मुख्य सामग्रीवर वगळा

परभ्या दुनियादारीतला मित्र

तो आजही आठवतो परभ्या मेरी जान साला... दुनियादारीच्या नादी लागून या मित्राला गमावून बसलो...

नेहमीप्रमाणे रस्त्याला खेटून असलेल्या पुलावर बसुन मी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना बघत मी एकटाच बसुन राहायचो पुलावर.मस्त हापचड्डी,फुल बाह्याचा ड्रेस घातलेला असायचा रस्त्याने येणारी थंडगार हवा शरिराला लागायची,पुलाखालून येणारा पाण्याचा आवाज खळ..खळ... खुप सुंदर
वाटत असायचा....

तेव्हा माझा मित्र परभ्या मला भेटायला यायचा, पाच-सहा दिवसांतून एकदा यायचा तो.भोळा होता बिचारा पण माझा लाडका होता,साधारण फाटलेले कपडे घालायचा,पण त्याला सुद्धा तो विन करायचा....

दोन्ही पायात दोन वेग वेगळ्या चप्पल व नुकताच तरुणपणात पाऊल ठेवत असल्यामुळे आलेली  ती त्याची बोकड्यासारखी दाढी,अन् बारीकशी मिशी भारी दिसायचा तो या अवतारात....

माहीत नाही पण लहानपणी तो काही कारणास्तव थोडा भोळसर झाला असावा.त्याची माय पण त्याच्या सारखी विस्कटलेले केस,फाटलेली साडीमध्ये असत पण मेहनत करायचे दोघेपण....

शहरातल्या चौकात बसून असायचे धुळीला माखत शहरात एखाद डुक्कर,कुत्रं मेलं की परभ्याला लोकं बोलावून आणायचे.परभ्या हे काम चांगलं करतो हे शहरात सर्वांना माहीत असल्यामुळे असे काही झाले की लोकं त्याच्याकडे येत असत....

परभ्या इस-तीस रुपय अन् दोन वडापावच्या बदल्यात ते डुक्कर कुत्र शहरापासून दूर एकांताच्या जागी,म्हणजे मी बसायचो त्या पुलाखाली आणुन टाकायचा.

परभ्या भोळा होता पण त्याच्या या कामामुळे तो शहरात सगळ्याला आवडायचा,त्याला कुणीपण त्रास द्यायचं नाही.भाकर कुटका जे असल ते परभ्याला सर्वजण आणुन द्यायचो आम्ही..

परभ्याला गाणे म्हणायला खुप आवडायचे,चार-पाच दिवसांनी आला की परभ्या आला आहे हे दूरवरून त्याचे गाणे ऐकून कळायचे,मग मी पण त्या पुलावर जाऊन बसायचो....

परभ्या त्या डुकराला दोरी बांधून,ती काठीला बांधून दोन्ही पायांच्यामध्ये घेऊन त्या डुकराला ओढत ओढत घेऊन यायचा.सोबत त्याचे दर्दभरे गाणे म्हणायचा,ऐकून काय तर मला आवडायचा तो खुप.यारा हो यारा..!,जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास अा गाये..! असे गाणे म्हणत तो रस्त्याने त्या डुकराला ओढत घेऊन पुलाकडे येतांना दिसायचा....

पुलाखाली त्या डुकराला सोडून आला की येऊन बसायचा पुलावर काहीवेळ माझ्या जवळ,मला म्हणायचा,क्या चल रहा है दोस्त...?
मी पण बोलायचो,कधी कधी तर खुप शाहण्यासारखं बोलायचं पण कधीतरी काहीतरी विचित्र बोलायचा पण ते मनाला लागल अस बोलायचा....

तो भोळा नव्हता हे पक्कं खरं होत... परिस्थितीने त्याला भोळं केलं होतं,तो जातांनी आमचं ठरलेले असायचे.पुलावर घोडा करून बसायचं व पुलाखाली बघून मोठ्याने दोन-तीन गाणे म्हणायचे,ज्याचा आवाज खाली घुमायचा अन् आम्हाला पुन्हा ऐकु यायचा....

परभ्या हसत म्हणायचं अरे खाली आपले दोस्त आहे काय यार भाई...ते पण गाणे म्हंत्या अन् तो पुन्हा दोन्ही पायाच्या मध्ये काडी टाकून गाणी म्हणत मला चल भाई जाता हुं,कोई और डुक्कर,कुत्ता मर गया तो आउंगा मिलने दोबारा,तु यहां रहे असे म्हणत निघून जायचा...

मी बघत राहायचो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे,कधीतरी यायचा तो पुन्हा.
पण मी या दुनियादारी मध्ये हरलो,कर्तव्याच्या डोंगरात हरलो अन् माझ्या या दोस्ताला कायमचा हरवून बसलो....

कधीतरी दिसतो मला तो,पण आता नाही ओळखत तो मला.कदाचित मी त्याला विसरलो म्हणून ओळख देत नसेल होनं तो...?

#परभ्या_हरवलेल्या_दोस्तातला_राजा_माणुस...

Written by,

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...