मुख्य सामग्रीवर वगळा

विचाराने दाटून आलेली सायंकाळ...


अलीकडे सांजवेळी जेव्हा सुर्य अस्ताला जात असतो...अन मी वेशीच्या पल्याड असलेल्या पिंपळाच्या झाडाला चहुबाजुंनी बांधलेल्या ओट्यावर बसलेलो,चहुकडं असलेली ती सर्व मोकळीक.
दुपारची झोप अजुन डोळ्यात तरळत आहे,हातपाय धूवुन पारावर बसायला आलोय. डोळ्यांच्या पापण्यांची अन बुबुळांची झुकण्यासाठीची तडजोड जाणवत आहे...

जसंजसं समोर सर्व दृश्य दिसतंय मन अस्वस्थ होत
आहे,या अस्वस्थ होण्याला कारण माहीत नाही. कदाचित शांत असणारा परिसर,गरम झळ्यांतुन अलवार संथ वाहणाऱ्या वाऱ्याकडे होणारा वाऱ्याचाच प्रवास...

पिंपळाची पानं स्वच्छ,हिरवीगार दिसताय. लाॅकडाऊनमुळे न झालेलं प्रदुषण आणी टवटवीत झालेली झाडं,वेली,पानं,फुल सुंदरच मांणसाच काय होईल माहिती नाही,पण निसर्गाला लाॅकडाऊन मानवला आहे. सर्व सुंदर वाटत आहे,स्वच्छ निर्मळ वाहणारे वारे झोके घेताय अन् मनाशीच आठवणींचे गुज गात आहे. पण...पण कितीही टाळले तरी डोळ्यांना दिसणारी अस्वस्थता टाळता येणारी नाहीये...

मंदिराचे दरवाजे गेले दोन महीने बंदच आहे,कदाचित ती आता पुन्हा पाण्याचे संकट उभे राहिले की,मंदिरातील देव पाण्यात बुडविण्यासाठीच काही काळ उघडी केली जातील असे वाटत आहे...मंदिराच्या लाकडी दरवाज्याला धुळीचा थर जमा झाला आहे,देवाला लाॅकडाऊन असल्यासारखे त्याच्याकडे कुणी फिरकत नाही. सांजवेळी लागणारा दिवा गेली दोन महिने लागतच नाहीये,अश्यावेळी दिव्यातून अधुरी राहिलेली वात घेऊन जाणारा उंदीरही हल्ली दिव्यापाशी दिसत नाही. नारळ फोडायचा दगड भुरका पडला आहे,वळवाच्या पावसाने त्या दगडावर पावसाचे पडलेले ओघळ संकेत देऊन जातात की,अजून संकट टळले नाहीये...

मंदिर बंद आहे,शाळा बंद आहे,शेजारीच असलेली अंगणवाडी कधीतरी उघडी दिसते. शेवटचा अंगणवाडीतील भात कधी शिजला माहीत नाही... अन् लहानग्या पोराला रिकाम्या पोटासाठी सरकारचा तांदूळ,सुगडी,वाटाणा,कधी वाटप झाला हे ही आठवत नाहीये...

एक मात्र हालचाल होत असते नदीच्या थडीला,पाणी आटले आहे. रोज वाळूचे ट्रॅक्टर भरून चालले आहे,शिस्तीत काम चालतं इथे काही भांडण नाही की काही नाही.याने सुद्धा एक फायदा झाला आहे की,पावसाळ्यात स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता चांगला पक्का झाला आहे वाळूंचे ट्रॅक्टरं वाहून वाहून...

स्मशानभूमी... तिचे काय चालणार आहे ती घरातल्या चुली सारखी चालूच आहे,जशी चुलीतली आग विझत नाही तशीच स्मशान भूमीतली आग विझत नाही...एक मात्र झालं आहे मेल्या माणसां बरोबर फक्त स्मशानभूमी बघायला येणाऱ्या बघ्यांची गर्दी हल्ली होत नाही.
नदीतले पाणी मयत माणसाला पाजायला भेटत नाही,नदी दुरपर्यंत आटली आहे.म्हणून घरूनच एक पाण्याचा जार हो जार,क्यान नाही ती कधीच काळाच्या आड गेली तो घरूनच भरून आणावा लागतो...

सर्व अस्वस्थ आहे,कधी ही वेळ निघून जाईल सांगता येत नाही. रस्त्यांनी अनवाणी चालणारे भुकेले चेहरे दिसतात तेव्हा काहीच करता येत नाही,हतबल आहोत आम्ही बस बाकी काहीच नाही....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ