मुख्य सामग्रीवर वगळा

ओसाड पडलेली शहरे,माणुसकी हरवलेली रस्ते....

हल्ली सून्न झालेल्या शहरांची भीती नाही वाटत मला की,नाही वाटत विशेष काही त्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या भोंग्यांचे.जे उभे आयुष्य वेळेवर चालायला शिकवत होते...

का तर...आज त्यांनी सुद्धा वेळ सोडली आहे,ते ही बंद पडले आहे आठवत भूतकाळातील आठवणींना.भविष्यकाळातील भेसूर जगण्याला,वर्तमान काळातील जगतांनी मरण यातना सोसण्याच्या प्रवास बघत विचार मग्न होत...

ज्या शहरांकडे बघून जगण्यासाठी ऐन उमेदीचे स्वप्न बघितले होते,आज तिथेच मरण दिसायला लागले.तेव्हाच कुठेतरी आपले शहर आपल्याला परके भासू लागले होते...

शहरे सूंनसांन झाली एम.आय.डी.सी ची हेळणा सुरू झाली,आणी जगण्याला आशेचे पंख देणारे यंत्र माणसाच्या हव्यासापोटी मरणाच्या या शर्यतीत जगते राहण्यासाठी धडाधड बंद पडु लागलीत...

आता सवय झाली ही शांत पडलेली शहर
पुन्हा कधी चालू होतील माहीत नाही.पण आतली भूक स्वस्थ बसू देत नाहीना,तिचे काय तिच्यासाठी भटकावे लागते...

थोडे थोडे मरण्यापेक्षा असे झटक्यात आलेले मरण सोपे वाटले की,मग नाही भासत कुठली भीती.भूक लागली की मग फक्त भाकर दिसते....

अन्न,वस्त्र,निवारा मूलभूत गरजा नावाला राहतात फक्त अन्न भेटलं की खूप होते,त्यासाठीच ही सगळी भटकंती असते.
म्हणुन हल्ली बंद पडलेल्या शहरांची भीती नाही वाटत मला...रस्त्याने भर उन्हात जेव्हा भाकरीसाठी पोट विसावा शोधू लागतोना त्याची भीती वाटू लागते...

अलीकडे प्रवाहा सोबतीने वाहने विसरलो आहे आपण,कारण अपेक्षा वाढल्या आहे.फरक काही पडत नाही धनी लोकांना,फक्त हा मजूर वर्ग काही प्रमाणात मरतो...

शेवटी काय आहे सर्व स्थिर झाले की,त्यांची भूक पुन्हा त्यांना शहराला घेऊन येईल...पण तेव्हा अवस्था वेगळी असेल,कंपनीचा ड्रेस आणी दीड किलोचा सेफ्टी बूट भेटल,त्यांना कामगार म्हणून पुन्हा रुजू होण्यासाठी कंपनीत.पण त्याची मेलेली भूक पुन्हा जागी होणार नाही त्याचं काय...

तेव्हा त्याला चिंता उद्याची असेल,कारण तो पण शिकला असेल आता जगण्यातला व्यवहारीपणा....आठवल त्याला भाकरीसाठी केलेली वणवण जेव्हा त्याला आपलीच गमवलेली माणसे आठवतील....

#ओसाड_पडलेल्या_शहरांची_भिती_नाही_वाटत_मला_जेव्हा_रस्ते_भाकरीसाठी_सुंनसान_होतात...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...