मुख्य सामग्रीवर वगळा

गोड आठवणी

सूनो...सूनो...
भाईयो,बहेनो, नौजवानों सूनो...

आज श्याम को मिथुन का फिल्म लगणेवाला है ठीक नौ बजे....

उर्सात अशी हाक यायची अन् मी काही वेळासाठी स्तब्ध होऊन जायचो,एकाच ठिकाणी उभा राहून त्या पिक्चर टाकीकडे बघत राहायचो.तो टाकीच्यावर एक माणुस उभा असायचा त्याचा हा मार्केटिंग करायचा फंडा मला खुप आवडायचा....

हातात एक झटकण्यासाठी काठीला बांधलेले फडकं हात हलवत हातवारे करायचा,त्याच्या सोबत एक बुट्टा माणुससुद्धा असायचा जो माझ्यासारख्या पोरांना हात दाखवत आम्हाला खुश करायचा....

मला वाटायचं हेच अमिताभ,मिथुन,सर्व आहे.
कधी कधी एखादी सुंदर कटम्याडी घातलेली तरूणी पण त्या टाकीवर चडून सर्वांना चित्रपट बघायला या असे हातवारे करून सांगत असायची....

मराठी चित्रपटांसाठी यापेक्षा थोड वेगळं असायचं,त्याचं पोस्टरच पूर्ण कथा सांगून द्यायचं. अन् ते पाहून त्या वेळच्या हौशी स्त्रियांना तो चित्रपट बगयाला जायचं हे ठरलेलं असायचं,
कधीतरी एखादी अभिनेत्री यायची मग चित्रपटाचे तिकीट ती स्वतः वाटायची अशीच माझीही एक आठवण आहे...

एकदा ऊर्सात माहेरची साडी हा चित्रपट आला होता,त्याचे तिकीट वाटायला अलका कुबल या होत्या.काय मग त्या दिवशीचे सर्व शो फूल होते त्या चित्रपटाचे....

आमच्या आईची अलका कुबल खुप आवडती, मग काय आमचे पूर्ण कुटुंब,शेजारचे सर्व कुटुंब त्यात आमची मम्मी,शेजारची काकू त्यांच्या मुली तर विचारूच नका किती खुश होते.मस्त सर्व आई वडिलांसोबत पाहिलेला तो माझा पहिला चित्रपट आजही आठवतो...

आजवर असा चित्रपट बघितला नाही कारण त्या दिवशी टाकीमध्ये सर्व स्त्रिया अन् पुरुषही जवळ जवळ रडले होते,त्यात आईला सुखावणारी  अजुन एक गोष्ट म्हणजे आईला अलका कुबल पुढे होऊन भेटली बोलली.मग काय आम्हीपण खुश....

पुढे खुप वर्ष खुप चित्रपट उर्सात बघितले,खास वडिलांच्या आग्रहास्तव मेला हा चित्रपट सर्व कुटुंब मिळुन बघितला होता.तो आजही आठवतो पण नंतर मात्र हे सर्व हरवले....

आता नाही जात मी कधीच उर्सामध्ये अन् गेलोच कधीतर,फक्त थोडीफार काहीतरी खरेदी असते, कारण ते माणूसपण हरवलं आहे अन् ते माणसेही....

#आठवणीतले_गोड_दिवस...

Written by
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...