मुख्य सामग्रीवर वगळा

Claidestine love....

कुठेतरी व्यक्त व्हायचं असत,भावनांच्या आड लपून रोज-रोज तोच कोंडमारा,तो कोंडनारा श्वास फक्त चालू ठेवायचा आहे,म्हणून फक्त व्यक्त व्हायचं आहे....

चार भिंतीच्या आड बंधिस्त होनं काय अन् या पृथ्वीच्या अंडाकृती मध्ये कैद होनं काय सारखच आहे,पण.... पण काय आहेना हे मन थाऱ्यावर असलं तर सगळ अव्यक्त ठेवता येतं....

त्यामुळे मग असं अधून-मधून पडलेले मनातील उत्तर अन् त्याच उत्तरांना पुन्हा पडलेले प्रश्न हे चक्र काही संपत नाही,पण कुठेतरी विसावा दोन क्षणांचा अन् बळजबरीचंच मनाला हायसे वाटावं म्हणून व्हायचं व्यक्त कधीतरी...

मग ते बोलण्यातुन असेल नाहीतर लिखाणातुन असेल,इतकेच नाही जमले तर बस मनसोक्त बंद कावडाच्या आत उशीखाली तोंड घालून रडून घ्यायचं,पण व्यक्त व्हायचं....

कालपरवा एका कोणत्यातरी पुस्तकात वाचलं,जे चालू काळाच्या एखादं शतक मागचं पुस्तक असेल,माणूस स्वत:च्या शरीराशी व्यक्त होऊन पण मनातील अव्यक्त भाव अन् चाललेली घुसमट थांबवू शकतो.हो अगदी तेच Masturbation,म्हणजे लेखन काय चुकीचं अन् काय बरोबर शिकवत हे आपण ठरवायचं असत,यात काही गैर नाही...

कधीतरी तो मनातील विद्रोह मनाशीच चालेला शोधत असतो मी,मन कधीतरी घेऊन जात असतं त्या वाळवी पडलेल्या घरात जिथं घुशीनं बीळ केलं आहे.आता इथे मला काय प्रश्न पडावे ती आई होणार आहे म्हणून ती हे बीळ करून तिच्या पिलांना इथं ठेवणार आहे का ? की उद्या पाऊस आला तर यात पाणी जाऊन ते बंद होऊन जाईल ? मग ती कुठे जाईल.... ?

मन थाऱ्यावर नाही राहत,आता ते काल झालेल्या वपु यांच्या जन्मदिनाच्या सांजेचा विचार करत होतं,पण आता काय ते आज त्याच सांध्यपर्वाच्या कवीचा कवी ग्रेसांचा स्मृतिदिन आहे ते विचार करत आहे.तेव्हा मी काय बोलु माझी हयात नाही त्यांच्याबद्दल लिहायची,तेव्हा विनम्र अभिवादन इतकंच म्हणेल....

राहिलं मन थाऱ्यावर नाही हे खरं आहे,कुठेतरी अडगळीच्या खोलीत ते आता काहीतरी लिहत बसलं आहे.अन् तितक्यात ते बर्मुडा ट्रँगलच्या त्या खोल गर्तेत जाऊन घळघळ खुप खोलवर जाऊन, पुन्हा त्या बुडालेल्या महाकाय जहाजात टायटॅनिक मध्ये चालू काळानुसार रॉकस्टार होऊन,गिटार हातात घेऊन "My Heart will go on" गाणार आहे त्या पाण्यातसुद्धा.
कारण त्याला आज श्रद्धांजली वाहायची आहे त्या जहाजात मृत्युमुखी पडलेल्या फक्त त्या एकट्या राणीला,बाकीचे त्याला फक्त तिथं साथ देणार आहे खुद्द या मेलेल्या मनाला...

म्हणुन हे असं भटकनार मन आहेना त्याला सावराव लागतं वेळोवेळी,व्यक्त करावं लागतं, नाहीतर इतिहासाची पुनरावृत्ती करायला कमी करत नाही ते.कारण.... त्याचा एक वेगळा इतिहास आहे,त्याला सातवीला असतांनी फक्त इतिहासात पहिलाच नंबर लागायचा,मग तो गणितात नापास झाला तरी तो खुश असायचा....

राहिलं मन गुंतने अन् गुंतवून घ्यायचं तर ते या बाबतीत खुप भोळ आहे,असत...हे माझ्या बाबतीत नाही सर्वांच्या बाबतीत आहे.ते नेहमी योग्य निर्णय घेत पण व्यक्त होणाऱ्या शरीराला त्याच भोळं असण इतकं आवडत नाही,की ते त्याच्या रक्तात भिनलेलं आहे,ते मनाचं कधीच ऐकत नाही,ते फक्त मृगजळाच्या नादी लागुन मृगजळात सुख शोधत बसतं...

कधीतरी धाप्यावरच्या लाल भडक विस्तवासारखं झालं का मग करायचं कैद त्याला,धौतमध्ये असलेल्या शाईतुन.अडगळीतल्या वाळलेल्या खिचडीच्या शित पडलेल्या पानावर डायरीतल्या...

#मन_अन_त्याच्यासोबतचं_Clindstaine_Love....

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...