मुख्य सामग्रीवर वगळा

जगणे हरवलेली माणसे...



सांजवेळ दाटलेली,

पैल पोहचला थवा..!

जीर्ण आभाळास आता सुर्य का हवा नवा,

मंत्र झालेल्या मैफिलीला चंद्र का हवा नवा...!


कधीतरी काही दृश्य मनात पक्के खिळवून बसतात अन् कधीतरी नकळत अश्या काही ओळी कानावर पडल्या की,ते दृष्य डोळ्यासमोर येत जाते...मग तो क्षण विचारांमध्ये अनुभवण्यासाठी मनातच विचारांचे काहूर निर्माण होते...

पुढे कितीवेळ मन त्या ओळींचा अर्थ शोधत गुंतवून घेतं स्वत:ला त्या दृश्यात...
भर उन्हात कधीतरी अनुभवलेला तो क्षण असतो,अाठवून जातो अन् तेव्हाच या ओळींशी त्याचे साधर्म्य जुळवून येते....

भर दुपारी रस्त्याच्या कडेला कोरलेल्या डोंगरात कधीतरी दिसून जातो तो माणूस,काय करत असतो माहीत नाही....
विस्कटलेले केस,बहुतेक पांढरा सदरा घातलेला असतो त्याने,घामाच्या ओघळामुळे एक विचित्र आकृती त्याच्या पूर्ण अंगावर निर्माण झालेली असते,अनवाणी असतो भटकत डोंगरांनी खांद्यावर एक पिशवी घेऊन.काय असते माहीत नाही त्यात,पण तिला तो खूप जपवत असतो अगदी जिवापाड...

या पिशवीत बघून त्याच्या निरागस चेहऱ्यावर येणारं ते क्षणिक हास्य त्याला व मलाही सुख देऊन जाते....त्याच्या या मला सुखात भागीदार व्हायचे नाही,पण त्याचा हा आनंद मलाच अनेक प्रश्न,सुख देऊन जातो.
काय असल त्याच्या अश्या या जगण्याचे गमक ?

म्हणायला ही आमची भेट पण आहे की माहीत नाही,पण हे काही क्षण आयुष्यभर तो जगण्याशी संघर्ष करतोय याची जाणीव करून देत राहतात....
तो हरवूनही जातो जंगलात,मी मात्र त्या हरवलेल्या आकृतीकडे तिला कल्पनेत नजरेत साठवत.बघत बसतो पाठमोरा तो जंगलात हरवलेला,सोबतीला अनेक प्रश्न घेऊन...

वेळ कुणालाही नाहीये रस्त्याच्या या वाटसरूंबद्दल विचार करायला,पण त्यांची वेळ मात्र आपल्याला बघत,आपल्या सारख्या कित्येकांना बघत विचार करत जात असेल नाही का ?

शेवट मीच का हा विचार करावा,यालाही उत्तर नाही.कधीतरी मी पण हळवा होऊन जातो विचाराने म्हणून असेल कदाचित,पण हे हळवेपण अश्या गोष्टी देऊन जाते ज्यांना उत्तरे नसतात आणी काय साध्य करायचे असते हे पण समजत नाही...

काही क्षण आयुष्यातून निसटून जातात नकळत जे नंतर त्रास देतात वेळीच त्याची उत्तरे न शोधल्यामुळे,अलीकडे यांची यादी खूप वाढलेली आहे...

पुढे कधीतरी रस्त्यावर भर घाटात असलेल्या मंदिरा जवळ,पुढील प्रवास सुखाचा होवो म्हणून आशेमारी गाडीमधून प्रवाशांनी फेकलेल्या दहा रुपयांच्या नोटा अन् विविध नाण्यांना जमा करताना तो दिसून जातो...

इथे त्याच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न असतात,कदाचित त्याने सुखाची व्याख्या केली आहे.त्याला या पैशात फक्त व्यवहार दिसतो,सुख नाही पण कोणीतरी फेकलेल्या त्या पैश्यांवर त्याचं आज पोट भरणार आहे हे खूप बरं असतं...

म्हणजे त्याचंही पोट भरेल आणी गाडीवाल्याला सुद्धा त्याचा आशिर्वाद भेटल,मंदिर मात्र एक दुवा असेल दोघांमध्ये पोट भरण्याचा आणी श्रध्देचा....तेव्हा नियतीचं जुळून आलेल हे कोडं मला उमगलेलं असेल,आणी माझी काही प्रश्न सुटत जातील,हे असेच चालत राहावं बस....

अलीकडे काळ खूप वाईट आहे,जगण्यासाठी व्यवहारी व्हावं लागतं,मग अनेक प्रश्न सुटतात जगण्यासाठीचे.काही सोडून दिली तरी चालतात काळाच्या पल्याड होण्याआधी अपेक्षित उत्तरे त्यांना पण भेटून जातात,फक्त शोधत राहावे लागेल माणुसकीत आणी माणसात ती पडणारी प्रश्न....

#जगणं_हरवलेली_माणसं...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...