मुख्य सामग्रीवर वगळा

Holiday's Thought's

Holiday's Thought's..!

सुट्टीचा दिवस निवांत असावं. दुपारची उन्हं खिडकीच्या अलीकडे येऊ लागली की काहीसं जीवावर करतच दुपारचं जेवण करायला म्हणून खानावळीच्या दिशेनं निघावं. रस्त्यानं भयंकर ट्रॅफिक, वाहनांचा धूर, माणसांची नकोशी वाटणारी गर्दी अन् घामाने मातकट झालेले चेहरे घेऊन खानावळीत येऊन बसावं. 

तुंबलेल्या सिंकमध्ये बघून श्र्वासावर नियंत्रण आणत सिंकसमोर असलेल्या शिंतोडे पडलेल्या आरश्यात बघून चेहरा, हात धुवून घेणं. सत्तरीच्या दशकातील या फळकटा असलेल्या खोलीवजा टपरीच्या खानावळीत एका अंगाला असलेल्या लाकडी टेबलला लागून असलेल्या खुर्चीवर बसून खानावळीतून येणाऱ्या बचकभर जेवणाची वाट बघत बसावं.

कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या पोरांचं या खानावळीत जेवणं काय. समोर असलेल्या एका उंच ईमारतीच्या कामावर रोजंदारीने काम करणाऱ्या पोरांचं इथे जेवणं काय, सगळं सारखं आहे. समाजातील श्रीमंत, गरीब असं इथे काहीच नाही. तांब्याच्या ताट, वाटीत जेवायचं, चिल्लर चाळीस रुपये द्यायचे. उपरण्याला तोंड पुसत पुन्हा तांब्याच्या गिल्लासात खिश्यात दहा रुपये असेल गिल्लासभर थंड दही पिऊन घ्यायचं.

खानावळीत जेवायला वाढून देणारी सिमत गळाला लागली तर; सायंकाळी खानावळीत आलं की, पिवळ्या बल्बच्या कातर उजेडात तिच्या अंगचटीला येऊन काळोखातच तिच्या कंबरेला हात घालून दोनशेची नोट तिच्या झंपरात घालायची.

जातांना बडीशेप सोबत खडीसाखर मागवून घ्यायची मग सौदा मंजूर. वाट घेऊन जाईल तिकडं ती भेटायला येते दोनशेत सगळं होतं. पुन्हा हफ्ताभर कॉर्पोरेट ऑफीसमध्ये काम करणारी पोरं लॅपटॉपशी खेळत राहतात. ईमारतीच्या बांधकामात काम करणारी पोरं मसाला कालवत राहतात.

भर दुपारच्या या उन्हात खानावळीतली जेवणं उरकली की, कधीतरी सिमतला सोबतीला घेऊन जुन्या गिरगावात हरवलेल्या कापड गिरण्यांच्या जमिनींवर त्यांचे सांगाडे बघत त्यांच्या भोंगा वाजण्याची वाट बघत बसायचं. 

सिमत सांगत राहते तिच्या जन्माच्या वेळी पडझड झालेल्या या कापड गिरण्यांच्या कहाण्या. तिच्या घारोळ्या डोळ्यात असलेलं दुःख, कुतूहल आपलं आपल्या डोळ्यांनी अनुभवत रहायचं. कधीतरी तिचे ओठ हे सगळं सांगत असताना थरथरले तर अलगद तिच्या ओठांच होऊन जायचं.  

ती सांगत राहते गिरणी कामगारांच्या व्यथा, सापळा झालेल्या या गिरण्यांच्या व्यथा. अन् कधीतरी आपलंस होऊन हातात हात घेऊन छान होतं रे ते सगळं आता माणसं माणसांत राहिली नाही. दोनशेत बाई विकत घेता येते. पण हा गिरगावातील बंद पडलेल्या गिरण्यांचा तळतकळाट लागून मरुन गेले कित्येक धनी लोकं. ती सांगत राहते आपण ऐकत रहावं.

पुन्हा आपलं रूमवर येऊन पडावं. हाताला जे येईल ते वाचत रहावं, गिरगावातील बंद पडलेल्या गिरण्यांच्या बाबतीत वाचत सुटावं. सिमतला तिच्या भूतकाळाला समजून घेत रहावं. अन् टिपण काढत काहीतरी टिपत रहावं. भर दुपारच्या उन्हात थिजल्या घामाला घेऊन समुद्राच्या किनाऱ्याशी गप्पा करत त्यालाही हे सगळं सांगत रहावं. 

हातचं काही नाही, हातचं काही नाही..!

Written by,
Bharat Sonawane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...