मुख्य सामग्रीवर वगळा

हरवलेले_अनेक_प्रश्न_अनेक_उत्तरं_भटकताय_वणवण_करत

कधीतरी ऑफीसमध्ये भरदुपारी डोळे लागतात, तेव्हा असे वाटते की नाही आता रेस्टरूम मध्ये जाऊन झोपून रहावं.....

हो होत असं कधीतरी,पण दुपारचं झोपणं हे रात्रीच्या झोपण्यासारखे नसतच विचारांचं काहूर इथे मानगुटीवर स्वार असत.मग काय अनेक प्रश्न असतात....

प्रॉजेक्ट पुर्ण होईल का ? तो पसंद पडेल का ? कंपनीला माझ्यामुळे फायदा/नुकसान होईल का ? असे अनेक अनेक प्रश्न.काम चालुच असतं अन् मग काय....

दुपारची झोप असते ती मात्र विचार रात्रीचेही येऊन जातात डोक्यात,तुझा भास होऊन जातो अनेकदा पण कल्पनेतला स्पर्श कल्पनेतच राहून जातो....

रात्रीच्या प्रहरी टेरेसच्या पन्हाळातुन बाईकच्या सिट कव्हरवर पडणाऱ्या पाण्याचा तो आवाज, मग संथ संथ शांत झालेली ती त्याची कमी.अन् फक्त त्या पडणाऱ्या धारे पेक्षा स्पष्ट ऐकू येतो तो टप टप पडणारा पाण्याच्या थेंबांचा आवाज....

सोबत पेट्रोलचा नाॅक चालु राहुन गेल्यामुळे वाऱ्याच्या झुळके सोबत येऊन जाणारा तो सुवास,डोकं पार सुन्न सुन्न होऊन जातं.मग ऐकू येते मध्येच घड्याळाच्या काट्यांची लगबग एकमेकांच्या पुढे जाण्याची....

यांना रोजचं माहीत असुन देखील का हे वेड्यासारखे फिरत असतील ? का कुणास ठाऊक ? शेवट तिघेही एकाच ठिकाणी येऊन थांबणार आहेना,पण असो यांना कोण समजवणार जेव्हा आपल्या सारखे सजीव माणसे रोज रोज काही कारण नसतांना ऑफिसला येतात....

आता या विधानावरून वाद घालण्यापेक्षा मीच सांगतो,खरच आपण पण त्या घड्याळाच्या काट्यासारखे जीवन मरणाचा शर्यतीत इतकी हरवलो आहे की पुढे जाण्याची आस ही ऑफिसमध्ये ही स्वस्थ बसू देत नाहीये....

विचारांचे काहूर अन् हरवलेलं जगण्यातलं शहाणपण सोडलंय आपण,मागेच सकाळी येतांना जेव्हा त्या उड्डाणपुलावरून बाईक थांबुन खाली खालचे लोक अन् जगण्यासाठी चालेली त्यांची स्पर्धा बघितली बस्स तिथेच हे अन् मी सगळ हरलो आहे....

एक वेळ वाटत होत की टाय, सूट-बूट, शर्टिंग केलेला मी बसून राहिलो या पुलाच्या कठड्यावर व शोधत राहिलो या शहरात सुख,चैन भेटंल का मला ?  पण माझं मन यालाही तयार नसतं....

का तर... त्याला हाव असते रात्रीच्या झोपेची अन् भीती असते झोपेआधी विचारल्या जाणाऱ्या मनातल्या अन् जबाबदाऱ्यांच्या प्रश्नाची,नाही मग काही शक्य....
साठवुन घेतो त्या उड्डाणपुला खालच्या दुनियेला अन् हल्ली यांत्रिकीकरण इतकं झालं आहे की, फक्त सेल्फ मारून तो निघून जातो विचारांना मनातल्या....

कधीतरी ऑफिसमधून केबिनच्या पलिकडले दृश्य मनात घर करत बसलो असतो,पण इथेही सर्व विचारांनीच गस्त घातली आहे,मग तो पडदा हटवून सावरून घेतो डोळ्यातील आसवांना....

अनेक प्रश्नांना ज्यांची उत्तरे सकाळपासून शोधत असतो ती नाहीच भेटत,पण मनाला अन् समोर ठेवलेल्या त्या माझ्यावरच्या कंट्रोलरला हे कसे कळणार नाही का ?

मग काय बस काम काम अन् काम घड्याळाच्या काट्यांची बेरीज जुळून आली की पुन्हा तेच सर्व सावरायचे स्वताला,आवरायचं विचारांना अन् स्वतंत्र होयच पुन्हा कैद होण्यासाठी....

#हरवलेले_अनेक_प्रश्न_अनेक_उत्तरं_भटकताय_वणवण_करत....

Written by,
®Bharat.L.Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ