मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...


हरवलेलं गावपण अन् आठवणीतले शहर...


सांजेच्या प्रहरी रामाबाबा आपली बैलगाडी अन् दुधाची क्याटली घेऊन वावरातून निघाला,रस्त्यात गुरांसाठी काढून ठेवलेला हिरवा घास,मक्काची बारीक केलेली कुट्टी घेऊन तो ती बैलगाडीत टाकून तो रस्त्याला लागला. रस्त्यात सुमनबाई,शैली अन् सुमनबाईची नवी सूनबाई त्याला दिसल्या त्यांनाही त्याने बैलगाडीत बसवुन घेतले...

रस्त्यात चहूकडे बैलांच्या खुराने उडणारी धूळ,त्यात लालभडक दिसणारा मावळता सुर्य मी बघत होतो...पायी चालत असल्याने एरवी रामाबाबा माझ्यापुढे निघून गेला हुता. बोडक्या टेकडीवर भिलाबाबाच्या दावणीला असलेल्या बक्र्या म्या... म्या... करीत ओरडत होत्या,भिलाबाबा तांब्या घेऊन बकरीचं दूध काढत बसला होता,मला बघून त्यानं शीळ फुंकली अन् मला त्याच्याकडे यायला खुणावू लागला मी हातवारे करून सांगितले येतुया...

मी ठोकरा खात कसातरी भिलाबाबाच्या झोपडी पर्यंत पोचलो,अंगणात उभी केलेली खाट त्याने आडवी केली व मला बसायला लावले,मी बसलो...त्याने त्याच्या लेकीला राणुबाईला बकरीच्या दुधाची तीन कप चहा ठेवायला सांगितली अन् तो बकऱ्या बांधू लागला व मला बोलूही लागला...

मग काय छोटे सरकार आज वावराकडं आला हुतं का काय.?
नाही ओ अण्णा घरला करमत नाय मग आलो हुतो चारला सांच्या वख्ताला,म्हंटल जरा चारा पाणी करू अन् जाऊ घरी तितकंच घरात कोंडल्यावानी हुनार नाय....

तुमचं काय चाललंय आण्णा..? बकऱ्या आणल्या का नाय नव्या यंदाच्या वर्षाला..?
कसल्या बकऱ्या अन् कसल्या काय छोटे सरकार,यांनाच चारा पाणी करायला जीव जातूया अन् आजूबाजूला चारा बी नाय रायला.दूरदूर हिंडा लागायलं डोंगरात या माझ्या शान्या लेकरांना घेऊन,लेक जाती शाळेला अन् आता काय कुठला रोग आलाया मग ती पण घरला आहे.सरकार म्हणतोय घराला रहा,आता या बकर्यांना घेऊन कसा घरला राहू लेका तूच सांग...

इतक्यात राणुबाई चहा घेऊन येते...
चहा घ्या सरकार ती बोलती झाली...
अरे रानुबाई तुम्ही किती मोठ्या झाला,मागे एकदा आलो होतो तेव्हा ते लंगडी पाणी खेळत होता अंगणात अन् आता चहा करून दिला,काकू कुठं गेली हायसा राणुबाई...?
ती गेलीया सरपन आणाया शेजारच्या डोंगराला...
बरं आण्णा येऊ का,म्हणत मी त्यांना निरोप देऊन तिथून निघालो...

पाटाच्या रस्त्याने एक बाजूनं पाटामधून वाहणारं पाणी अन् एक बाजूनं येणारी,जाणारी शेतातील लोकं दिसत होती. मी चालत चालत पुढे एका पुलावर येऊन बसलो...अन् पुलाखाली असलेल्या त्या पाणकोंबड्या बघत बसलो पाण्यात,अधून मधून टीटवी टिव-टिव करत डोक्यावरून घिरट्या घालत होती. मी त्या पाण्यात बघत होतो,दूरवर पांढरे दोन-तीन बगळे पाण्यात चोच घालून,वर काढून काहीतरी शिकार घेऊन पळून जात होते...

सर्व जिथल्या तिथं चालू होते,खेडी दुपारी ओस पडलेल्या स्मशानागत भासायची,सांज ढळता-ढळता त्यांच्यात अनोखं चैतन्य निर्माण होत असे. अलीकडे या गावाबद्दल कधी विचारच केला नव्हता म्हणून काही उमगत नव्हतं,सतत जगण्याशी चाललेली स्पर्धा आणि पैसा यात स्वताला झोकन दिले होते आपण सर्वांनी....
गेला काही काळ आपल्याला पूर्वपदावर घेऊन आला आहे,त्याने पुन्हा एकदा निसर्ग शहाणा आहे दाखवून दिले होते,मी या विचारात असतांना शंकर दादाची बॉक्सर गाडी आली अन् मी तिच्यावर बसून घराकडे आलो...

रामाबाबा नेटकाच घरी पोहचला होता बैलांना गोठ्यात बांधून,वासराला दूध प्यायला सोडवुन तो गोठ्यात आवरून घेत होता. मी पारावर असलेल्या मारुतीच्या मंदिरात बसून हे सर्व बघत बसलेलो,इथेही जो तो ज्याच्या त्याच्या कामात होता...
दोन चार म्हातारे आजोबा आज शनिवार म्हणून अगरबत्ती घेऊन मारुतीरायाचे पाया पडायला आले होते,त्यांचे बघून मी पण प्रार्थना केली अन् पुन्हा तिथं बसून राहिलो. एरवी म्हातारे बाबा गप्पा मारायला माझ्या जवळ येऊन बसले अन् त्यांचा विषय चालू झाला यावर्षी माऊलीचे दर्शन भेटतं की नाही याचा...
मी अवाक झालो ....

या माउलींना मी काय सांगणार होतो,माझे आधुनिक विचार यांना रुचणारे नव्हते मी ऐकत बसलो.त्यांच्या बोलण्यात इतकं सुद्धा चुकीचं नव्हतं आईबापा सारखी असलेली विठ्ठल रखुमाई त्यांना,त्यांची असलेली त्यांच्यावरची श्रद्धा यातच सर्व होते. इतक्या वर्षापासून चालत आलेली परंपरा त्यांना मोडीत काढण्याचा त्यांचा विचार नव्हता,पण इथेही कुठेतरी कोरोना जिंकला होता,याची जाणीव पुढे त्यांचा बोलण्यातून झाली...

एरवी मंदिरात हरिपाठ कीर्तन होत नाही अन् देऊळ पण बंदच आहे. पण आतल्या देवाला बाहेरचं सर्व कळतं आहे,या भाबड्या विचाराने आम्ही त्याला प्रार्थना करीत होतो सर्व ठीक व्हावं इतकंच....
हरवलेलं गावपण अन् आठवणीतल जिवंत राहणार शहर आता स्वस्थ बसू देत नाही,लवकर सर्व ठीक होवो बस....

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ