मुख्य सामग्रीवर वगळा

ओसाड पडलेली शहरे,माणुसकी हरवलेली रस्ते....

हल्ली सून्न झालेल्या शहरांची भीती नाही वाटत मला की,नाही वाटत विशेष काही त्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या भोंग्यांचे.जे उभे आयुष्य वेळेवर चालायला शिकवत होते...

का तर...आज त्यांनी सुद्धा वेळ सोडली आहे,ते ही बंद पडले आहे आठवत भूतकाळातील आठवणींना.भविष्यकाळातील भेसूर जगण्याला,वर्तमान काळातील जगतांनी मरण यातना सोसण्याच्या प्रवास बघत विचार मग्न होत...

ज्या शहरांकडे बघून जगण्यासाठी ऐन उमेदीचे स्वप्न बघितले होते,आज तिथेच मरण दिसायला लागले.तेव्हाच कुठेतरी आपले शहर आपल्याला परके भासू लागले होते...

शहरे सूंनसांन झाली एम.आय.डी.सी ची हेळणा सुरू झाली,आणी जगण्याला आशेचे पंख देणारे यंत्र माणसाच्या हव्यासापोटी मरणाच्या या शर्यतीत जगते राहण्यासाठी धडाधड बंद पडु लागलीत...

आता सवय झाली ही शांत पडलेली शहर
पुन्हा कधी चालू होतील माहीत नाही.पण आतली भूक स्वस्थ बसू देत नाहीना,तिचे काय तिच्यासाठी भटकावे लागते...

थोडे थोडे मरण्यापेक्षा असे झटक्यात आलेले मरण सोपे वाटले की,मग नाही भासत कुठली भीती.भूक लागली की मग फक्त भाकर दिसते....

अन्न,वस्त्र,निवारा मूलभूत गरजा नावाला राहतात फक्त अन्न भेटलं की खूप होते,त्यासाठीच ही सगळी भटकंती असते.
म्हणुन हल्ली बंद पडलेल्या शहरांची भीती नाही वाटत मला...रस्त्याने भर उन्हात जेव्हा भाकरीसाठी पोट विसावा शोधू लागतोना त्याची भीती वाटू लागते...

अलीकडे प्रवाहा सोबतीने वाहने विसरलो आहे आपण,कारण अपेक्षा वाढल्या आहे.फरक काही पडत नाही धनी लोकांना,फक्त हा मजूर वर्ग काही प्रमाणात मरतो...

शेवटी काय आहे सर्व स्थिर झाले की,त्यांची भूक पुन्हा त्यांना शहराला घेऊन येईल...पण तेव्हा अवस्था वेगळी असेल,कंपनीचा ड्रेस आणी दीड किलोचा सेफ्टी बूट भेटल,त्यांना कामगार म्हणून पुन्हा रुजू होण्यासाठी कंपनीत.पण त्याची मेलेली भूक पुन्हा जागी होणार नाही त्याचं काय...

तेव्हा त्याला चिंता उद्याची असेल,कारण तो पण शिकला असेल आता जगण्यातला व्यवहारीपणा....आठवल त्याला भाकरीसाठी केलेली वणवण जेव्हा त्याला आपलीच गमवलेली माणसे आठवतील....

#ओसाड_पडलेल्या_शहरांची_भिती_नाही_वाटत_मला_जेव्हा_रस्ते_भाकरीसाठी_सुंनसान_होतात...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...