मुख्य सामग्रीवर वगळा

Holiday's Thought's

Holiday's Thought's..!

सुट्टीचा दिवस निवांत असावं. दुपारची उन्हं खिडकीच्या अलीकडे येऊ लागली की काहीसं जीवावर करतच दुपारचं जेवण करायला म्हणून खानावळीच्या दिशेनं निघावं. रस्त्यानं भयंकर ट्रॅफिक, वाहनांचा धूर, माणसांची नकोशी वाटणारी गर्दी अन् घामाने मातकट झालेले चेहरे घेऊन खानावळीत येऊन बसावं. 

तुंबलेल्या सिंकमध्ये बघून श्र्वासावर नियंत्रण आणत सिंकसमोर असलेल्या शिंतोडे पडलेल्या आरश्यात बघून चेहरा, हात धुवून घेणं. सत्तरीच्या दशकातील या फळकटा असलेल्या खोलीवजा टपरीच्या खानावळीत एका अंगाला असलेल्या लाकडी टेबलला लागून असलेल्या खुर्चीवर बसून खानावळीतून येणाऱ्या बचकभर जेवणाची वाट बघत बसावं.

कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या पोरांचं या खानावळीत जेवणं काय. समोर असलेल्या एका उंच ईमारतीच्या कामावर रोजंदारीने काम करणाऱ्या पोरांचं इथे जेवणं काय, सगळं सारखं आहे. समाजातील श्रीमंत, गरीब असं इथे काहीच नाही. तांब्याच्या ताट, वाटीत जेवायचं, चिल्लर चाळीस रुपये द्यायचे. उपरण्याला तोंड पुसत पुन्हा तांब्याच्या गिल्लासात खिश्यात दहा रुपये असेल गिल्लासभर थंड दही पिऊन घ्यायचं.

खानावळीत जेवायला वाढून देणारी सिमत गळाला लागली तर; सायंकाळी खानावळीत आलं की, पिवळ्या बल्बच्या कातर उजेडात तिच्या अंगचटीला येऊन काळोखातच तिच्या कंबरेला हात घालून दोनशेची नोट तिच्या झंपरात घालायची.

जातांना बडीशेप सोबत खडीसाखर मागवून घ्यायची मग सौदा मंजूर. वाट घेऊन जाईल तिकडं ती भेटायला येते दोनशेत सगळं होतं. पुन्हा हफ्ताभर कॉर्पोरेट ऑफीसमध्ये काम करणारी पोरं लॅपटॉपशी खेळत राहतात. ईमारतीच्या बांधकामात काम करणारी पोरं मसाला कालवत राहतात.

भर दुपारच्या या उन्हात खानावळीतली जेवणं उरकली की, कधीतरी सिमतला सोबतीला घेऊन जुन्या गिरगावात हरवलेल्या कापड गिरण्यांच्या जमिनींवर त्यांचे सांगाडे बघत त्यांच्या भोंगा वाजण्याची वाट बघत बसायचं. 

सिमत सांगत राहते तिच्या जन्माच्या वेळी पडझड झालेल्या या कापड गिरण्यांच्या कहाण्या. तिच्या घारोळ्या डोळ्यात असलेलं दुःख, कुतूहल आपलं आपल्या डोळ्यांनी अनुभवत रहायचं. कधीतरी तिचे ओठ हे सगळं सांगत असताना थरथरले तर अलगद तिच्या ओठांच होऊन जायचं.  

ती सांगत राहते गिरणी कामगारांच्या व्यथा, सापळा झालेल्या या गिरण्यांच्या व्यथा. अन् कधीतरी आपलंस होऊन हातात हात घेऊन छान होतं रे ते सगळं आता माणसं माणसांत राहिली नाही. दोनशेत बाई विकत घेता येते. पण हा गिरगावातील बंद पडलेल्या गिरण्यांचा तळतकळाट लागून मरुन गेले कित्येक धनी लोकं. ती सांगत राहते आपण ऐकत रहावं.

पुन्हा आपलं रूमवर येऊन पडावं. हाताला जे येईल ते वाचत रहावं, गिरगावातील बंद पडलेल्या गिरण्यांच्या बाबतीत वाचत सुटावं. सिमतला तिच्या भूतकाळाला समजून घेत रहावं. अन् टिपण काढत काहीतरी टिपत रहावं. भर दुपारच्या उन्हात थिजल्या घामाला घेऊन समुद्राच्या किनाऱ्याशी गप्पा करत त्यालाही हे सगळं सांगत रहावं. 

हातचं काही नाही, हातचं काही नाही..!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...