मुख्य सामग्रीवर वगळा

Touch to Mind Story..!

रात्रीच्या साडे अकराच्या शिफ्टवरून त्याची सुट्टी झाली अन् औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून तो चेकआउट करून बाहेर पडला. नुकतच शिफ्ट सुटली असल्या कारणाने औद्योगिक वसाहतीतील रस्ते काही दहा पंधरा-मिनिटं आता शुष्क काट्याच्या झाडाप्रमाणे झालेल्या, सुखुन गेलेल्या माणसांच्या, तरुण पोरांच्या गर्दीने आता वाहणार होती.


दीड किलो वजनाचा पायात असलेला सेफ्टी शूज घालून तोही त्याचा फ्लॅट जवळ करत होता. आता पावसाची संततधार सुरू झाली होती. अजून फ्लॅटवर काहीतरी खायला म्हणून घ्यायचं होतं.

आतापर्यंत उंचपुऱ्या असलेल्या त्याच्या अंगावरील सदरा पाण्याने पूर्ण भिजला होता. रस्त्याच्या आडोश्याला लागून असलेल्या झाडांच्या अडुंगी पावसापासून स्वतःचा बचाव करत तो एकदाचा अकबर चाचाच्या अंडाभुर्जीच्या गाडीवर आला.  एक फुल अंडाभुर्जी अन् दोन बॉईलचे पार्सल घेऊन तो फ्लॅटवर पोहचला फ्लॅट पार्टनर थर्ड शिफ्टसाठी म्हणून कंपनीत निघून गेला होता.

दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज पायातून काढत त्यानं सॉक्स पलंगावर उभ्यानेच फेकले. टॉवेलने डोकं पुसत तो बराचवेळ खिडकीतून बाहेर बघत बसला, पाऊस अजूनही बरसत होता. पन्हाळ्यातून पडणाऱ्या पाण्याचा वेग आता वाढला होता.

दूरवर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या भोंग्याचा आवाज कानी पडत होता. स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली आडोश्याला निजेलेल्या कुत्र्यांनी आपली कुस बदलून घेतली होती. 

झाडांच्या फांद्या मंद हवेच्या झोतात हलत होत्या, रातराणीचा सुगंध या हळुवार हवेत त्याच्यापर्यंत येऊन जात होता. अन् उद्याची सुट्टी असल्याची त्याला जाणीव अन् या जाणिवेने हरखुन जात त्यानं फ्लॅटचा दरवाजा आतून लॉक केला आणि ओसाड माळरानातील कवी रुमीच्या कविता तो वाचत बसला.

तासाभराने डोळ्यावर आलेली झोप खोलीतील बल्ब त्यानं मंद उजेडाचा केला अन् त्याच्याच अंगाशी तो आता खेळू लागला होता कवितेत त्यानं काय वाचलं असावं माहीत नाही. रात्रीचा दोन अडीचचा प्रहर कधीच उलटून गेला होता. वाहणारा वारा आता शांत निवांत झाला होता, निर्धोक बरसणारा पाऊस आताश्या शांत झाला होता रातराणीचा सुगंध अधिक मादक अन् मंद भासू लागला होता. 

बराचवेळ स्वतःच्या शरीराशी खेळून एकदाचा तो आता तृप्त झाला होता. सगळं कसं शांत भासावं असं झालं होतं अन् तो पलंगावर तसाच निवांत झोपून गेला होता.

तो जेव्हा पहाटे उठला दरवाजाच्याच्या कडीला दुधाची बॅग लावलेली होती. गॅलरीत वृत्तपत्र सर्वत्र मोकळे होऊन पसरलेले होते. विंडोग्रीलच्या आडून येणारा कोवळा सूर्यप्रकाश हवाहवासा वाटत होता. कित्येक दिवसांनी त्याला आज छान वाटत होतं. 

आज दिवसभर काहीच नाही हाताशी असलेल्या पुस्तकांना वाचत बसायचं. दुपारी मेसला गेलं की जवळच असलेल्या लायब्ररीतून एखाद दोन पुस्तकं घेऊन यायची. अन् फार फारतर सायंकाळी जवळच असलेल्या युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात असलेल्या बाकड्यावर बसून एखादे पुस्तक हातावेगळे करायचं असे ठरले होते. 

#Masterbution

क्रमशः 

Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...