मुख्य सामग्रीवर वगळा

आठवणीतले बालपण....


खिडकीतून वळवाच्या पावसाच्या सरी पडतांना दिसायच्या,अलीकडे त्यांना खिडकीतून टिपणे हे एकच काम मी करत असायचो... घराच्या बाजूला चहूकडे लाल मातीची जमीन जिथवर नजर जाईल तिथवर दिसायची,मध्येच कुठेतरी काळ्या खडकांचा समुह समुद्रात असणाय्रा एकाकी बेटांप्रमाणे भासायचा...

पडता पाऊस या लाल मातीत शिंतोड्याच्या रुपात जाऊन उताराच्या दिशेनं वाहू लागायचा,वाहणारे सर्व पाणी परिसरात असलेल्या छोट्याश्या धरणरुपी तलावात जाऊन स्थिर होत असायचे. वळवाचाच पाऊस तो फार फार पंधरा वीस मिनिटे चालायचा अन् मग उघडुन जायचा मग उगवुन येणारं ते सप्तरंगी इंद्रधनुष्य हे सर्व डोळ्यांचे पारणं फेडणारं असायचं...

त्याला बघण्यासाठी आणि पावसाने ओल्या झालेल्या जमिनीतून येणाऱ्या सुगंधाला,खळखळ वाहणार्या पाण्याला अनुभवण्यासाठी आम्ही सर्व कॉलनीतील दहा-बारा मुलं
घरा बाहेर निघायचो...

घरातून हाफ चड्डी,फुल बाह्यांचा ड्रेस सावरत निघालो की,छोट्या छोट्या तयार झालेल्या नैसर्गिक नाल्यांमधून वाहणारे पाणी लाल चिखल,दगड,गोटे यांनी आडवत बसायचो...हे सर्व करतांना अनवाणी पायाला लागणारा मऊ चिखल खूप आनंद देऊन जायचा,भटकत भटकत धरणाच्या पाळेवरून जातांनी सभोवतालच्या परिसरातून येणारं वाहतं पाणी खूप सुंदर लालसर,पिवळट दिसायचं. जेव्हा ते या कोरड्या धरणात यायचं तेव्हा ते अनुभवायला वाट्याला येणारे क्षण आयुष्यभर आठवणीत राहतील असे असायचे...

फार-फार तर दोन तासांच्या वाहत्या पाण्यात हे छोटंसं धरण भरून जायचं,यात वळवाच्या पावसात दिसणारी पिवळी बेडुक दिसायची जी ओरडत असायची. ती वर्षभरात फक्त या पंधरा दिवसातच दिसतात असे तरी मला वाटते,कारण एरवी ती दिसत नाही...मग मित्रांमध्ये उगाच लावलेले विचारांचे तर्क ती आकाशातून पावसासोबत फक्त मोकळ्या ठिकाणी जिथून पाणी वाहून धरणात जाईल तिथे पडतात असे तर्क असत...

धरण पाळेवरून खाली उतरले की,नाल्यामध्ये वाहणारे पांढरे,लालसर फेस्कुट आलेले पाणी खूप वेळ स्थिर नजरेनं बघत जमिनीतून येणारा सुगंध अनुभवत बसायचो,तिथेच त्या थंड खडकावर मांडी घालून...

कंटाळा आला की,काही अंतरावर असलेली काळया खडकांची टेकडी बघायला निघायचं. जिथे रंगीबेरंगी छोटे छोटे दगड,घारे दगड शोधायला मजा येत असे तिकडे मोर्चा वळवला की,लागणारे काठोडी लोकांची ती झोपडीवजा घरे त्या गाय,बैल,म्हशी,त्यांचे पिल्ल दिसायची...समोर जिथवर नजर जाईल तिथवर फक्त लाल मातीचं विस्तीर्ण मैदान परक्या ग्रहावर गेल्यासारखे भास करून द्यायचे.लाल मातीतून पायांनी पाणी उडवत दूरवर दिसणाऱ्या नवोदय विद्यालयाच्या त्या पिवळ्या वॉल कंपाऊंडकडे मग वाटचाल होत असत...

त्या वॉल कंपाऊंड जवळ आले की त्यांना गाल लावून त्या भिंतीचा थंडावा अनुभवत,आतून येणाऱ्या गुलमोहराच्या फुलांचा दरवळ अनुभवत पुढे चालत राहायचं...पुढे नवोदय विद्यालयाच्या गेटवर आले की,त्या होलीबॉल खेळणाऱ्या मुला-मुलींना हाय करून पुढे निघून जायचे. मागे मात्र त्यांचे रडावलेले चेहरे बघून इतक्या आनंदात सुद्धा दुःख वाटायचे अन् मोकळीक काय असते,हे तेव्हा त्या वयात समजायचे...
पुढे चालत चालत टेकडीच्या पोटाशी असणाऱ्या खदानित डोकुन खडका आड आलेल्या काळ्या पाण्याला बघत ओरडत बसायचं. दिसणारे ठेकडीचे टोक खुणवायचं,रंगेबेरंगी दगड शोधत काळ्या खडकावर शांत बसुन पुर्ण पावसाने न्हाऊन निघालेले शहर अनुभवत बसायचं... संथपणे अंगाला झोंबत असलेला वारा अन् टेकडीवर आई वडीलांसोबत फिरायला येणारे आमच्यासारखी खूप सारी मुलं आमच्याकडे कुतूहलाने बघायची...

पुढे खूप कंटाळा आला की,टेकडीवरून पळत खाली यायचे.पुन्हा त्या नवोदयमधील मुलांना भेटायचे,त्यांना भेट म्हणून दोन-तीन घारे,पांढरे दगडं द्यायचे अन् पुन्हा बाय करून घराकडे निघायचे. दुसऱ्या रस्त्याने घराकडे यायचे हायवेवरून रस्त्यातवर असलेल्या फिल्टरवर हातपाय धुवून थोडेसे बसायचे... निलगिरीच्या झाडांचा येणारा तो सुगंध जो नेहमीच आवडता आहे तो अनुभवायला भेटत असायचा अन् घाटातून येणाऱ्या ट्रक,कंटेनर यांची वरची ताडपत्री बघत राहायचं जी एरवी वाळलेली असायची...

सुर्य अस्ताला आला की सगळे घरी जायचे,मग घरी असलेला आवडता गरम खिचडीचा बेत खरंच सुख की काय होतं हे सर्व...

#आठवणीतले_बालपणाचे_दिवस...

Written by,

Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ