मुख्य सामग्रीवर वगळा

एक साथी एैसा भी था..!

एक  साथी ऐसा भी था..,!


भर मध्यरात्रीची ती वेळ रस्त्याच्या मधोमध भरधाव वेगाने चालणारी आमची ट्रक,दोन्ही बाजूने दूरदूर एकही गाडी नाही एखादी जवळून गेली की नकळत अंगाला थंडगार वाऱ्याच्या झुळकेतून येणारे काटे,कॅबिनमध्ये मध्यस्थी असलेल्या आरश्याच्या फितीत गुंतवलेला रातराणीच्या फुलांचा गजरा अन् हिंदी,उर्दू गझल प्रिय असलेला आवडता मित्र ड्रायव्हर....

हा प्रवास आयुष्यभर संपावा वाटणार नाही असा होता,मोजून संपूर्ण एक दिवस अन् दोन रात्रींचा हा प्रवास आजही जवळ जवळ चार वर्षांपूर्वीचा हा प्रवास मला आठवतो.तो फक्त या प्रवासात ऐकलेल्या गाण्यांमुळे असो किंवा त्या रातराणीच्या फुलांच्या गजर्यामुळे आजही तो सुगंध मी अनुभवतो त्या आठवणींमधून...

रात्रीचा सोबतीला अधून मधून बरसणारा पाऊस झोप यायला लागली की,रस्त्याच्याकडेला ट्रक लावून वाफाळत्या चहाला रात्रीच्या कुठल्याही वेळेला अनुभवणे.वाफाळत्या चहाच्या वाफेत बघत ही रात्र मी जगत होतो,जी आजवर आता फक्त कल्पनेत जगत आलो आहे.
आयुष्यात इतकी सुंदर रात्र तरी आजवर नाही जगलो...

खूप लहान वयात खुप मोठ्या जबाबदाऱ्या मला माझ्या नशिबाने भेटत गेल्या त्यातीलच ही एक जबाबदारी होती,जी मी इतक्या लहान वयात एका मोठ्या हुद्यावर काम करतो याची मला जाणीव करून देत असायची...
परंतु आता हे सगळं मागे सुटले आहे,सगळं फक्त आठवणीत राहिलं आहे.माझ्या उद्याच्या उज्वल भविष्यासाठी इतकं सर्व आरामाचे जगणं सोडून मला स्वतःला आजमवण्यासाठी मला या रहदारीत पुन्हा एकदा रिकामे करून सोडून दिले मी कश्यासाठी..? का बरं..? याला उत्तरे नाही बस आयुष्यात संकटांशी दोन हात करायचे आहे मग असे अनुभव येतच असतील...

तर हा प्रवास रस्त्याने आमच्यासारखे भेटणारे असंख्य मुसाफिर,सोबतीने निसर्गाचे सौंदर्य आणि रात्री हवाहवा वाटणारा हा सहा पदरी रस्ता...
कतरा कतरा जिने दो,जिंदगी है..!
प्यासी हू मै प्यासी रहणे दो..!
हे एकच गाणं जवळ जवळ दोन तीन तास ऐकत बसलेलो तेव्हापासून हे गाणं कुठेही ऐकले की मी मला त्या प्रवासाच्या आठवणीत फिरवून आणतो...

फारच डुलकी असह्य झाली की दोन-तीन तास एखाद्या पेट्रोल पंपावर गाडी लावून मित्राचं झोपणं असायचं.अश्या प्रवासात मला कधी झोप लागत नाही,मग तो झोपला की आपलं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना बघत बसणे व्हायचं,विविध भाषेत बोलणारी ती ड्रायव्हर लोकं अन् त्यांचा हा जीवनप्रवास मी मग कल्पनेतून अनुभवायचो...

मित्र झोपला की सांगून झोपायचा थंडी वाजली कधीतर चहा घेऊन ये,कारण मला दोन दिवस सांभाळण्यासाठी त्याला दिलेली माझी जबाबदारी अन् त्याच्या मनात असलेला माझ्या बद्दलचा वयाने लहान असून असलेला आदर,आजही कुठे भेटलातर त्याचं तेच आदराने बोलणं. आयुष्यात काही माणसे खूप जवळची वाटतात,त्यातीलच हा एक मित्र त्यांच्यासोबत हे काही क्षण जगलो होतो...
सध्या दोघेही वेगळ्या वळणावर आहे,त्याचाही त्या गाडीवरचा प्रवास संपला आहे,पण आयुष्याच्या या वाटेवरती अनेकदा बऱ्याच वळणावर त्याची भेट होते....

मग रात्रभर त्याच्या आवडीच्या गझल ज्या त्याने एक पेन ड्राईव्हमध्ये भरून ठेवल्या होत्या त्या प्रवासात ऐकत बसायच्या,सोबतीला तो ही म्हणायचा त्याचा आवाजही खूप सुंदर,तो अत्तर लावायचा त्याचा येणारा सुगंध अन् या प्रवासात मला खास भेट म्हणून त्याने दिलेली अत्तराची कुप्पी पुढे कित्येक दिवस जपून ठेवली होती.वेळेच्या ओघात बऱ्याच गोष्टी माझ्यापासून दुरावल्या गेल्या त्यातच ही अत्तराची कुप्पीसुद्धा मी माझ्या बेफिकीरपणामुळे गमावून बसलो...

बाकी तो मित्र,त्याच्या उर्दू गझल,अत्तराचा सुगंध,विशिष्ट पेहराव,आदराने दिलेली हाक,मला रातराणीचा सुगंध आवडतो म्हणून रात्रीत दोनदा तो रातराणीचा फुलांचा गजरा बदलवून बदलवुन नवीन घेऊन लावायचा,तो दरवळ,कॅबिनमध्ये मला करून दिलेली जागा आणि हा सर्व प्रवास आठवणीत आहे....

आठवणीत आहे तू Azzahrudin bhai..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड