मुख्य सामग्रीवर वगळा

गोड आठवणी

सूनो...सूनो...
भाईयो,बहेनो, नौजवानों सूनो...

आज श्याम को मिथुन का फिल्म लगणेवाला है ठीक नौ बजे....

उर्सात अशी हाक यायची अन् मी काही वेळासाठी स्तब्ध होऊन जायचो,एकाच ठिकाणी उभा राहून त्या पिक्चर टाकीकडे बघत राहायचो.तो टाकीच्यावर एक माणुस उभा असायचा त्याचा हा मार्केटिंग करायचा फंडा मला खुप आवडायचा....

हातात एक झटकण्यासाठी काठीला बांधलेले फडकं हात हलवत हातवारे करायचा,त्याच्या सोबत एक बुट्टा माणुससुद्धा असायचा जो माझ्यासारख्या पोरांना हात दाखवत आम्हाला खुश करायचा....

मला वाटायचं हेच अमिताभ,मिथुन,सर्व आहे.
कधी कधी एखादी सुंदर कटम्याडी घातलेली तरूणी पण त्या टाकीवर चडून सर्वांना चित्रपट बघायला या असे हातवारे करून सांगत असायची....

मराठी चित्रपटांसाठी यापेक्षा थोड वेगळं असायचं,त्याचं पोस्टरच पूर्ण कथा सांगून द्यायचं. अन् ते पाहून त्या वेळच्या हौशी स्त्रियांना तो चित्रपट बगयाला जायचं हे ठरलेलं असायचं,
कधीतरी एखादी अभिनेत्री यायची मग चित्रपटाचे तिकीट ती स्वतः वाटायची अशीच माझीही एक आठवण आहे...

एकदा ऊर्सात माहेरची साडी हा चित्रपट आला होता,त्याचे तिकीट वाटायला अलका कुबल या होत्या.काय मग त्या दिवशीचे सर्व शो फूल होते त्या चित्रपटाचे....

आमच्या आईची अलका कुबल खुप आवडती, मग काय आमचे पूर्ण कुटुंब,शेजारचे सर्व कुटुंब त्यात आमची मम्मी,शेजारची काकू त्यांच्या मुली तर विचारूच नका किती खुश होते.मस्त सर्व आई वडिलांसोबत पाहिलेला तो माझा पहिला चित्रपट आजही आठवतो...

आजवर असा चित्रपट बघितला नाही कारण त्या दिवशी टाकीमध्ये सर्व स्त्रिया अन् पुरुषही जवळ जवळ रडले होते,त्यात आईला सुखावणारी  अजुन एक गोष्ट म्हणजे आईला अलका कुबल पुढे होऊन भेटली बोलली.मग काय आम्हीपण खुश....

पुढे खुप वर्ष खुप चित्रपट उर्सात बघितले,खास वडिलांच्या आग्रहास्तव मेला हा चित्रपट सर्व कुटुंब मिळुन बघितला होता.तो आजही आठवतो पण नंतर मात्र हे सर्व हरवले....

आता नाही जात मी कधीच उर्सामध्ये अन् गेलोच कधीतर,फक्त थोडीफार काहीतरी खरेदी असते, कारण ते माणूसपण हरवलं आहे अन् ते माणसेही....

#आठवणीतले_गोड_दिवस...

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...