मुख्य सामग्रीवर वगळा

Morning Vibes..!

Morning Vibes..!

पहाटच्या साखर झोपेतच भर मध्यरात्रीपासून चालू असलेली पावसाची झड सकाळी उठेस्तोवर चालू होती,पाऊस म्हंटले की मग थंडी,गोधडी त्यात संपूर्ण अंग एकटवून झोपून राहणं,कल्पनेत बाहेरचा परिसर अनुभवत राहणं होतं...
फारफार तर विंडोग्रीलच्या पडद्याआडून बाहेर उसंत घेत असणारी गॅलरीतून पडत असलेली पावसाची थेंब बघत बसायची माझी सवय आहे,पाऊस मला पूर्वी कधीच आवडला नाही,त्याला कारणे अनेक होती.
परंतु आपल्या आवडल्या न आवडल्याने काही होत नसते अन् ते मला नकोही होते,कारण संपूर्ण सृष्टीचक्र त्यावर चालते....

पहाटेच्या फिरण्यासाठी तयार झालो.
ट्रॅकसूट,शूज घातले अन् निघालो आज नियमित फिरायला जाणाऱ्या रस्त्याकडे जायची मुळीच इच्छा नव्हती,तिकडे सकाळी फिरायला येणाऱ्या माणसाची फार गर्दी असते,कधीकधी ही गर्दी मला नकोशी वाटते.असेही मला आसपास माणसे नकोसे वाटतात,एकांताचा सानिध्यात मला माझं आयुष्य जगायला आवडते.त्यामुळे शक्य होईल तितकी मी गर्दी टाळतो,शक्य होईल तितके गर्दीकडे घेऊन जाणारे मार्ग टाळतो....

ठरल्याप्रमाणे निघालो, घरापर्यंत आता सिमेंटचे रोड झाले आहे पण त्यांना सोडून मी लालमातीच्या पायवाटांशी लगट करून मी चालू लागलो.लाल मातीच्या रानात मातीवर चहूकडे उगलेल्या हिरव्यागार गवताला बघत चालत होतो,पावसाची चालू असलेली झड आणि जमिनीचं भरलेलं पोट यामुळे बऱ्याच ठिकाणी खडकांतून पाणी मुरुन झऱ्यारूपातून वाहू लागलं आहे....
हिरव्या गवतावर झडीच्या पावसाने दवबिंदू चहूकडे पसरले आहे,त्यातून मी ढगाआड असलेल्या सूर्याच्या किरणांना बघत बघत वाट काढत चालत आहे,बघणाऱ्याच्या नजरेला निसर्गाशी जवळीक करता आली की तो निसर्गातील सामान्य गोष्टीत सौंदर्य,स्वर्ग अनुभवू शकतो मग त्यासाठी फार दूर जायची गरज नाहीये...

Actually माझे बालपण आणि आता तरुणपणसुद्धा या निसर्गाच्या सानिध्यात जात असल्यामुळं मला थोरोच्या नजरेतला निसर्ग असो किंवा त्याचा नदीचा किनारा असो अनुभवायला फार असे अवघड जात नाही....काळया खडकांच्या जमिनीशी लगट करून त्यावर पावलांना सावरत,बाजू असलेल्या हिरव्या मऊसुत वनस्पतीला काही क्षण तळहातांनी अनुभवत हा स्पर्श मनात घेऊन पुढे चालू लागलो....

अश्यावेळी मला माझाच झालेला एक गैरसमज दूर झाल्याचे अनुभवयास येते,की मला यापूर्वी म्हणजे साधारण दोन वर्षांपूर्वी वाटायचं की आपण पैश्यातून सर्व सुख विकत घेऊ शकतो.पैसा असला की सर्व काही आहे पण जसजसा या निसर्गाच्या सान्निध्यात गुंतत गेलो तेव्हा ही प्रचिती नेहमीच येत गेली की पैसा ही गोष्ट गौण आहे.एक विशिष्ट किमती लोक तो जमवला की किंवा काही अंशी जरी कमवला की आपण सुखी राहू शकतो हे कळून चुकलं आहे,पण ते ही आपण ठरवायचं आहे की आपण आपले सुख कश्यात शोधत आहोत.पैश्यात शोधत असाल तर त्यांना या माझ्या विश्वात माझ्या जगण्यात काही एक रस असणार नाही माझ्या बाबतीतसुद्धा त्यांच्यासाठी माझ्या मनात काही एक जागा नसेल.काही गोष्टींचा त्याग करावा लागतो काही मिळवण्यासाठी त्यामुळं साहजिक आहे,ज्याला जसं हवं तसे तो जगतो...

पाऊलवाटा सोडून केव्हाच मी भटकंती करत झाडा झुडपाच्या सहवासात दिसेल त्या जागेतून वाट काढत चाललो होतो,मध्येच एखाद्या झऱ्याच्या वाहत्या पाण्याला काही अडसर येत असेल असे बारीक बारीक दगडे पायांनी बाजुला करत,छोटी छोटी निळसर फुलं डोळ्यात सामावुन घेत, छोटुली बेंडके तीरतीर करत उड्या मारत होती त्यांना बघत उंच टेकडीच्या माथ्यावर जावून कितीवेळ बसून राहिलो.
दूरवर दिसणाऱ्या छोट्या छोट्या वाटा जिथवर नजर पुरेल तिथवर शहरीकरणाचा 'श' दिसणार नाही फक्त दिसेल तो हिरवा निसर्ग अनुभवत होतो.अश्यावेळी मनात येणारे विचार आणि मला जे काही हवे असते ते सर्व भेटले आहे याची होणारी जाणीव सुखद असते.आयुष्यातील काही क्षण या निसर्गाच्या सान्निध्यात मला जगायला भेटत आहे याचा आनंद वाटतो.

उंच टेकडीच्या माथ्यावरून दिसणारी धुके,आकाशात वाहणारी ढग अन काही ढग आपल्याला भेदून पुढे निघून जाताना, येणारा अनुभव आपण इतक्या उंचीवर आहे की ढगसुद्धा आपल्या सोबतीने या निसर्गात भ्रमंती करतो आहे ही फिलिंग फक्त अनुभवातून खूप छान वाटणारी आहे...
तृनांवर पडलेली धुके,ओस अन् त्यांची तयार झालेली जाळी त्याला हात लावून हलकेच हातावर येणारी दवबिंदू जेव्हा हातावर एकत्र येऊन पाण्यात रूपांतरित होतात तेव्हा ही प्रक्रिया फक्त माझ्यासाठी थांबली होती असे वाटते अन् मनाला हा काही क्षणांचा आनंद भेटतो....

कित्येकवेळ पानावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज,अधूनमधून पक्षांचा येणारा आवाज,कुठे एखाद्या झऱ्यातील पाणी एखाद्या कृत्रिम  रस्त्यातून खाली पडताना येणारा आवाज.कुठे खडकातून येणारं हेच पाणी एखाद्या बिळातून जमिनीत मुरताना येणारा आवाज,सगळ्यात आवडता वाऱ्याचा गोंघावणारा आवाज वेळोवेळी दिश्या बदलून वाहणारे वारे....

भर झडीच्या पावसात शिस्तीत काम चालू असलेली मुंग्यांची रांग,शेणाचे गोळे आपल्या शरीराने लोटणारा सर्वात मेहनती आणि निसर्गात मला सर्वाधिक प्रिय असलेला तो जीव,रुईच्या झाडावर लगडलेल्या फुलांत आपले परागकण मिळवून फिरणारी ती गांधिली,बागडणारी फुलपाखरे,मी ही त्यांच्यातला कुणी आहे ही जाणीव झाली की आपसूक माझ्याजवळ शरीराच्या समीप येऊन बागडणारी ती फुलपाखरे,सागाच्या पानावरून ओघळणारी पावसाची थेंबे.....
आणि शेवट होणारी जाणिव निसर्ग,पाऊस आणि मी जुळून आलेलं समीकरण..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड