मुख्य सामग्रीवर वगळा

परभ्या दुनियादारीतला मित्र

तो आजही आठवतो परभ्या मेरी जान साला... दुनियादारीच्या नादी लागून या मित्राला गमावून बसलो...

नेहमीप्रमाणे रस्त्याला खेटून असलेल्या पुलावर बसुन मी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना बघत मी एकटाच बसुन राहायचो पुलावर.मस्त हापचड्डी,फुल बाह्याचा ड्रेस घातलेला असायचा रस्त्याने येणारी थंडगार हवा शरिराला लागायची,पुलाखालून येणारा पाण्याचा आवाज खळ..खळ... खुप सुंदर
वाटत असायचा....

तेव्हा माझा मित्र परभ्या मला भेटायला यायचा, पाच-सहा दिवसांतून एकदा यायचा तो.भोळा होता बिचारा पण माझा लाडका होता,साधारण फाटलेले कपडे घालायचा,पण त्याला सुद्धा तो विन करायचा....

दोन्ही पायात दोन वेग वेगळ्या चप्पल व नुकताच तरुणपणात पाऊल ठेवत असल्यामुळे आलेली  ती त्याची बोकड्यासारखी दाढी,अन् बारीकशी मिशी भारी दिसायचा तो या अवतारात....

माहीत नाही पण लहानपणी तो काही कारणास्तव थोडा भोळसर झाला असावा.त्याची माय पण त्याच्या सारखी विस्कटलेले केस,फाटलेली साडीमध्ये असत पण मेहनत करायचे दोघेपण....

शहरातल्या चौकात बसून असायचे धुळीला माखत शहरात एखाद डुक्कर,कुत्रं मेलं की परभ्याला लोकं बोलावून आणायचे.परभ्या हे काम चांगलं करतो हे शहरात सर्वांना माहीत असल्यामुळे असे काही झाले की लोकं त्याच्याकडे येत असत....

परभ्या इस-तीस रुपय अन् दोन वडापावच्या बदल्यात ते डुक्कर कुत्र शहरापासून दूर एकांताच्या जागी,म्हणजे मी बसायचो त्या पुलाखाली आणुन टाकायचा.

परभ्या भोळा होता पण त्याच्या या कामामुळे तो शहरात सगळ्याला आवडायचा,त्याला कुणीपण त्रास द्यायचं नाही.भाकर कुटका जे असल ते परभ्याला सर्वजण आणुन द्यायचो आम्ही..

परभ्याला गाणे म्हणायला खुप आवडायचे,चार-पाच दिवसांनी आला की परभ्या आला आहे हे दूरवरून त्याचे गाणे ऐकून कळायचे,मग मी पण त्या पुलावर जाऊन बसायचो....

परभ्या त्या डुकराला दोरी बांधून,ती काठीला बांधून दोन्ही पायांच्यामध्ये घेऊन त्या डुकराला ओढत ओढत घेऊन यायचा.सोबत त्याचे दर्दभरे गाणे म्हणायचा,ऐकून काय तर मला आवडायचा तो खुप.यारा हो यारा..!,जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास अा गाये..! असे गाणे म्हणत तो रस्त्याने त्या डुकराला ओढत घेऊन पुलाकडे येतांना दिसायचा....

पुलाखाली त्या डुकराला सोडून आला की येऊन बसायचा पुलावर काहीवेळ माझ्या जवळ,मला म्हणायचा,क्या चल रहा है दोस्त...?
मी पण बोलायचो,कधी कधी तर खुप शाहण्यासारखं बोलायचं पण कधीतरी काहीतरी विचित्र बोलायचा पण ते मनाला लागल अस बोलायचा....

तो भोळा नव्हता हे पक्कं खरं होत... परिस्थितीने त्याला भोळं केलं होतं,तो जातांनी आमचं ठरलेले असायचे.पुलावर घोडा करून बसायचं व पुलाखाली बघून मोठ्याने दोन-तीन गाणे म्हणायचे,ज्याचा आवाज खाली घुमायचा अन् आम्हाला पुन्हा ऐकु यायचा....

परभ्या हसत म्हणायचं अरे खाली आपले दोस्त आहे काय यार भाई...ते पण गाणे म्हंत्या अन् तो पुन्हा दोन्ही पायाच्या मध्ये काडी टाकून गाणी म्हणत मला चल भाई जाता हुं,कोई और डुक्कर,कुत्ता मर गया तो आउंगा मिलने दोबारा,तु यहां रहे असे म्हणत निघून जायचा...

मी बघत राहायचो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे,कधीतरी यायचा तो पुन्हा.
पण मी या दुनियादारी मध्ये हरलो,कर्तव्याच्या डोंगरात हरलो अन् माझ्या या दोस्ताला कायमचा हरवून बसलो....

कधीतरी दिसतो मला तो,पण आता नाही ओळखत तो मला.कदाचित मी त्याला विसरलो म्हणून ओळख देत नसेल होनं तो...?

#परभ्या_हरवलेल्या_दोस्तातला_राजा_माणुस...

Written by,

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...