मुख्य सामग्रीवर वगळा

एक साथी एैसा भी था..!

एक  साथी ऐसा भी था..,!


भर मध्यरात्रीची ती वेळ रस्त्याच्या मधोमध भरधाव वेगाने चालणारी आमची ट्रक,दोन्ही बाजूने दूरदूर एकही गाडी नाही एखादी जवळून गेली की नकळत अंगाला थंडगार वाऱ्याच्या झुळकेतून येणारे काटे,कॅबिनमध्ये मध्यस्थी असलेल्या आरश्याच्या फितीत गुंतवलेला रातराणीच्या फुलांचा गजरा अन् हिंदी,उर्दू गझल प्रिय असलेला आवडता मित्र ड्रायव्हर....

हा प्रवास आयुष्यभर संपावा वाटणार नाही असा होता,मोजून संपूर्ण एक दिवस अन् दोन रात्रींचा हा प्रवास आजही जवळ जवळ चार वर्षांपूर्वीचा हा प्रवास मला आठवतो.तो फक्त या प्रवासात ऐकलेल्या गाण्यांमुळे असो किंवा त्या रातराणीच्या फुलांच्या गजर्यामुळे आजही तो सुगंध मी अनुभवतो त्या आठवणींमधून...

रात्रीचा सोबतीला अधून मधून बरसणारा पाऊस झोप यायला लागली की,रस्त्याच्याकडेला ट्रक लावून वाफाळत्या चहाला रात्रीच्या कुठल्याही वेळेला अनुभवणे.वाफाळत्या चहाच्या वाफेत बघत ही रात्र मी जगत होतो,जी आजवर आता फक्त कल्पनेत जगत आलो आहे.
आयुष्यात इतकी सुंदर रात्र तरी आजवर नाही जगलो...

खूप लहान वयात खुप मोठ्या जबाबदाऱ्या मला माझ्या नशिबाने भेटत गेल्या त्यातीलच ही एक जबाबदारी होती,जी मी इतक्या लहान वयात एका मोठ्या हुद्यावर काम करतो याची मला जाणीव करून देत असायची...
परंतु आता हे सगळं मागे सुटले आहे,सगळं फक्त आठवणीत राहिलं आहे.माझ्या उद्याच्या उज्वल भविष्यासाठी इतकं सर्व आरामाचे जगणं सोडून मला स्वतःला आजमवण्यासाठी मला या रहदारीत पुन्हा एकदा रिकामे करून सोडून दिले मी कश्यासाठी..? का बरं..? याला उत्तरे नाही बस आयुष्यात संकटांशी दोन हात करायचे आहे मग असे अनुभव येतच असतील...

तर हा प्रवास रस्त्याने आमच्यासारखे भेटणारे असंख्य मुसाफिर,सोबतीने निसर्गाचे सौंदर्य आणि रात्री हवाहवा वाटणारा हा सहा पदरी रस्ता...
कतरा कतरा जिने दो,जिंदगी है..!
प्यासी हू मै प्यासी रहणे दो..!
हे एकच गाणं जवळ जवळ दोन तीन तास ऐकत बसलेलो तेव्हापासून हे गाणं कुठेही ऐकले की मी मला त्या प्रवासाच्या आठवणीत फिरवून आणतो...

फारच डुलकी असह्य झाली की दोन-तीन तास एखाद्या पेट्रोल पंपावर गाडी लावून मित्राचं झोपणं असायचं.अश्या प्रवासात मला कधी झोप लागत नाही,मग तो झोपला की आपलं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना बघत बसणे व्हायचं,विविध भाषेत बोलणारी ती ड्रायव्हर लोकं अन् त्यांचा हा जीवनप्रवास मी मग कल्पनेतून अनुभवायचो...

मित्र झोपला की सांगून झोपायचा थंडी वाजली कधीतर चहा घेऊन ये,कारण मला दोन दिवस सांभाळण्यासाठी त्याला दिलेली माझी जबाबदारी अन् त्याच्या मनात असलेला माझ्या बद्दलचा वयाने लहान असून असलेला आदर,आजही कुठे भेटलातर त्याचं तेच आदराने बोलणं. आयुष्यात काही माणसे खूप जवळची वाटतात,त्यातीलच हा एक मित्र त्यांच्यासोबत हे काही क्षण जगलो होतो...
सध्या दोघेही वेगळ्या वळणावर आहे,त्याचाही त्या गाडीवरचा प्रवास संपला आहे,पण आयुष्याच्या या वाटेवरती अनेकदा बऱ्याच वळणावर त्याची भेट होते....

मग रात्रभर त्याच्या आवडीच्या गझल ज्या त्याने एक पेन ड्राईव्हमध्ये भरून ठेवल्या होत्या त्या प्रवासात ऐकत बसायच्या,सोबतीला तो ही म्हणायचा त्याचा आवाजही खूप सुंदर,तो अत्तर लावायचा त्याचा येणारा सुगंध अन् या प्रवासात मला खास भेट म्हणून त्याने दिलेली अत्तराची कुप्पी पुढे कित्येक दिवस जपून ठेवली होती.वेळेच्या ओघात बऱ्याच गोष्टी माझ्यापासून दुरावल्या गेल्या त्यातच ही अत्तराची कुप्पीसुद्धा मी माझ्या बेफिकीरपणामुळे गमावून बसलो...

बाकी तो मित्र,त्याच्या उर्दू गझल,अत्तराचा सुगंध,विशिष्ट पेहराव,आदराने दिलेली हाक,मला रातराणीचा सुगंध आवडतो म्हणून रात्रीत दोनदा तो रातराणीचा फुलांचा गजरा बदलवून बदलवुन नवीन घेऊन लावायचा,तो दरवळ,कॅबिनमध्ये मला करून दिलेली जागा आणि हा सर्व प्रवास आठवणीत आहे....

आठवणीत आहे तू Azzahrudin bhai..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...