मुख्य सामग्रीवर वगळा

एक अनोखं विश्व..!

एक अनोखं विश्व..!

एक अनोखं विश्र्व..!

जोवर ठरवलेल्या गोष्टी मनासारख्या होत नाही तोवर आपण ठरवून काहीही केलेलं ठीक होत नसते किंवा कुठल्याही त्या गोष्टीसाठी जी आपल्याला करायची असूनही,तूर्तच करायची नसते तरीही आपण करत असतो ती कधीतरी पूर्णत्वाकडे किंवा पूर्णही होते पण मनातून ती गोष्ट करायची नसते,तेव्हा त्या पूर्ण झालेल्या गोष्टीसाठी आपल्याला कुठलही सोयरसुतक नसते..!

आपण अनेकदा चालता बोलता म्हणून जातो की मनाच्या विरोधात जावून खूप काही आपण करू शकतो किंवा करायला हवं पण जेव्हा मनाच्या विरोधात जावून आपण काही गोष्टी करत असतो अन् त्यात जरी आपल्याला यश मिळत असेल,तरीही मनाला हवं असलेलं समाधान त्यातून आपल्याला भेटत नसते..!

अगदी आपण ठरवूनही किंवा मनाला कित्येकवेळा मारून त्याच्या विरोधात जावून कुठल्याही गोष्टी केल्या ज्या आपल्याला किंवा आपल्या स्वभावाला योग्य वाटत असल्या तरीही मनाला त्या पटत नसेल तर मानसिक समाधान आपल्याला मिळत नाही.हळूहळू अश्या गोष्टींचा किंवा मनाला समाधान भेटणार आहे,अश्या गोष्टी नाही भेटल्या की आपण आपोआपच मानसिक तणावात जातो अन् मानसिक आजाराचे निदान आपल्याला होते.यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नसते किंवा कोणाशी बोलायचीसुद्धा गरज नसते हे आपल्याला आपलेच आपोआप कळून चुकते..!

मनाच्या विरोधात जावून घेतलेले निर्णय एका स्टेपपर्यंत वाढले की मग मनाला घेऊन आपण फार विचार करायला लागतो मग आपलं मन आपल्याशी बोलू लागते.या स्टेपपर्यंत शक्यतो फार कुणी जात नाही,एक  तर तो अर्ध्यातच आपल्याला संपवतो किंवा आपल्या मनाला मारत उभे आयुष्य काढण्याची तयारी तो ठेवतो..!

अन् उभे आयुष्य जो मनाला मारून काढत असतो खूप संवेदनशील किंवा चार चौघात न रमणारा असतो.त्याला माणसांचा सहवास नकोसा असतो,त्याला फक्त मनाशी संवाद करायला भेटेल अश्या ठिकाणी तो तासंतास कोणाचीही उपस्थिती नसतांना,तो एकांताशी स्वगत करत,मनाशी मनाच्या गोष्टी करत,शून्यात हरवलेलं आपलं विश्व अन् भूतकाळात झालेल्या चुका आठवत त्याची वजाबाकी बेरीज करत बसलेला असतो..!

मनाला मारून जगणारे माणसं हे खूप आयुष्य जगतात पण त्यांच्या आयुष्यात त्यांना कुणीही नको असते.कारण त्यांची प्रत्येक एक गोष्ट ठरलेली असते,प्रत्येक एका गोष्टी मागे त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं.अशी माणसं वेळीच योग्य दिशेला गेली तर खूप पुढे जातात नाहीतर,त्यांचं हे आयुष्य फक्त प्लॅनिंग करण्यात जातं.ते ही इतक्या सर्व बारीक सारीक गोष्टीत की,ते एकांताशी सांजेच्या वेळी मनाशी स्वगत करत बसले तर ते बसल्या जागेवर आपण का बसलो आहे अन् समोर दिसणाऱ्या प्रत्येक ये-जा करणाऱ्या माणसांच्या आयुष्याचे संदर्भ ते लावत बसलेले असतात अन बहुतांश वेळा सत्तर टक्के त्यांचे हे हे संदर्भ अगदी बरोबर निघतात..!

कारण अश्या मानसिकता खचलेल्या असो किंवा मनाला मारून जगत असलेल्या व्यक्तींचे आपल्या सभोवताली घडत असलेल्या एक अन् एक गोष्टीवर इतके बारीक लक्ष असते की,कधीतरी ते रस्त्यानं चालत असताना आपले पाऊल पाच पाऊले टाकल्यावर सहावे पाऊल बरोबर तितक्याच अंतरावर टाकते का याचे सुद्धा गणित ते चालताना वेळोवेळी घेत असतात...

वर सांगितल्याप्रमाणे ही असं आयुष्य जगणारी माणसं मुळातच खूप हुशार असतात.त्यांच्या आत अनेक अश्या गोष्टी दडलेल्या असतात की,ज्या खूप काही वेगळ्या असतात,ज्यांचा उलगडा खूप सहज होवू शकत नाही.आपल्या या गोष्टी सांगायला त्यांना कुणी जवळचं विश्वासातले भेटले की ते त्या व्यक्तीच्या एका वाक्यावर त्यांचे कमीत कमी तीन वाक्य तरी बोलतात.कारण त्यांना आपलं ऐकून घेणारे अन् आपल्याला समजून घेणारं कुणी हवं असतं..!

हो ही इतके बोलणारी तीच माणसं असतात जी शब्दानेसुद्धा कुणाला बोलत नाही,ज्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे एक कथा असते,त्यांच्या प्रत्येक गोष्टी करण्यामागे एकच कारण राहते अन् खूप सर्व बारीक सारीक गोष्टींना घेऊन केलेलं प्लॅनिंग असते..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड