मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!


यापूर्वी माझे "गौताळा अभयारण्य" अन् सभोवतालचा निसर्गरम्य परिसर या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे,अनेक दैनिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली सोबतच माझ्या स्वताच्या ब्लॉगमाध्यमातून मी तुम्हाला नेहमीच "गौताळा अभयारण्य" अन् परिसर याब्बदल माहिती देत आलो आहेच...
तर असेच काही दिवसांपूर्वी मी आपणास कन्नड तालुक्यातील "काळदरी" या गावाबद्दल थोडक्यात माहिती दिली. बऱ्याच मित्रांनी या गावास भेट देण्याची इच्छा दर्शविली.
परंतु,काळदरी इतकं सुंदर अन् भौगोलिकदृष्ट्या आपले वेगळेपण सिद्ध करणारे गाव असेल तर आम्हाला कन्नड तालुका अन् शेजारील तालुक्यातील काही सुंदर,निसर्गसंपन्न,निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध ठिकाणांची माहिती माझ्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा बऱ्याच जणांनी व्यक्त केली...
यामुळे मी "कन्नड,सोयगाव,सिल्लोड आणि चाळीसगाव" यांच्या सीमेवर असणाऱ्या "अजिंठा डोंगररांगा" आणि "गौताळा अभयारण्य" परिसरात असलेल्या काही विशेष ठिकाणांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे.या माहितीसाठी मी अनेक वेळा या परिसरात भटकंती केली,अनेक दैनिक,प्रा.सुर्यवंशी सरांचे भ्रमंतीपर काही उपलब्ध झालेले व्हिडिओ अश्या अनेक माध्यमातून ही माहिती मी मिळवून,संग्रही करून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे...
कन्नड,सोयगाव,सिल्लोड या तालुक्याच्या सीमारेषा अन् या सिमारेषला लागून असलेला हा परिसर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील स्वर्ग.
या परिसरात आपल्याला जवळपास ६ किल्ले,६ लेण्या आणि बऱ्यापैकी मोठी असलेली ४-५ धबधबे आहेत. आणि पुरातन काळातील शेकडो मंदिरे आहेत...
किल्ले- 
१) पाटणादेवी-कान्हेर गड.
२)अंतुर-किल्लेअंतुर किल्ला.
३)लोंजा किल्ला.
४)बनोटी-वाडी सुतांडा किल्ला.
५)सोयगाव-जंजाळा किल्ला.
६) जरंडी-वेताळवाडी किल्ला (ढाकल्या किल्ला,हळद्या किल्ला,सोयगावचा किल्ला).
६) कळंकी-पेडक्या किल्ला.
लेण्या-
१)कन्नड-पितळखोरा लेणी.
२)अंतुर किल्ल्याजवळ जोगेश्वरी लेण्या.
३)कान्हेरगड-जैन लेण्या.
४)बनोटी-धारेश्वर लेण्या.
५)वाडी सुतांडा जवळ -घटोत्कच लेण्या.
६) वेताळवाडी -रुद्रेश्वर लेण्या.

धबधबे-
१)देवदार धबधबा.
२)धारेवर धबधबा.
३)धवलतीर्थ धबधबा.
४)केदार्या धबधबा.
५)चंदननाला.
६)काळदरी व्ही व्हेली.

पुढील भागात हा प्रवास कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेल.
क्रमश:

Written by,
Bharat Sonwane

Photo Credit.
Gautala Wildlife Sanctuary All Tourist & Me

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड