मुख्य सामग्रीवर वगळा

नाटकाला जगवणारं नाटक सखाराम बाईंडर...


#सखाराम_बाईंडर...


सध्याच्या या लाॅकडाऊनच्या काळात अनेक चित्रपट,नाटक बघत घेत आहे,ज्यांना इतरवेळी वेळे अभावी बघायला जमत नाही...

नाटकं मला फार आवडत नाही,म्हणजे "लक्ष्मण देशपांडे" यांचे "वऱ्हाड चालले लंडनला" नाटका नंतर मी आजवर पूर्ण नाटक कुठलेच बघितले नाही...हे नाटक मात्र याला अपवाद ठरले "सखाराम बाईंडर" जे सुर्वाती पासूनच माणसाला बसलेल्या ठिकाणाशी खिळवून ठेवते...

सखारामचा तो त्याच्या घरातील रुबाब,कणखर विचारांची चंपा आणि हळवी लक्ष्मी हे पात्र मनाला भिडतात.

नक्कीच बघा...


सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे.१९७२ मध्ये रंगभूमीवर सादर झालेलं हे नाटक.राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक पातळीवर प्रचंड विरोध,मोठमोठे वाद,बंदी आणि असं सगळं वादळ अनुभवलेल्या या नाटकाला आणि त्याच्याशी संबंधित लोकांना याच त्याच्या चाहत्या वर्गाकडून भरभरून प्रेमही मिळाले...
हे प्रेम सखाराम बाइंडरचं होतं का? की मुक्तावरचं होतं? की नाटककार विजय तेंडुलकरांवरचं होतं? ते या सगळ्यांसकट मराठी नाटकावरचं होतं.आणि अगदी खरं सांगायचं तर ‘सखाराम’च्या वाटय़ाला ते अंमळ जास्तच आलं.मध्ये इतका काळ गेल्यानंतरही ते ओसरलं नाही हे विशेष.

वर्ष १९७२ तेंडुलकरांनी आपलं ‘सखाराम बाइंडर’ हे नवं कोरं नाटक कमलाकर सारंग या नवीन तुलनेत अनुभवी दिग्दर्शकाला दिलं.वाचणाऱ्या प्रत्येकाला ते आवडत होतं.काहीतरी वेगळं आहे,हे जाणवत होतं,कारण या आधी इतकं टोकाचं कुणी लिहल नव्हतं...

सखारामच्या भूमिकेसाठी निळू फुले,लक्ष्मीच्या भूमिकेत कुमुद आणि चंपा लालन सारंग असे  कलाकार ठरले.तालमी होऊन पहिला प्रयोग झाला.रंगमंचावर चंपा साडी बदलते असं दृश्य अत्यंत सूचकपणे दाखवलं गेलं होतं.तरीही ते दृश्य,सखारामच्या,चंपाच्या तोंडची भाषा,शिव्या हे सगळं बघून प्रेक्षक अवाक् झाले.रंगभूमीवर यापूर्वी त्यांनी असं काही पाहिलेलंच नव्हतं.मध्यमवर्गीय बाजाची,कौटुंबिक मनोरंजन करणारी नाटकंच त्यांना परिचित होती.पण ‘सखाराम’ने हि सर्व बंधने झुगारून टाकत,मोडीत काढली होती...

नवं काही स्वीकारण्याची,प्रयोग समजून घेण्याची क्षमता असलेल्या प्रेक्षकांना नाटक जबरदस्त आवडलं.पण तरीही ज्यांना हे सगळं पचलं,रुचलं नव्हतं,त्यांनी हळूहळू नाटकाविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली.नाटक न बघताच ते अश्लील आहे,बीभत्स आहे,रंगभूमीच्या पावित्र्याचा भंग करणारं आहे असे गैरसमज करून हाकाटी सुरू केली.

नाटक बंद पाडण्यासाठी गुंडगिरी,राजकीय दबाव,प्रशासकीय दबाव,साहित्य-नाटय़ संमेलनाच्या पातळीवरून दबाव असे सगळे मार्ग हाताळले गेले.दिग्दर्शक कमलाकर सारंग यांनी नाटकावरील बंदीच्या विरोधात कोर्टात जाऊन केस लढवली,जिंकली,पण तरीही विरोध शमत नव्हता.आयत्या वेळी परवानगी नाकारली म्हणून प्रयोग रद्द होणं,आयोजकांनी पैसे बुडवणं,रंगमंचावर येऊन राजकीय कार्यकर्त्यांची गुंडगिरी या सगळ्यातून सहिसलामत ‘सखाराम बाईंडर’ बाहेर आलं आणि एक महत्त्वाचं वेगळं नाटक म्हणून देशभर गाजलं.

‘सखाराम’ची नाटक म्हणून,आशय म्हणून जी वैशिष्टय़ं आहेत,त्यावर आजपर्यंत अनेकदा भरपूर चर्चा झाली आहे.‘सखाराम’चं नाटक म्हणूनच त्याकडे बघितलं गेलं आहे. पण खरं तर हे नाटक आहे लक्ष्मीचं आणि चंपाचं नाटक.पुरुषप्रधान व्यवस्थेचा चेहरा दाखवत तेंडुलकरांनी हे स्त्रीवादी मांडणी करणारं नाटक लिहिलं आहे...

‘हा सखारामचा महाल आहे’ असं म्हणत सखाराम त्या घरातलं स्वत:चं प्रभुत्व सुरुवातीलाच ठसवत असला तरी एकीकडे चंपाच्या रूपानं तो पुरता पाघळला आहे. आणि त्याला ती जुमानत नसली तरी तो तिच्यापुढे शारीर पातळीवर हतबल आहे,आणि दुसरीकडे मुंगळ्या-कावळ्यांशी बोलणाऱ्या, त्यांच्याशी एकरूप होणाऱ्या,सखारामच्या मांडीवर मरण येऊ दे,असली भाषा बोलणाऱ्या लक्ष्मीपुढे तो मानसिक पातळीवर दुबळा आहे.शारीरिक आणि मानसिक पातळीवर या दोन्ही बायका त्याच्यावर अधिराज्य गाजवतात.तो रागाच्या भरात चंपाचा खून करतो आणि आपण हे काय करून बसलो म्हणून हतबल होतो तेव्हा एरवी साधी मवाळ वाटणारी, सतत पापपुण्य असली भाषा बोलणारी लक्ष्मीच त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेते आणि आपल्या हातून खून झालाय या जाणिवेने गर्भगळीत झालेल्या,सखारामच्या आयुष्याच्या नाडय़ा आता दुबळ्या मानल्या गेलेल्या,पण प्रत्यक्षात परिस्थिती आल्यावर निडर बनून तिला तोंड देणाऱ्या,परिस्थिती ताब्यात घेणाऱ्या लक्ष्मीच्या हातात आहेत,असं सूचित करत हे नाटक संपतं.

"सखाराम बाईंडर"मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता.पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता.‘सखाराम’मधल्या या स्रीप्रधान,स्त्रीवादी पैलूंवर मात्र आजतागायत फारशी चर्चा झालेली नाही किंवा ती कुणी केलीच नाही...
परंतु अलीकडे कुठेतरी यात वेळेनुसार बदल होत गेला,आणि नव्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ त्यांच्यात निर्माण झाली ...

Written by,

Bharat Sonwane..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ