मुख्य सामग्रीवर वगळा

परभ्या दुनियादारीतला मित्र

तो आजही आठवतो परभ्या मेरी जान साला... दुनियादारीच्या नादी लागून या मित्राला गमावून बसलो...

नेहमीप्रमाणे रस्त्याला खेटून असलेल्या पुलावर बसुन मी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांना बघत मी एकटाच बसुन राहायचो पुलावर.मस्त हापचड्डी,फुल बाह्याचा ड्रेस घातलेला असायचा रस्त्याने येणारी थंडगार हवा शरिराला लागायची,पुलाखालून येणारा पाण्याचा आवाज खळ..खळ... खुप सुंदर
वाटत असायचा....

तेव्हा माझा मित्र परभ्या मला भेटायला यायचा, पाच-सहा दिवसांतून एकदा यायचा तो.भोळा होता बिचारा पण माझा लाडका होता,साधारण फाटलेले कपडे घालायचा,पण त्याला सुद्धा तो विन करायचा....

दोन्ही पायात दोन वेग वेगळ्या चप्पल व नुकताच तरुणपणात पाऊल ठेवत असल्यामुळे आलेली  ती त्याची बोकड्यासारखी दाढी,अन् बारीकशी मिशी भारी दिसायचा तो या अवतारात....

माहीत नाही पण लहानपणी तो काही कारणास्तव थोडा भोळसर झाला असावा.त्याची माय पण त्याच्या सारखी विस्कटलेले केस,फाटलेली साडीमध्ये असत पण मेहनत करायचे दोघेपण....

शहरातल्या चौकात बसून असायचे धुळीला माखत शहरात एखाद डुक्कर,कुत्रं मेलं की परभ्याला लोकं बोलावून आणायचे.परभ्या हे काम चांगलं करतो हे शहरात सर्वांना माहीत असल्यामुळे असे काही झाले की लोकं त्याच्याकडे येत असत....

परभ्या इस-तीस रुपय अन् दोन वडापावच्या बदल्यात ते डुक्कर कुत्र शहरापासून दूर एकांताच्या जागी,म्हणजे मी बसायचो त्या पुलाखाली आणुन टाकायचा.

परभ्या भोळा होता पण त्याच्या या कामामुळे तो शहरात सगळ्याला आवडायचा,त्याला कुणीपण त्रास द्यायचं नाही.भाकर कुटका जे असल ते परभ्याला सर्वजण आणुन द्यायचो आम्ही..

परभ्याला गाणे म्हणायला खुप आवडायचे,चार-पाच दिवसांनी आला की परभ्या आला आहे हे दूरवरून त्याचे गाणे ऐकून कळायचे,मग मी पण त्या पुलावर जाऊन बसायचो....

परभ्या त्या डुकराला दोरी बांधून,ती काठीला बांधून दोन्ही पायांच्यामध्ये घेऊन त्या डुकराला ओढत ओढत घेऊन यायचा.सोबत त्याचे दर्दभरे गाणे म्हणायचा,ऐकून काय तर मला आवडायचा तो खुप.यारा हो यारा..!,जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास अा गाये..! असे गाणे म्हणत तो रस्त्याने त्या डुकराला ओढत घेऊन पुलाकडे येतांना दिसायचा....

पुलाखाली त्या डुकराला सोडून आला की येऊन बसायचा पुलावर काहीवेळ माझ्या जवळ,मला म्हणायचा,क्या चल रहा है दोस्त...?
मी पण बोलायचो,कधी कधी तर खुप शाहण्यासारखं बोलायचं पण कधीतरी काहीतरी विचित्र बोलायचा पण ते मनाला लागल अस बोलायचा....

तो भोळा नव्हता हे पक्कं खरं होत... परिस्थितीने त्याला भोळं केलं होतं,तो जातांनी आमचं ठरलेले असायचे.पुलावर घोडा करून बसायचं व पुलाखाली बघून मोठ्याने दोन-तीन गाणे म्हणायचे,ज्याचा आवाज खाली घुमायचा अन् आम्हाला पुन्हा ऐकु यायचा....

परभ्या हसत म्हणायचं अरे खाली आपले दोस्त आहे काय यार भाई...ते पण गाणे म्हंत्या अन् तो पुन्हा दोन्ही पायाच्या मध्ये काडी टाकून गाणी म्हणत मला चल भाई जाता हुं,कोई और डुक्कर,कुत्ता मर गया तो आउंगा मिलने दोबारा,तु यहां रहे असे म्हणत निघून जायचा...

मी बघत राहायचो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे,कधीतरी यायचा तो पुन्हा.
पण मी या दुनियादारी मध्ये हरलो,कर्तव्याच्या डोंगरात हरलो अन् माझ्या या दोस्ताला कायमचा हरवून बसलो....

कधीतरी दिसतो मला तो,पण आता नाही ओळखत तो मला.कदाचित मी त्याला विसरलो म्हणून ओळख देत नसेल होनं तो...?

#परभ्या_हरवलेल्या_दोस्तातला_राजा_माणुस...

Written by,

Bharat Sonwane....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ