मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!


यापूर्वी माझे "गौताळा अभयारण्य" अन् सभोवतालचा निसर्गरम्य परिसर या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे,अनेक दैनिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली सोबतच माझ्या स्वताच्या ब्लॉगमाध्यमातून मी तुम्हाला नेहमीच "गौताळा अभयारण्य" अन् परिसर याब्बदल माहिती देत आलो आहेच...
तर असेच काही दिवसांपूर्वी मी आपणास कन्नड तालुक्यातील "काळदरी" या गावाबद्दल थोडक्यात माहिती दिली. बऱ्याच मित्रांनी या गावास भेट देण्याची इच्छा दर्शविली.
परंतु,काळदरी इतकं सुंदर अन् भौगोलिकदृष्ट्या आपले वेगळेपण सिद्ध करणारे गाव असेल तर आम्हाला कन्नड तालुका अन् शेजारील तालुक्यातील काही सुंदर,निसर्गसंपन्न,निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध ठिकाणांची माहिती माझ्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा बऱ्याच जणांनी व्यक्त केली...
यामुळे मी "कन्नड,सोयगाव,सिल्लोड आणि चाळीसगाव" यांच्या सीमेवर असणाऱ्या "अजिंठा डोंगररांगा" आणि "गौताळा अभयारण्य" परिसरात असलेल्या काही विशेष ठिकाणांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे.या माहितीसाठी मी अनेक वेळा या परिसरात भटकंती केली,अनेक दैनिक,प्रा.सुर्यवंशी सरांचे भ्रमंतीपर काही उपलब्ध झालेले व्हिडिओ अश्या अनेक माध्यमातून ही माहिती मी मिळवून,संग्रही करून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे...
कन्नड,सोयगाव,सिल्लोड या तालुक्याच्या सीमारेषा अन् या सिमारेषला लागून असलेला हा परिसर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील स्वर्ग.
या परिसरात आपल्याला जवळपास ६ किल्ले,६ लेण्या आणि बऱ्यापैकी मोठी असलेली ४-५ धबधबे आहेत. आणि पुरातन काळातील शेकडो मंदिरे आहेत...
किल्ले- 
१) पाटणादेवी-कान्हेर गड.
२)अंतुर-किल्लेअंतुर किल्ला.
३)लोंजा किल्ला.
४)बनोटी-वाडी सुतांडा किल्ला.
५)सोयगाव-जंजाळा किल्ला.
६) जरंडी-वेताळवाडी किल्ला (ढाकल्या किल्ला,हळद्या किल्ला,सोयगावचा किल्ला).
६) कळंकी-पेडक्या किल्ला.
लेण्या-
१)कन्नड-पितळखोरा लेणी.
२)अंतुर किल्ल्याजवळ जोगेश्वरी लेण्या.
३)कान्हेरगड-जैन लेण्या.
४)बनोटी-धारेश्वर लेण्या.
५)वाडी सुतांडा जवळ -घटोत्कच लेण्या.
६) वेताळवाडी -रुद्रेश्वर लेण्या.

धबधबे-
१)देवदार धबधबा.
२)धारेवर धबधबा.
३)धवलतीर्थ धबधबा.
४)केदार्या धबधबा.
५)चंदननाला.
६)काळदरी व्ही व्हेली.

पुढील भागात हा प्रवास कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेल.
क्रमश:

Written by,
Bharat Sonwane

Photo Credit.
Gautala Wildlife Sanctuary All Tourist & Me

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...