मुख्य सामग्रीवर वगळा

गुपित आयुष्याचे..!

गुपित आयुष्याचे..!

मी माझा एकाकीच बरा होतो,अलिकडे गेले काही दिवस माणसांच्या सहवासात होतो अन् आता जेव्हा पूर्वापार असलेला मीच मला पुन्हा नव्याने भेटलो तेव्हा माझी मलाच विचार करायला लावणारी माझी मलाच पुन्हा एकदा नव्याने भेट झाली.त्यावेळी खूप काही चुकल्यासारखे वाटत होते अन् ते खरेही आहे,गेले काही दिवस खूप काही हातचे सुटून गेल्यासारखे झालं आहे,मला वाटतं आहे..!

अस्ताला जाणारा सूर्य,सूर्याच्या साक्षीने जेव्हा सायंकाळची भटकंती रोजच नियमाने होत असायची,तेव्हा मी निसर्गातील सजीव असून निर्जीव असलेल्या झाडांना,फुलांना,दगडांना,डोंगरदऱ्यांना बोलतं करत होतो,तेही माझाशी संवाद साधत असायचे.
या अवस्थेला यायला मला जवळ जवळ दोन वर्ष लागली होती,माणसांशी माणसे बोलतात पण माणसांनी या निसर्गातील या निर्जीव गोष्टींशी संवाद साधायला,संवाद करायला नको का..?
म्हणून पांथस्थ होवून माझं विश्व अन् मी त्यांच्यात समरस होऊन हे सर्व अनुभवत होतो...

पण पण...!
गेले काही दिवस पुन्हा या माणसांच्या दूनियेशी संबंध आला अन् गेले दोन वर्ष जे एकांतांच्या सान्निध्यात राहून मी निसर्गाशी एकरूप झालो होतो ते कुठेतरी या महिना-पंधरा दिवसांत माणसांच्या सहवासात मला विसरायला झालं...
जेव्हा-केव्हा पुन्हा हीच वेळ येते,तेव्हा मात्र आत्मपरीक्षण केलं की आपलं आयुष्य खूप काहीतरी वेगळं विश्व असलेलं आहे याची प्रचिती येते.अन् आज सारखे पुन्हा आपले तेच विश्व आपल्यासाठी अन् आपल्या सभोवतालच्या सजीव असून निर्जीव असलेल्या सोबत्यांसाठी आहे हे कळून चुकते..!

अलीकडे मध्यरात्री असलेला माझा भटकंतीचा प्रवास सायंकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याबरोबर येऊन ठेपला आहे,स्ट्रीट लाईटच्या उजेडात वाट न शोधता माझी रस्त्याच्या मधोमध पडणारी लांबच लांब सावली शोधत तिच्या मार्गाने चालायला अलिकडे मला आवडत नाही...

एरवी मी सायंकाळीच स्ट्रीट लाईटचा उजेड पडण्यापूर्वी भटकायला बाहेर निघतो,आता ओळखीचा स्ट्रीट लाईटचा उजेड नसतो पण ओळखीची माणसे रस्त्याने भेटत असतात...
त्यांच्यात मीच मला नव्याने शोधत पुन्हा स्ट्रीट लाईट कधी चालू होईल अन् कधी आता त्याच्या उजेडात मी चालत राहिल याची वाट बघत असतो...

अश्यावेळी मग ही माणसं मला नकोशी होतात ती खायला उठतात मला,त्यांचं असणं किंवा माझं अस्तित्व मग मला नकोसे होते मग मी पुन्हा एकदा स्ट्रीट लाईटच्या उजेडात हलणाऱ्या झाडांशी,पान,फुलांशी,दगडांशी,खदानितील काळ्याश्यार पाण्याशी आपलुकीचे दोन शब्द करत असतो,बोडक्या टेकडीच्या काळ्याश्यार खडकाशी बोलत असतो..!

त्यांचा हा सहवास अलिकडे हवाहवासा वाटतो आहे,म्हणून पुन्हा एकदा आता परतीच्या वाटेवर हा प्रवास सुरू करायचा आहे..!

Written by,
Bharat Sonwane .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...