मुख्य सामग्रीवर वगळा

एक अनोखं विश्व..!

एक अनोखं विश्व..!

एक अनोखं विश्र्व..!

जोवर ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होत नाही तोवर आपण ठरवून काहीही केलेलं ठीक होत नसते किंवा कुठल्याही त्या गोष्टीसाठी जी आपल्याला करायची असूनही,तूर्तच करायची नसते तरीही आपण करत असतो ती कधीतरी पूर्णत्वाकडे किंवा पूर्णही होते पण मनातून ती गोष्ट करायची नसते,तेव्हा त्या पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी आपल्याला कुठलही सोयरसुतक नसते..!

आपण अनेकदा चालता बोलता म्हणून जातो की मनाच्या विरोधात जावून खूप काही आपण करू शकतो किंवा करायला हवं पण जेव्हा मनाच्या विरोधात जावून आपण काही गोष्टी करत असतो अन् त्यात जरी आपल्याला यश मिळत असेल,तरीही मनाला हवं असलेलं समाधान त्यातून आपल्याला भेटत नसते..!

अगदी आपण ठरवूनही किंवा मनाला कित्येकवेळा मारून त्याच्या विरोधात जावून कुठल्याही गोष्टी केल्या ज्या आपल्याला किंवा आपल्या स्वभावाला योग्य वाटत असल्या तरीही मनाला त्या पटत नसेल तर मानसिक समाधान आपल्याला मिळत नाही.हळूहळू अश्या गोष्टींचा किंवा मनाला समाधान भेटणार आहे,अश्या गोष्टी नाही भेटल्या की आपण आपोआपच मानसिक तणावात जातो अन् मानसिक आजाराचे निदान आपल्याला होते.यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नसते किंवा कोणाशी बोलायचीसुद्धा गरज नसते हे आपल्याला आपलेच आपोआप कळून चुकते..!

मनाच्या विरोधात जावून घेतलेले निर्णय एका स्टेपपर्यंत वाढले की मग मनाला घेऊन आपण फार विचार करायला लागतो मग आपलं मन आपल्याशी बोलू लागते.या स्टेपपर्यंत शक्यतो फार कुणी जात नाही,एक  तर तो अर्ध्यातच आपल्याला संपवतो किंवा आपल्या मनाला मारत उभे आयुष्य काढण्याची तयारी तो ठेवतो..!

अन् उभे आयुष्य जो मनाला मारून काढत असतो खूप संवेदनशील किंवा चार चौघात न रमणारा असतो.त्याला माणसांचा सहवास नकोसा असतो,त्याला फक्त मनाशी संवाद करायला भेटेल अश्या ठिकाणी तो तासंतास कोणाचीही उपस्थिती नसतांना,तो एकांताशी स्वगत करत,मनाशी मनाच्या गोष्टी करत,शून्यात हरवलेलं आपलं विश्व अन् भूतकाळात झालेल्या चुका आठवत त्याची वजाबाकी बेरीज करत बसलेला असतो..!

मनाला मारून जगणारे माणसं हे खूप आयुष्य जगतात पण त्यांच्या आयुष्यात त्यांना कुणीही नको असते.कारण त्यांची प्रत्येक एक गोष्ट ठरलेली असते,प्रत्येक एका गोष्टी मागे त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं.अशी माणसं वेळीच योग्य दिशेला गेली तर खूप पुढे जातात नाहीतर,त्यांचं हे आयुष्य फक्त प्लॅनिंग करण्यात जातं.ते ही इतक्या सर्व बारीक सारीक गोष्टीत की,ते एकांताशी सांजेच्या वेळी मनाशी स्वगत करत बसले तर ते बसल्या जागेवर आपण का बसलो आहे अन् समोर दिसणाऱ्या प्रत्येक ये-जा करणाऱ्या माणसांच्या आयुष्याचे संदर्भ ते लावत बसलेले असतात अन बहुतांश वेळा सत्तर टक्के त्यांचे हे हे संदर्भ अगदी बरोबर निघतात..!

कारण अश्या मानसिकता खचलेल्या असो किंवा मनाला मारून जगत असलेल्या व्यक्तींचे आपल्या सभोवताली घडत असलेल्या एक अन् एक गोष्टीवर इतके बारीक लक्ष असते की,कधीतरी ते रस्त्यानं चालत असताना आपले पाऊल पाच पाऊले टाकल्यावर सहावे पाऊल बरोबर तितक्याच अंतरावर टाकते का याचे सुद्धा गणित ते चालताना वेळोवेळी घेत असतात...

वर सांगितल्याप्रमाणे ही असं आयुष्य जगणारी माणसं मुळातच खूप हुशार असतात.त्यांच्या आत अनेक अश्या गोष्टी दडलेल्या असतात की,ज्या खूप काही वेगळ्या असतात,ज्यांचा उलगडा खूप सहज होवू शकत नाही.आपल्या या गोष्टी सांगायला त्यांना कुणी जवळचं विश्वासातले भेटले की ते त्या व्यक्तीच्या एका वाक्यावर त्यांचे कमीत कमी तीन वाक्य तरी बोलतात.कारण त्यांना आपलं ऐकून घेणारे अन् आपल्याला समजून घेणारं कुणी हवं असतं..!

हो ही इतके बोलणारी तीच माणसं असतात जी शब्दानेसुद्धा कुणाला बोलत नाही,ज्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे एक कथा असते,त्यांच्या प्रत्येक गोष्टी करण्यामागे एकच कारण राहते अन् खूप सर्व बारीक सारीक गोष्टींना घेऊन केलेलं प्लॅनिंग असते..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...