मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची माझ्या सोबत भाग - ३.

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..!
भाग - तीन.

मागील भागात आपण कन्नड शहर आणि जवळपास असलेल्या छोट्या काही गावांची माहिती घेतली.सोबतच जगप्रसिद्ध पितलखोरा लेणी,पाटणादेवी मंदिर अन् जवळ असलेल्या डोंगररांगांची माहित घेतली.आता या भागात आपण सोयगाव,सिल्लोड तालुक्यातील काही लेणी,किल्ले अन् मंदिरांची माहिती घेणार आहोत.ही सर्व भ्रमंती करतांना आपल्याला हे सर्व स्थान कसे बघायचे,याची माहिती या लेखाच्या माध्यमातून मी देणार आहे...

कन्नड वरून गौताळा अभयारण्यात गेले की,गौताळा अभयारण्य बघितल्यावर आपल्याला याच परिसरात असलेला अन् आपण बघत असलेल्या स्थानपैकी दुसरा किल्ला बघायला भेटतो.
जो किल्ला कन्नडसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे,कन्नड शहरातील पर्यटन स्थळांची भेट घेत असताना प्रथमस्थानी हा किल्ला आहे.ज्याचे नाव "किल्ले अंतुर" असे आहे किल्ले अंतुर विषयी माझ्या ब्लॉगमध्ये सविस्तर लेखन केले असल्यामुळे येथे फार असे लिहणार नाही...
"किल्ले अंतुर" बघून आपण जेव्हा आपण भटकंती करत त्या परिसरात फिरत असतो,त्यावेळी आपल्याला या ठिकाणी "कोकणी आदिवासी" लोकांची वस्ती बघायला भेटते.ज्यांच्याकडून आपण येथील परिसर अन् त्यांचे जीवन याबद्दल सविस्तर माहिती घेऊन त्यांचे जीवन जवळून अनुभवू शकतो.
पुढे गेले की जवळच "काळदरी व्ही व्हेली" आहे. जीच्याबद्दल मी काही दिवसांपूर्वी एका लेखमध्ये सविस्तर लेखन केले आहे."काळदरी" या छोट्याशा गावाची भौगोलिक स्थिती अन् तेथील लोकांची दिनचर्या हे भौगोलिकस्थानांचे अभ्यास करण्यासाठी खूप अभ्यासपूर्ण असे गाव आहे.अनेक सोयींपासून वंचित असलेलं हे गाव जगापासून वेगळे झाल्यासारखे भासणारे आहे.तेथील लोकांचा दिवस हा सकाळी साधारण ८-१० दरम्यान उगवतो आणि साधारण ४वाजता मावळतो,हे सर्व तेथे राहून पर्यटकांना अनुभवता येईल...
"किल्ले अंतुर"जवळ काही अंतरावर आपल्या भ्रमंतीमधील तिसरा किल्ला म्हणजेच "लोंजा किल्ला" हा आहे.येथून पुढे गेले की आपल्याला पुरातन काळातील जोगेश्वरी देवींचे मंदिर बघायला भेटते.याच ठिकाणी लेण्या कोरण्याचा प्रयोग झालेला आपल्याला काही अंशी दिसून येतो .
पितळखोरा लेणी बघून झाली की आपल्याला नंतर बघायला भेटणारी दुसरी लेणी म्हणजे "कान्हेरगड" येथील "जैन लेणी" आहे जी सुद्धा बघण्यासारखी आहे लेणी अभ्यासकांनी आवर्जून भेट द्यावी या ठिकाणी असे ठिकाण हे आहे.पुढे नागद गावाजवळ गेले की आपल्याला "गोलटाक्या"म्हणून ठिकाण आहे ते बघायला मिळते याठिकाणीसुद्धा काही अंशी लेणी कोरण्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात...
याच मार्गाने आपण पुढे गेलो आपल्याला "बनोटी" जवळ "धारेश्र्वर लेण्या" बघायला मिळतात.यालाच "धारकुंड" किंवा "धारेश्वर लेण्या" असे म्हणतात.याच ठिकाणी पुढे गेले की आपल्याला "धारेश्र्वर धबधबा" बघायला मिळतो. मागील लेखात सांगितल्या प्रमाणे "धवलतिर्थ धबधबा" आणि "केदार्या धबधबा" हे दोन मोठाले धबधबे पाटणादेवी जवळ आहे.
"धारेश्र्वर धबधबा" बघून झाला की जवळच "वाडी सुतांडा" हा किल्ला आहे.येथे जवळपास ५२ पाण्याचे टाके आहे खूप सुंदर पद्धतीने याठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन केलेलं आपल्याला बघायला भेटते...
या मार्गाने आपण सतत पुढे गेलो की आपल्याला "घटोत्कच लेण्या" बघण्यास मिळतात जवळच अजून एक प्रसिद्ध किल्ला म्हणजेच "जंजाळ किल्ला" आहे.समोरच "वेताळवाडी" धरणाचा प्रचंड मोठा जलसाठा आहे,त्या बाजूलाच "वेताळवाडी किल्ला" आहे.ज्यास कुणी "हळद्या किल्ला" म्हणता तर कुणी "ढाकल्या किल्ला" असेही म्हणतात.यामुळेच या गावालाही "वेताळवाडी" असे नाव पडले आहे,सोबतच हळदा,ढाकला ही सुद्धा गावे जवळच्या परिसरात आहेत.जी फर्दापूर जवळ येतात.सोयगाव तालुक्यात हे सर्व ठिकाण येतात....

हे सर्व बघून झाले की डोळ्यांचे पारणे फेडणारे "गौताळा अभयारण्य" अन् तेथील सर्व ठिकाणे आवर्जून आपण बघायला हवे आहे..गौताळा अभयारण्य विषयी मी खूप मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे,गौताळा अभयारण्य विषयी आपणास माहिती हवी असेल तर माझे जुने लेख किंवा ब्लॉगला एकदा भेट द्या....
वरील माहिती संकलत करण्यासाठी मी स्वतः यातील बऱ्याच ठिकाणांना भेट दिली आहे.सोबतच प्रा.सूर्यवंशी सरांची विविध लेख,उपलब्ध व्हिडिओ माध्यमांतून मी ही माहिती मिळवली आहे.कन्नड तालुक्याचा इतिहास असो किंवा भौगोलिक माहिती,कन्नड आणि जवळपास असलेल्या तालुक्यातील आदिवासी,ठाकर,भिल्ल बांधवाचे जीवन सरांनी खूप जवळुन अनुभवले,बघितले आहे त्यांच्या जीवनावर बराच अभ्यास सरांनी केला आहे त्यामुळे या लेखांमध्ये सरांची बरीच मदत मला माहितीरुपाने झाली आहे....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड