मुख्य सामग्रीवर वगळा

Touch to Mind Story..!

रात्रीच्या साडे अकराच्या शिफ्टवरून त्याची सुट्टी झाली अन् औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून तो चेकआउट करून बाहेर पडला. नुकतच शिफ्ट सुटली असल्या कारणाने औद्योगिक वसाहतीतील रस्ते काही दहा पंधरा-मिनिटं आता शुष्क काट्याच्या झाडाप्रमाणे झालेल्या, सुखुन गेलेल्या माणसांच्या, तरुण पोरांच्या गर्दीने आता वाहणार होती.


दीड किलो वजनाचा पायात असलेला सेफ्टी शूज घालून तोही त्याचा फ्लॅट जवळ करत होता. आता पावसाची संततधार सुरू झाली होती. अजून फ्लॅटवर काहीतरी खायला म्हणून घ्यायचं होतं.

आतापर्यंत उंचपुऱ्या असलेल्या त्याच्या अंगावरील सदरा पाण्याने पूर्ण भिजला होता. रस्त्याच्या आडोश्याला लागून असलेल्या झाडांच्या अडुंगी पावसापासून स्वतःचा बचाव करत तो एकदाचा अकबर चाचाच्या अंडाभुर्जीच्या गाडीवर आला.  एक फुल अंडाभुर्जी अन् दोन बॉईलचे पार्सल घेऊन तो फ्लॅटवर पोहचला फ्लॅट पार्टनर थर्ड शिफ्टसाठी म्हणून कंपनीत निघून गेला होता.

दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज पायातून काढत त्यानं सॉक्स पलंगावर उभ्यानेच फेकले. टॉवेलने डोकं पुसत तो बराचवेळ खिडकीतून बाहेर बघत बसला, पाऊस अजूनही बरसत होता. पन्हाळ्यातून पडणाऱ्या पाण्याचा वेग आता वाढला होता.

दूरवर औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या भोंग्याचा आवाज कानी पडत होता. स्ट्रीट लाईटच्या उजेडाखाली आडोश्याला निजेलेल्या कुत्र्यांनी आपली कुस बदलून घेतली होती. 

झाडांच्या फांद्या मंद हवेच्या झोतात हलत होत्या, रातराणीचा सुगंध या हळुवार हवेत त्याच्यापर्यंत येऊन जात होता. अन् उद्याची सुट्टी असल्याची त्याला जाणीव अन् या जाणिवेने हरखुन जात त्यानं फ्लॅटचा दरवाजा आतून लॉक केला आणि ओसाड माळरानातील कवी रुमीच्या कविता तो वाचत बसला.

तासाभराने डोळ्यावर आलेली झोप खोलीतील बल्ब त्यानं मंद उजेडाचा केला अन् त्याच्याच अंगाशी तो आता खेळू लागला होता कवितेत त्यानं काय वाचलं असावं माहीत नाही. रात्रीचा दोन अडीचचा प्रहर कधीच उलटून गेला होता. वाहणारा वारा आता शांत निवांत झाला होता, निर्धोक बरसणारा पाऊस आताश्या शांत झाला होता रातराणीचा सुगंध अधिक मादक अन् मंद भासू लागला होता. 

बराचवेळ स्वतःच्या शरीराशी खेळून एकदाचा तो आता तृप्त झाला होता. सगळं कसं शांत भासावं असं झालं होतं अन् तो पलंगावर तसाच निवांत झोपून गेला होता.

तो जेव्हा पहाटे उठला दरवाजाच्याच्या कडीला दुधाची बॅग लावलेली होती. गॅलरीत वृत्तपत्र सर्वत्र मोकळे होऊन पसरलेले होते. विंडोग्रीलच्या आडून येणारा कोवळा सूर्यप्रकाश हवाहवासा वाटत होता. कित्येक दिवसांनी त्याला आज छान वाटत होतं. 

आज दिवसभर काहीच नाही हाताशी असलेल्या पुस्तकांना वाचत बसायचं. दुपारी मेसला गेलं की जवळच असलेल्या लायब्ररीतून एखाद दोन पुस्तकं घेऊन यायची. अन् फार फारतर सायंकाळी जवळच असलेल्या युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात असलेल्या बाकड्यावर बसून एखादे पुस्तक हातावेगळे करायचं असे ठरले होते. 

#Masterbution

क्रमशः 

Bharat Sonawane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...