मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची माझ्या सोबत भाग - ३.

सैर पर्यटनाची माझ्या सोबत..!
भाग - तीन.

मागील भागात आपण कन्नड शहर आणि जवळपास असलेल्या छोट्या काही गावांची माहिती घेतली.सोबतच जगप्रसिद्ध पितलखोरा लेणी,पाटणादेवी मंदिर अन् जवळ असलेल्या डोंगररांगांची माहित घेतली.आता या भागात आपण सोयगाव,सिल्लोड तालुक्यातील काही लेणी,किल्ले अन् मंदिरांची माहिती घेणार आहोत.ही सर्व भ्रमंती करतांना आपल्याला हे सर्व स्थान कसे बघायचे,याची माहिती या लेखाच्या माध्यमातून मी देणार आहे...

कन्नड वरून गौताळा अभयारण्यात गेले की,गौताळा अभयारण्य बघितल्यावर आपल्याला याच परिसरात असलेला अन् आपण बघत असलेल्या स्थानपैकी दुसरा किल्ला बघायला भेटतो.
जो किल्ला कन्नडसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे,कन्नड शहरातील पर्यटन स्थळांची भेट घेत असताना प्रथमस्थानी हा किल्ला आहे.ज्याचे नाव "किल्ले अंतुर" असे आहे किल्ले अंतुर विषयी माझ्या ब्लॉगमध्ये सविस्तर लेखन केले असल्यामुळे येथे फार असे लिहणार नाही...
"किल्ले अंतुर" बघून आपण जेव्हा आपण भटकंती करत त्या परिसरात फिरत असतो,त्यावेळी आपल्याला या ठिकाणी "कोकणी आदिवासी" लोकांची वस्ती बघायला भेटते.ज्यांच्याकडून आपण येथील परिसर अन् त्यांचे जीवन याबद्दल सविस्तर माहिती घेऊन त्यांचे जीवन जवळून अनुभवू शकतो.
पुढे गेले की जवळच "काळदरी व्ही व्हेली" आहे. जीच्याबद्दल मी काही दिवसांपूर्वी एका लेखमध्ये सविस्तर लेखन केले आहे."काळदरी" या छोट्याशा गावाची भौगोलिक स्थिती अन् तेथील लोकांची दिनचर्या हे भौगोलिकस्थानांचे अभ्यास करण्यासाठी खूप अभ्यासपूर्ण असे गाव आहे.अनेक सोयींपासून वंचित असलेलं हे गाव जगापासून वेगळे झाल्यासारखे भासणारे आहे.तेथील लोकांचा दिवस हा सकाळी साधारण ८-१० दरम्यान उगवतो आणि साधारण ४वाजता मावळतो,हे सर्व तेथे राहून पर्यटकांना अनुभवता येईल...
"किल्ले अंतुर"जवळ काही अंतरावर आपल्या भ्रमंतीमधील तिसरा किल्ला म्हणजेच "लोंजा किल्ला" हा आहे.येथून पुढे गेले की आपल्याला पुरातन काळातील जोगेश्वरी देवींचे मंदिर बघायला भेटते.याच ठिकाणी लेण्या कोरण्याचा प्रयोग झालेला आपल्याला काही अंशी दिसून येतो .
पितळखोरा लेणी बघून झाली की आपल्याला नंतर बघायला भेटणारी दुसरी लेणी म्हणजे "कान्हेरगड" येथील "जैन लेणी" आहे जी सुद्धा बघण्यासारखी आहे लेणी अभ्यासकांनी आवर्जून भेट द्यावी या ठिकाणी असे ठिकाण हे आहे.पुढे नागद गावाजवळ गेले की आपल्याला "गोलटाक्या"म्हणून ठिकाण आहे ते बघायला मिळते याठिकाणीसुद्धा काही अंशी लेणी कोरण्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात...
याच मार्गाने आपण पुढे गेलो आपल्याला "बनोटी" जवळ "धारेश्र्वर लेण्या" बघायला मिळतात.यालाच "धारकुंड" किंवा "धारेश्वर लेण्या" असे म्हणतात.याच ठिकाणी पुढे गेले की आपल्याला "धारेश्र्वर धबधबा" बघायला मिळतो. मागील लेखात सांगितल्या प्रमाणे "धवलतिर्थ धबधबा" आणि "केदार्या धबधबा" हे दोन मोठाले धबधबे पाटणादेवी जवळ आहे.
"धारेश्र्वर धबधबा" बघून झाला की जवळच "वाडी सुतांडा" हा किल्ला आहे.येथे जवळपास ५२ पाण्याचे टाके आहे खूप सुंदर पद्धतीने याठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन केलेलं आपल्याला बघायला भेटते...
या मार्गाने आपण सतत पुढे गेलो की आपल्याला "घटोत्कच लेण्या" बघण्यास मिळतात जवळच अजून एक प्रसिद्ध किल्ला म्हणजेच "जंजाळ किल्ला" आहे.समोरच "वेताळवाडी" धरणाचा प्रचंड मोठा जलसाठा आहे,त्या बाजूलाच "वेताळवाडी किल्ला" आहे.ज्यास कुणी "हळद्या किल्ला" म्हणता तर कुणी "ढाकल्या किल्ला" असेही म्हणतात.यामुळेच या गावालाही "वेताळवाडी" असे नाव पडले आहे,सोबतच हळदा,ढाकला ही सुद्धा गावे जवळच्या परिसरात आहेत.जी फर्दापूर जवळ येतात.सोयगाव तालुक्यात हे सर्व ठिकाण येतात....

हे सर्व बघून झाले की डोळ्यांचे पारणे फेडणारे "गौताळा अभयारण्य" अन् तेथील सर्व ठिकाणे आवर्जून आपण बघायला हवे आहे..गौताळा अभयारण्य विषयी मी खूप मोठ्या प्रमाणात लेखन केलेलं आहे,गौताळा अभयारण्य विषयी आपणास माहिती हवी असेल तर माझे जुने लेख किंवा ब्लॉगला एकदा भेट द्या....
वरील माहिती संकलत करण्यासाठी मी स्वतः यातील बऱ्याच ठिकाणांना भेट दिली आहे.सोबतच प्रा.सूर्यवंशी सरांची विविध लेख,उपलब्ध व्हिडिओ माध्यमांतून मी ही माहिती मिळवली आहे.कन्नड तालुक्याचा इतिहास असो किंवा भौगोलिक माहिती,कन्नड आणि जवळपास असलेल्या तालुक्यातील आदिवासी,ठाकर,भिल्ल बांधवाचे जीवन सरांनी खूप जवळुन अनुभवले,बघितले आहे त्यांच्या जीवनावर बराच अभ्यास सरांनी केला आहे त्यामुळे या लेखांमध्ये सरांची बरीच मदत मला माहितीरुपाने झाली आहे....

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...