मुख्य सामग्रीवर वगळा

Industrial Revolution..!

Industrial Revolution..!

माणसं जोडायला हवी आहे, माणसांच्या सहवासात आयुष्य जगण्याची कला एकदा एकसंध आयुष्य जगणाऱ्या माणसाला लाभली की तो आयुष्यभर विचारांनी भटकत न राहता स्थिर होत असतो.

मला आठवते माझं एक्कलकोंडी अवस्थेत आयुष्य जगणं जरी मनाला समाधान देणारे होते. तरीही माणसांच्या सहवासात आले की, माझी होणारी अवस्था ही त्या लहानग्या पोरांनी भर वस्तीतून एखाद्या कुत्र्याच्या पेकाटात लाथा, दगडं हाणून त्याला भर वस्तीतून हाकलून लावावं. ते कुत्रं जसं भेदरलेल्या अवस्थेत या वस्तीतून त्या वस्तीत भाकर, कुटका भेटल या कारणाने घाबरत घाबरत भटकत रहायचं तशी होऊन जायची.

कामगार चौकात माझ्या सुरुवातीच्या काळातील दिवसांमध्ये मी ही असाच भटकत राहिलो. माझं गाव शिक्षण खूप झाल्यानं आता माझं पोट भरवू शकत नव्हतं, अन् मलाही इथली भिक्कार जिंदगी नको होती.
आयुष्यात काही बदल हवे होते, म्हणून मी ही भाकरीच्या तुकड्याच्या शोधार्थ या वस्ती जवळ केल्या.

शहरात राहणाऱ्या प्रत्येक त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारास त्याचा भाकरीसाठीचा संघर्ष विचारा. सुरुवातीचे काही दिवस नावाला असलेल्या कॉट बेसीस हॉस्टेल कम एक मोठी कचरा कुंडी असावी अश्या हॉस्टेलला दिवस काढले.

पर्याय नसतो, जिथं एकवेळ जेवणाची सोय नसते तिथं काळोखाच्या राती डोक्यावर असलेलं हे छप्पर खूप आधार देणारं अन् नकळत भूक भागवणारे असते.

सुरुवातीच्या काळात पाण्यात बुडवून एक बिस्किटाच्या पुड्यावर दिवस काढणारी मित्र मी बघितली. त्यांच्या कळकटलेल्या गोधड्यामध्ये झोपलो त्यांच्या संगतीने.

औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम भेटल म्हणून कंपनीच्या या नाही त्या गेटवर भटकत राहिलो. आधार कार्ड अन् बारावीचं मार्कशिट झेरॉक्स काढून काढून इतकं घासले की झेरॉक्स काढणारा पण आता आम्हाला बघून हसायला लागला.

अन् कंपनीचे सेक्युरीटीगार्ड पण आमचे थोबाड बघून म्हणू लागला की पोरा तू आदी दोनदा तुझा बायोडाटा कंपनीच्या गेटवर दिला हाय अन् तुझ्या त्या कागदाचा Hr Team  विचार करत आहे. लग्नाचा बायोडाटा घेऊन फिरायच्या वयात ही पोरं आपल्याला सिद्ध करण्यासाठी अशी भटकत राहिली.

सगळ्यांनीच आशेवर लावलेलं असायचं आम्हाला पण काही दोन-चार महिन्यांपूर्वी एका मित्राच्या याच झेरॉक्सच्या कागदावर एका बाजूने असलेल्या कोऱ्या कागदावर सेक्युरीटीगार्ड त्यांच्या रोजच्या कामाच्या नोंदी ठेवत होता,हे बघितलं. अन् आम्ही रोज आशेनं येरझऱ्या घालत होतो.

विचार केला तर तो सेक्युरीटीगार्ड बाबाही आमच्यासारखा कंत्राटी कामगारच होता. पण या विश्वात कसं आहे 'ज्याचं फावलं त्याचं देवाला दावलं' अन् याच वृत्तीवर वसाहतील्या दोन एकशे कंपन्या काम करत राहतात.

पण एक दिवस असा येईल आंदोलने होतील, कामगार संपावर जातील अन् या वसाहती धडाधड बंद पडतील. यंत्रांची घरघर थांबेल नाहीतर पैश्याच्या जोरावर कंपनीचा मालक दुसऱ्या प्रांतातील मजूर लोकं घेऊन येईल.

हे जास्त दिवस चालणार नाही, कंत्राटी कामगारांच्या आयुष्याला लागलेली घरघर या कंपन्यांना स्वस्तपणे चालू देणारच नाही. अन् एखाद दिवशी एखाद्या कंपनीत असा मोठा स्फोट होईल की, हजार दोन हजार कंत्राटी कामगारांचे मुर्दे कंपनीतून बाहेर काढावे लागतील.

मग कंपनी जळून खाक होईल, धुराचे लोट आसमंतात जागा घेईल आणि एकदिवस ही औद्योगिक वसाहत कायमची बंद होऊन जाईल. 

हजारो लोकांचा रोजगार बंद होईल, ते परत भटकत राहतील या शहरातून त्या शहरात. कुणी व्यसनाच्या आहारी जाऊन पडून राहतील त्या बंद पडलेल्या वसाहतीच्या सांगाड्यात. जिथं त्यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष खर्ची केली होती अन् आता पिऊन पिऊन त्यांचा आपल्या शरीराचा सांगाडा सापळा होऊन दिसू लागला होता...

लिहेल कधीतरी...

Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड