मुख्य सामग्रीवर वगळा

Industrial Revolution..!

Industrial Revolution..!

माणसं जोडायला हवी आहे, माणसांच्या सहवासात आयुष्य जगण्याची कला एकदा एकसंध आयुष्य जगणाऱ्या माणसाला लाभली की तो आयुष्यभर विचारांनी भटकत न राहता स्थिर होत असतो.

मला आठवते माझं एक्कलकोंडी अवस्थेत आयुष्य जगणं जरी मनाला समाधान देणारे होते. तरीही माणसांच्या सहवासात आले की, माझी होणारी अवस्था ही त्या लहानग्या पोरांनी भर वस्तीतून एखाद्या कुत्र्याच्या पेकाटात लाथा, दगडं हाणून त्याला भर वस्तीतून हाकलून लावावं. ते कुत्रं जसं भेदरलेल्या अवस्थेत या वस्तीतून त्या वस्तीत भाकर, कुटका भेटल या कारणाने घाबरत घाबरत भटकत रहायचं तशी होऊन जायची.

कामगार चौकात माझ्या सुरुवातीच्या काळातील दिवसांमध्ये मी ही असाच भटकत राहिलो. माझं गाव शिक्षण खूप झाल्यानं आता माझं पोट भरवू शकत नव्हतं, अन् मलाही इथली भिक्कार जिंदगी नको होती.
आयुष्यात काही बदल हवे होते, म्हणून मी ही भाकरीच्या तुकड्याच्या शोधार्थ या वस्ती जवळ केल्या.

शहरात राहणाऱ्या प्रत्येक त्या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारास त्याचा भाकरीसाठीचा संघर्ष विचारा. सुरुवातीचे काही दिवस नावाला असलेल्या कॉट बेसीस हॉस्टेल कम एक मोठी कचरा कुंडी असावी अश्या हॉस्टेलला दिवस काढले.

पर्याय नसतो, जिथं एकवेळ जेवणाची सोय नसते तिथं काळोखाच्या राती डोक्यावर असलेलं हे छप्पर खूप आधार देणारं अन् नकळत भूक भागवणारे असते.

सुरुवातीच्या काळात पाण्यात बुडवून एक बिस्किटाच्या पुड्यावर दिवस काढणारी मित्र मी बघितली. त्यांच्या कळकटलेल्या गोधड्यामध्ये झोपलो त्यांच्या संगतीने.

औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम भेटल म्हणून कंपनीच्या या नाही त्या गेटवर भटकत राहिलो. आधार कार्ड अन् बारावीचं मार्कशिट झेरॉक्स काढून काढून इतकं घासले की झेरॉक्स काढणारा पण आता आम्हाला बघून हसायला लागला.

अन् कंपनीचे सेक्युरीटीगार्ड पण आमचे थोबाड बघून म्हणू लागला की पोरा तू आदी दोनदा तुझा बायोडाटा कंपनीच्या गेटवर दिला हाय अन् तुझ्या त्या कागदाचा Hr Team  विचार करत आहे. लग्नाचा बायोडाटा घेऊन फिरायच्या वयात ही पोरं आपल्याला सिद्ध करण्यासाठी अशी भटकत राहिली.

सगळ्यांनीच आशेवर लावलेलं असायचं आम्हाला पण काही दोन-चार महिन्यांपूर्वी एका मित्राच्या याच झेरॉक्सच्या कागदावर एका बाजूने असलेल्या कोऱ्या कागदावर सेक्युरीटीगार्ड त्यांच्या रोजच्या कामाच्या नोंदी ठेवत होता,हे बघितलं. अन् आम्ही रोज आशेनं येरझऱ्या घालत होतो.

विचार केला तर तो सेक्युरीटीगार्ड बाबाही आमच्यासारखा कंत्राटी कामगारच होता. पण या विश्वात कसं आहे 'ज्याचं फावलं त्याचं देवाला दावलं' अन् याच वृत्तीवर वसाहतील्या दोन एकशे कंपन्या काम करत राहतात.

पण एक दिवस असा येईल आंदोलने होतील, कामगार संपावर जातील अन् या वसाहती धडाधड बंद पडतील. यंत्रांची घरघर थांबेल नाहीतर पैश्याच्या जोरावर कंपनीचा मालक दुसऱ्या प्रांतातील मजूर लोकं घेऊन येईल.

हे जास्त दिवस चालणार नाही, कंत्राटी कामगारांच्या आयुष्याला लागलेली घरघर या कंपन्यांना स्वस्तपणे चालू देणारच नाही. अन् एखाद दिवशी एखाद्या कंपनीत असा मोठा स्फोट होईल की, हजार दोन हजार कंत्राटी कामगारांचे मुर्दे कंपनीतून बाहेर काढावे लागतील.

मग कंपनी जळून खाक होईल, धुराचे लोट आसमंतात जागा घेईल आणि एकदिवस ही औद्योगिक वसाहत कायमची बंद होऊन जाईल. 

हजारो लोकांचा रोजगार बंद होईल, ते परत भटकत राहतील या शहरातून त्या शहरात. कुणी व्यसनाच्या आहारी जाऊन पडून राहतील त्या बंद पडलेल्या वसाहतीच्या सांगाड्यात. जिथं त्यांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदीची वर्ष खर्ची केली होती अन् आता पिऊन पिऊन त्यांचा आपल्या शरीराचा सांगाडा सापळा होऊन दिसू लागला होता...

लिहेल कधीतरी...

Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...