मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेले_अनेक_प्रश्न_अनेक_उत्तरं_भटकताय_वणवण_करत

कधीतरी ऑफीसमध्ये भरदुपारी डोळे लागतात, तेव्हा असे वाटते की नाही आता रेस्टरूम मध्ये जाऊन झोपून रहावं.....

हो होत असं कधीतरी,पण दुपारचं झोपणं हे रात्रीच्या झोपण्यासारखे नसतच विचारांचं काहूर इथे मानगुटीवर स्वार असत.मग काय अनेक प्रश्न असतात....

प्रॉजेक्ट पुर्ण होईल का ? तो पसंद पडेल का ? कंपनीला माझ्यामुळे फायदा/नुकसान होईल का ? असे अनेक अनेक प्रश्न.काम चालुच असतं अन् मग काय....

दुपारची झोप असते ती मात्र विचार रात्रीचेही येऊन जातात डोक्यात,तुझा भास होऊन जातो अनेकदा पण कल्पनेतला स्पर्श कल्पनेतच राहून जातो....

रात्रीच्या प्रहरी टेरेसच्या पन्हाळातुन बाईकच्या सिट कव्हरवर पडणाऱ्या पाण्याचा तो आवाज, मग संथ संथ शांत झालेली ती त्याची कमी.अन् फक्त त्या पडणाऱ्या धारे पेक्षा स्पष्ट ऐकू येतो तो टप टप पडणारा पाण्याच्या थेंबांचा आवाज....

सोबत पेट्रोलचा नाॅक चालु राहुन गेल्यामुळे वाऱ्याच्या झुळके सोबत येऊन जाणारा तो सुवास,डोकं पार सुन्न सुन्न होऊन जातं.मग ऐकू येते मध्येच घड्याळाच्या काट्यांची लगबग एकमेकांच्या पुढे जाण्याची....

यांना रोजचं माहीत असुन देखील का हे वेड्यासारखे फिरत असतील ? का कुणास ठाऊक ? शेवट तिघेही एकाच ठिकाणी येऊन थांबणार आहेना,पण असो यांना कोण समजवणार जेव्हा आपल्या सारखे सजीव माणसे रोज रोज काही कारण नसतांना ऑफिसला येतात....

आता या विधानावरून वाद घालण्यापेक्षा मीच सांगतो,खरच आपण पण त्या घड्याळाच्या काट्यासारखे जीवन मरणाचा शर्यतीत इतकी हरवलो आहे की पुढे जाण्याची आस ही ऑफिसमध्ये ही स्वस्थ बसू देत नाहीये....

विचारांचे काहूर अन् हरवलेलं जगण्यातलं शहाणपण सोडलंय आपण,मागेच सकाळी येतांना जेव्हा त्या उड्डाणपुलावरून बाईक थांबुन खाली खालचे लोक अन् जगण्यासाठी चालेली त्यांची स्पर्धा बघितली बस्स तिथेच हे अन् मी सगळ हरलो आहे....

एक वेळ वाटत होत की टाय, सूट-बूट, शर्टिंग केलेला मी बसून राहिलो या पुलाच्या कठड्यावर व शोधत राहिलो या शहरात सुख,चैन भेटंल का मला ?  पण माझं मन यालाही तयार नसतं....

का तर... त्याला हाव असते रात्रीच्या झोपेची अन् भीती असते झोपेआधी विचारल्या जाणाऱ्या मनातल्या अन् जबाबदाऱ्यांच्या प्रश्नाची,नाही मग काही शक्य....
साठवुन घेतो त्या उड्डाणपुला खालच्या दुनियेला अन् हल्ली यांत्रिकीकरण इतकं झालं आहे की, फक्त सेल्फ मारून तो निघून जातो विचारांना मनातल्या....

कधीतरी ऑफिसमधून केबिनच्या पलिकडले दृश्य मनात घर करत बसलो असतो,पण इथेही सर्व विचारांनीच गस्त घातली आहे,मग तो पडदा हटवून सावरून घेतो डोळ्यातील आसवांना....

अनेक प्रश्नांना ज्यांची उत्तरे सकाळपासून शोधत असतो ती नाहीच भेटत,पण मनाला अन् समोर ठेवलेल्या त्या माझ्यावरच्या कंट्रोलरला हे कसे कळणार नाही का ?

मग काय बस काम काम अन् काम घड्याळाच्या काट्यांची बेरीज जुळून आली की पुन्हा तेच सर्व सावरायचे स्वताला,आवरायचं विचारांना अन् स्वतंत्र होयच पुन्हा कैद होण्यासाठी....

#हरवलेले_अनेक_प्रश्न_अनेक_उत्तरं_भटकताय_वणवण_करत....

Written by,
®Bharat.L.Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...