!

व्यवहार कुणाला चुकत नाही ते आपल्यालाही चुकणार नाहीये त्यामुळे त्यांच्या शहर की और चलो..! या नाऱ्यात ही काही चुकीचं नाहीये.आपलं मन असो किंवा आता जगाच्या पाठीवर राज्य गाजवणाऱ्या आपल्या ज्या दोन पिढ्या आहे त्या,नेहमीच द्विधा मनस्थितीत जगत आल्या आहे.
अन् यातली पहिली पिढी आयुष्याचा शेवटचा काळ आता मोजत आहे.परंतु तरीही अजूनही ही पिढी द्विधा मनस्थिती सोबत घेऊन जगते आहे,पहिल्या पिढीचे भवितव्य संपूर्णपणे बरबाद झालं आहे...

या तरुण पिढीच्या हाताला सर्व आहे पण काही गोष्टी केव्हाच हातच्या हातून निसटून गेल्या आहे.कितीही मनाला वाटत असले तरीही एकोप्याची ही जाणीव अन् क्युबिकल्समध्ये बंदिस्त झालेलं आपलं उर्वरित आयुष्य आपल्याला त्या एका बाजूनं निर्णय घेऊ देणार नाहीये.कारण आता माणसं यंत्रवत झाली माणसांच्या मनावर यंत्राने ताबा मिळवला आहे..!
हे निसर्गाला केव्हाच कळून चुकलं आहे,त्यामुळे तो आपल्याला दूर करतोय अलिकडे त्याच्यापासून..!

उगाच थोरोला निसर्गाच्या सान्निध्यात आपलं उर्वरित जीवन जगण्याचे डोहाळे लागले नाही.तो काळाच्या,वेळेच्या खूप पुढे होता अन् त्यावेळी निसर्गाशी एकरूप राहून आपलं जीवन जगण्यात अर्थ आहे हे ज्यांनी हेरले ते क्युबिकल्समध्ये बंदिस्त न राहता आजही एका त्या उंचीच्या ठिकाणी आहेत..!
जिथवर जगावर राज्य गाजवणाऱ्या आजच्या या दोन पिढ्या सर्व काही असूनही जावू शकत नाहीये..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड