मुख्य सामग्रीवर वगळा

गाव अन् गावची लोकं..!

गाव अन् गावची लोकं
भरर दुपारची वेळ होती उन्हं डोक्यावर आलेली,घामाचे ओघळ घरंगळत पाठीच्या लवणातून मोहम्मदचाच्या शरीराला चिटकलेल्या सदर्याला समीप होवून एखाद्या वाऱ्याच्या झोकाने सुकून सदर्यावर पांढऱ्या बुंदक्यातून ओघळणाऱ्या ओघळासारखे दिसून येत होते...
नदी ओलांडून मोहम्मदचाच्या आपल्या बकर्या घेऊन नदीच्या थडीथडीने,तापलेल्या वाळूत टाचावर वाळूत आपले पाय रोवत,एका हाताने उपरण्याने चेहऱ्यावरील घाम पुसत चालला होता....

मी पांदीच्या रस्त्यानं असलेल्या लक्ष्मीआईच्या देऊळात बसलो होतो,दूरवर स्मशानात तुळसाआईचं जळतं मडं जळत होतं.उंच उंच आकाशात जाळाचे लोळ दिसत होते,नदीच्या कडेला तुळसाआईचे वापरलेले नववार लुगडे अन् जरीच्या खणाच्या शिवलेल्या चोळीचे गाठुडे तिच्या नातवाने पाण्यात सोडायच्या हिशोबान ठेवले होते,तुळसाआईचा जावयाने त्याला ते गाठुडे पाण्यात टाकण्यास नकार देऊन काठावर ते ठेवायला सांगितले.वस्तीवरचे कुणी गरीब घटकाभरच्या वख्तानं येईल अन् ते गाठुडं घेऊन जाईल हे तुळसाआईच्या जावयाला ठाव होतं...

आकाशात उंच उंच आसमंतांशी एकरूप होणारे आगीचे लोळ अन् त्या आगीच्या पल्याड दिसणारा मोहम्मदचाच्या बकर्या हाकरीत चालला होता,त्याचे ते हाकरन्याचे बोल माझ्या कानापर्यंत येत होते...
ओ... आरे ओ..! उदर कहाॅं खपरीरे रांड..!
इदर ईत्ता घास छोडके उदर कहाॅं जारी,
छर छर अय केवढी..!
माॅका साला इकतो इत्तीसारी धूप अन् ये क्या बिचारी बुड्डी का आज इंत्काल हो गया,या मेरे आल्ल्हा बहोत बुरा हो गया रे..!

मी कधी त्या जळत्या तुळसाआईच्या प्रेताकडे बघत होतो तर कधी दूर हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहम्मद चाच्याकडे.त्याच्या बकऱ्या म्हणजे साऱ्या गावाच्या बांड बकऱ्या होत्या असं सारे गाव त्याला म्हणायचं.म्हणून त्याला शेताच्या रानाला कुणी बकऱ्या चरूंन द्यायचं नाही,तो बकर्याकडे लक्ष देत नाही असं सारा गांव म्हणायचा.
पहाट झाली की आठच्या वख्ताला गावातले रोजंदारीवर जगणारे लोकं आपली खपुडी घेऊन मोहम्मद चाच्याच्या बकर्याच्या वखरात घेऊन यायचे,मग मोहम्मदचाच्या महिन्यानं त्या बकऱ्या राखुळी करता राखायला घ्यायचा...

गाव धड गाडीवर चालू द्यायचा नाही अन् धड पायी चालू द्यायचा नाही...! ही गावची रित त्याला माहित होती,म्हणून तो बकऱ्या राखुळी करून आपले जीवन सुखाने जगत होता.आज वारलेल्या तुळसाआईची एक पाठसुद्धा मोहम्मद चाच्याकडे राखुळीला होती,म्हणून तो मनोमन बोलत,त्याला वाईट वाटलं अन तो तिच्याबद्दल रस्त्यानं बर्तळत चालला होता....

दुपारचे ऊन,तुळसाआईच्या प्रेताचे जळते मडे,आसमंतात एकरूप होणारी   आगीचे लोळ,बकऱ्यांचा आवाज,लाल मातीतून चालता चालतांना,बकऱ्यांच्या खुरातून उडणारी लाल माती,बकऱ्या पांदिने पुढे गेल्या की मुताच्या ओघळाचा पांदीने येणारा इसाडा वास,बंद झालेलं देऊळ अन् देवीच्या महुर ठेवलेलं काल परवाचं खोबरं कुरतडत असतांना येणारा उंदराचा आवाज....

मोहम्मद चाच्याचे माझ्या दिशेनं येणं,दूरवरूनच मी त्यांच्या नजरेत नजर न घालता माझ्या विश्वात रममान असल्याचं दाखवणं. त्यांनी हटकवत मला विचारणं,इधर कहा हिंडरा रे..?
मी अडखळत उत्तर देणं..! 
कुछ नही चाच्या ओ आयेलता आपने गाव मी तुळसाआईका जनाजे के संग..!
इतक्यात काय व्हावं कडाडकन आवाज व्हावा जसं कुणाच्या डोक्याची कवटी फुटावी अन् मी वेड्यागत मोहम्मद चाच्याच्या डोळ्यांमध्ये बघावं,काहीतरी झालं आहे पण मला न सांगता त्यांनी उसने अवसान घेऊन तिथून निघावं अन् मला म्हणावं जा घरकु जा..!

क्रमशः

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड