मुख्य सामग्रीवर वगळा

AGNIPATH RECRUITMENT SCHEME

AGNIPATH RECRUITMENT SCHEME

साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय डिफेन्स क्षेत्रात भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करण्यात आला जो निर्णय अत्यंत धक्कादायक असा आहे..!

वरवर जरी हे सर्व खूप सहज अन् सोप्पं वाटणारं असले,तरीही भविष्याचा विचार केला असता ही योजना कितपत काम करेल हा प्रश्न आहे..!

तर चला जाणून घेऊया भारतीय सैन्याच्या तिन्ही प्रकारात भरतीसाठी जो नवीन मार्ग अवलंबिला गेला त्या "अग्निपथ" या नवीन योजनेबद्दल..!

काय आहे अग्निपथ योजना..?
भारत सरकारने नवीन भरती प्रक्रिया अग्निपथची घोषणा दोन तीन दिवसांपूर्वी केली.या भरती प्रक्रियेतून जे सैनिक तयार होतील त्यांना अग्निवीर म्हंटल्या जाईल..!

"अग्निपथ" माध्यमातून पुढील काही वर्षात होणारी सैन्य दलातील भरती.

IndianArmy - 40000-45000-50000.
Indian Air Force - 3500-4400-5300.
Indian Navy - 3000-3000-3000.

अग्निवीरची पहिली बॅच पुढील 90 दिवसांत सुरू होईल अन् ही पहिली बॅच 2023 मध्ये येईल.
शिपाई,एअरमन,सेलर्स या पदासाठी अग्निपथ माध्यमातून भरती होत राहील.ज्यामधे वयोमर्यादा ही  कमीत कमी 17 वर्ष ते जास्तीत जास्त 21 वर्ष असेल.भरतीसाठी लागू असलेले नियम तेच असेल जे नेहमीच्या भरतीसाठी असतात.भरती प्रक्रियेतून निवड ही मेरिट लिस्टनुसारच असेल..!

भरती झाल्यावर ट्रेनिंग ही दहा आठवडे ते सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत असेल.ट्रेनिंग पिरियड मिळून संपूर्ण सर्व्हिस ही चार वर्षांची असेल.ज्यामधे वार्षिक वेतन हे 4.76 लाख ते 6.92 लाखपर्यंत चार वर्ष वाढत राहिल.

चार वर्षानंतर अग्नीवीर रेगुलर कॅडरसाठी आवेदन अर्ज करू शकतात,ज्यामध्ये योग्यतेनुसार 25% अग्नीवीरांना पर्मनंट केले जाईल.चार वर्षानंतर पेन्शन नसेल,सेवनिधी रुपात महिन्याची 30 % सॅलरी कापली जाईल.जीचा परतावा तुम्हाला चार वर्षानंतर व्याजासहित जवळजवळ 10.04 लाख रुपये मिळतील..!

सर्व्हिस दरम्यान सर्व सैनिकांचे 48 लाख रुपयांचे नॉन प्रीमियम इन्शुरनस असेल.सर्व्हिस दरम्यान शहीद झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 44 लाख रुपये मिळतील.अपंगत्व आल्यास 100% अक्षमता असल्यास 44 लाख,75% असल्यास 25 लाख,50% असल्यास 15 लाख इतकी रक्कम मिळतील..!

हे झाले या योजनेचे स्वरूप,परंतु 21 वर्षानंतर संपूर्ण सर्व्हिस करून जो मोठ्या प्रमाणात युवा वर्ग बाहेर पडेल त्यांच्या भविष्याचे काय..? अन् ही योजना समजून घेतली तर किती तरुण भारतीय सैन्य दलात जाण्यास इच्छूक असेल..? असे अनेक प्रश्न आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...