मुख्य सामग्रीवर वगळा

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!

सैर पर्यटनाची सोबतीने माझ्या..!


यापूर्वी माझे "गौताळा अभयारण्य" अन् सभोवतालचा निसर्गरम्य परिसर या विषयावर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहे,अनेक दैनिकातून त्यांना प्रसिद्धी मिळाली सोबतच माझ्या स्वताच्या ब्लॉगमाध्यमातून मी तुम्हाला नेहमीच "गौताळा अभयारण्य" अन् परिसर याब्बदल माहिती देत आलो आहेच...
तर असेच काही दिवसांपूर्वी मी आपणास कन्नड तालुक्यातील "काळदरी" या गावाबद्दल थोडक्यात माहिती दिली. बऱ्याच मित्रांनी या गावास भेट देण्याची इच्छा दर्शविली.
परंतु,काळदरी इतकं सुंदर अन् भौगोलिकदृष्ट्या आपले वेगळेपण सिद्ध करणारे गाव असेल तर आम्हाला कन्नड तालुका अन् शेजारील तालुक्यातील काही सुंदर,निसर्गसंपन्न,निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध ठिकाणांची माहिती माझ्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा बऱ्याच जणांनी व्यक्त केली...
यामुळे मी "कन्नड,सोयगाव,सिल्लोड आणि चाळीसगाव" यांच्या सीमेवर असणाऱ्या "अजिंठा डोंगररांगा" आणि "गौताळा अभयारण्य" परिसरात असलेल्या काही विशेष ठिकाणांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे.या माहितीसाठी मी अनेक वेळा या परिसरात भटकंती केली,अनेक दैनिक,प्रा.सुर्यवंशी सरांचे भ्रमंतीपर काही उपलब्ध झालेले व्हिडिओ अश्या अनेक माध्यमातून ही माहिती मी मिळवून,संग्रही करून आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे...
कन्नड,सोयगाव,सिल्लोड या तालुक्याच्या सीमारेषा अन् या सिमारेषला लागून असलेला हा परिसर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील स्वर्ग.
या परिसरात आपल्याला जवळपास ६ किल्ले,६ लेण्या आणि बऱ्यापैकी मोठी असलेली ४-५ धबधबे आहेत. आणि पुरातन काळातील शेकडो मंदिरे आहेत...
किल्ले- 
१) पाटणादेवी-कान्हेर गड.
२)अंतुर-किल्लेअंतुर किल्ला.
३)लोंजा किल्ला.
४)बनोटी-वाडी सुतांडा किल्ला.
५)सोयगाव-जंजाळा किल्ला.
६) जरंडी-वेताळवाडी किल्ला (ढाकल्या किल्ला,हळद्या किल्ला,सोयगावचा किल्ला).
६) कळंकी-पेडक्या किल्ला.
लेण्या-
१)कन्नड-पितळखोरा लेणी.
२)अंतुर किल्ल्याजवळ जोगेश्वरी लेण्या.
३)कान्हेरगड-जैन लेण्या.
४)बनोटी-धारेश्वर लेण्या.
५)वाडी सुतांडा जवळ -घटोत्कच लेण्या.
६) वेताळवाडी -रुद्रेश्वर लेण्या.

धबधबे-
१)देवदार धबधबा.
२)धारेवर धबधबा.
३)धवलतीर्थ धबधबा.
४)केदार्या धबधबा.
५)चंदननाला.
६)काळदरी व्ही व्हेली.

पुढील भागात हा प्रवास कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेल.
क्रमश:

Written by,
Bharat Sonwane

Photo Credit.
Gautala Wildlife Sanctuary All Tourist & Me

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...