मुख्य सामग्रीवर वगळा

जगणे हरवलेली माणसे...



सांजवेळ दाटलेली,

पैल पोहचला थवा..!

जीर्ण आभाळास आता सुर्य का हवा नवा,

मंत्र झालेल्या मैफिलीला चंद्र का हवा नवा...!


कधीतरी काही दृश्य मनात पक्के खिळवून बसतात अन् कधीतरी नकळत अश्या काही ओळी कानावर पडल्या की,ते दृष्य डोळ्यासमोर येत जाते...मग तो क्षण विचारांमध्ये अनुभवण्यासाठी मनातच विचारांचे काहूर निर्माण होते...

पुढे कितीवेळ मन त्या ओळींचा अर्थ शोधत गुंतवून घेतं स्वत:ला त्या दृश्यात...
भर उन्हात कधीतरी अनुभवलेला तो क्षण असतो,अाठवून जातो अन् तेव्हाच या ओळींशी त्याचे साधर्म्य जुळवून येते....

भर दुपारी रस्त्याच्या कडेला कोरलेल्या डोंगरात कधीतरी दिसून जातो तो माणूस,काय करत असतो माहीत नाही....
विस्कटलेले केस,बहुतेक पांढरा सदरा घातलेला असतो त्याने,घामाच्या ओघळामुळे एक विचित्र आकृती त्याच्या पूर्ण अंगावर निर्माण झालेली असते,अनवाणी असतो भटकत डोंगरांनी खांद्यावर एक पिशवी घेऊन.काय असते माहीत नाही त्यात,पण तिला तो खूप जपवत असतो अगदी जिवापाड...

या पिशवीत बघून त्याच्या निरागस चेहऱ्यावर येणारं ते क्षणिक हास्य त्याला व मलाही सुख देऊन जाते....त्याच्या या मला सुखात भागीदार व्हायचे नाही,पण त्याचा हा आनंद मलाच अनेक प्रश्न,सुख देऊन जातो.
काय असल त्याच्या अश्या या जगण्याचे गमक ?

म्हणायला ही आमची भेट पण आहे की माहीत नाही,पण हे काही क्षण आयुष्यभर तो जगण्याशी संघर्ष करतोय याची जाणीव करून देत राहतात....
तो हरवूनही जातो जंगलात,मी मात्र त्या हरवलेल्या आकृतीकडे तिला कल्पनेत नजरेत साठवत.बघत बसतो पाठमोरा तो जंगलात हरवलेला,सोबतीला अनेक प्रश्न घेऊन...

वेळ कुणालाही नाहीये रस्त्याच्या या वाटसरूंबद्दल विचार करायला,पण त्यांची वेळ मात्र आपल्याला बघत,आपल्या सारख्या कित्येकांना बघत विचार करत जात असेल नाही का ?

शेवट मीच का हा विचार करावा,यालाही उत्तर नाही.कधीतरी मी पण हळवा होऊन जातो विचाराने म्हणून असेल कदाचित,पण हे हळवेपण अश्या गोष्टी देऊन जाते ज्यांना उत्तरे नसतात आणी काय साध्य करायचे असते हे पण समजत नाही...

काही क्षण आयुष्यातून निसटून जातात नकळत जे नंतर त्रास देतात वेळीच त्याची उत्तरे न शोधल्यामुळे,अलीकडे यांची यादी खूप वाढलेली आहे...

पुढे कधीतरी रस्त्यावर भर घाटात असलेल्या मंदिरा जवळ,पुढील प्रवास सुखाचा होवो म्हणून आशेमारी गाडीमधून प्रवाशांनी फेकलेल्या दहा रुपयांच्या नोटा अन् विविध नाण्यांना जमा करताना तो दिसून जातो...

इथे त्याच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न असतात,कदाचित त्याने सुखाची व्याख्या केली आहे.त्याला या पैशात फक्त व्यवहार दिसतो,सुख नाही पण कोणीतरी फेकलेल्या त्या पैश्यांवर त्याचं आज पोट भरणार आहे हे खूप बरं असतं...

म्हणजे त्याचंही पोट भरेल आणी गाडीवाल्याला सुद्धा त्याचा आशिर्वाद भेटल,मंदिर मात्र एक दुवा असेल दोघांमध्ये पोट भरण्याचा आणी श्रध्देचा....तेव्हा नियतीचं जुळून आलेल हे कोडं मला उमगलेलं असेल,आणी माझी काही प्रश्न सुटत जातील,हे असेच चालत राहावं बस....

अलीकडे काळ खूप वाईट आहे,जगण्यासाठी व्यवहारी व्हावं लागतं,मग अनेक प्रश्न सुटतात जगण्यासाठीचे.काही सोडून दिली तरी चालतात काळाच्या पल्याड होण्याआधी अपेक्षित उत्तरे त्यांना पण भेटून जातात,फक्त शोधत राहावे लागेल माणुसकीत आणी माणसात ती पडणारी प्रश्न....

#जगणं_हरवलेली_माणसं...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ