मुख्य सामग्रीवर वगळा

ओसाड पडलेली शहरे,माणुसकी हरवलेली रस्ते....

हल्ली सून्न झालेल्या शहरांची भीती नाही वाटत मला की,नाही वाटत विशेष काही त्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या भोंग्यांचे.जे उभे आयुष्य वेळेवर चालायला शिकवत होते...

का तर...आज त्यांनी सुद्धा वेळ सोडली आहे,ते ही बंद पडले आहे आठवत भूतकाळातील आठवणींना.भविष्यकाळातील भेसूर जगण्याला,वर्तमान काळातील जगतांनी मरण यातना सोसण्याच्या प्रवास बघत विचार मग्न होत...

ज्या शहरांकडे बघून जगण्यासाठी ऐन उमेदीचे स्वप्न बघितले होते,आज तिथेच मरण दिसायला लागले.तेव्हाच कुठेतरी आपले शहर आपल्याला परके भासू लागले होते...

शहरे सूंनसांन झाली एम.आय.डी.सी ची हेळणा सुरू झाली,आणी जगण्याला आशेचे पंख देणारे यंत्र माणसाच्या हव्यासापोटी मरणाच्या या शर्यतीत जगते राहण्यासाठी धडाधड बंद पडु लागलीत...

आता सवय झाली ही शांत पडलेली शहर
पुन्हा कधी चालू होतील माहीत नाही.पण आतली भूक स्वस्थ बसू देत नाहीना,तिचे काय तिच्यासाठी भटकावे लागते...

थोडे थोडे मरण्यापेक्षा असे झटक्यात आलेले मरण सोपे वाटले की,मग नाही भासत कुठली भीती.भूक लागली की मग फक्त भाकर दिसते....

अन्न,वस्त्र,निवारा मूलभूत गरजा नावाला राहतात फक्त अन्न भेटलं की खूप होते,त्यासाठीच ही सगळी भटकंती असते.
म्हणुन हल्ली बंद पडलेल्या शहरांची भीती नाही वाटत मला...रस्त्याने भर उन्हात जेव्हा भाकरीसाठी पोट विसावा शोधू लागतोना त्याची भीती वाटू लागते...

अलीकडे प्रवाहा सोबतीने वाहने विसरलो आहे आपण,कारण अपेक्षा वाढल्या आहे.फरक काही पडत नाही धनी लोकांना,फक्त हा मजूर वर्ग काही प्रमाणात मरतो...

शेवटी काय आहे सर्व स्थिर झाले की,त्यांची भूक पुन्हा त्यांना शहराला घेऊन येईल...पण तेव्हा अवस्था वेगळी असेल,कंपनीचा ड्रेस आणी दीड किलोचा सेफ्टी बूट भेटल,त्यांना कामगार म्हणून पुन्हा रुजू होण्यासाठी कंपनीत.पण त्याची मेलेली भूक पुन्हा जागी होणार नाही त्याचं काय...

तेव्हा त्याला चिंता उद्याची असेल,कारण तो पण शिकला असेल आता जगण्यातला व्यवहारीपणा....आठवल त्याला भाकरीसाठी केलेली वणवण जेव्हा त्याला आपलीच गमवलेली माणसे आठवतील....

#ओसाड_पडलेल्या_शहरांची_भिती_नाही_वाटत_मला_जेव्हा_रस्ते_भाकरीसाठी_सुंनसान_होतात...

Written by,
Bharat Sonwane...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ