मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य हरवलेल्या माणसांची गणितं..!

आयुष्य हरवलेल्या माणसांची गणितं..!


आयुष्यात आयुष्याला घेऊन रिकामपण आलेली माणसं आपल्या आयुष्यातील आठवणींवर आपल्या दिवसातील २४ तासातील जवळ जवळ ७०% दिवस हा आपल्या भूतकाळातील आठवणींवर जगत असतो.उरलेल्या ३०% दिवस तो फार फारतर ५% झोप घेत असतो अन् उरलेल्या २५% दिवस मधील  १५% दिवस तो उद्याचे आपले उज्ज्वल आयुष्य आणि सगळं सोईनुसार नाही झालेच तर ठोखरा खात आपण जगत असलेलं भविष्य काळातील आयुष्य डोळ्यांसमोर कल्पनेत बघत असतो.त्यात राहिलेला १०% असलेला दिवस हा फक्त वर्तमान काळातील आयुष्य फक्त तो जगत असतो.
त्यातही बराच वेळ तो फक्त अनेक गोष्टींशी,अनेक तर्क वितर्क लावण्यासाठी घालवत असतो...

हे असं आयुष्य जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात शक्यतो फारसे बदल होत नाही अन् झालेच तर ते खूप हळुवारप्रमाणे होतात.इतके हळुवार की त्याला सुद्धा या भविष्यातील येणाऱ्या सुखाची चाहूल होत नसते.या सुखासाठी सुद्धा त्याला आपण भोगत असलेले एकाकीपण अन् आपलं हे हळुवार आयुष्य योग्य अन् कारणी लागत आहे असं वाटत असते..!

या माणसांना शक्यतो कुणाचा सहवास नकोसा वाटतो,अंधार हवाहवासा वाटतो.पहाटेचा सूर्योदय कधीतरी यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी असा वाटणारा असतो.परंतु जसं जसं दिवस दुपार होवून मावळतीकडे जातो तसतसे त्यांना वरील टक्क्यांचा त्यांचा दिवस अन् त्यांचे हे आयुष्य अश्यावेळी अनुभवयाला येते...

त्यांना सायंकाळ हवीहवीशी वाटते,संध्याकाळी त्यांना आपल्या सहवासात कुणी आपल्या जवळची,आपल्याला समजून घेणारी व्यक्ती अन् तिचा सहवास हवहवासा वाटतो.त्यांच्या आयुष्यात आलेलं एकाकीपण अन् आयुष्यातील आलेलं नैराश्य,वर्तमान काळातील डोळ्यांना दिसणारी अवस्था बघितली की त्यांना पुन्हा काहीही नको वाटते अन् मग ते एकाकी निसर्गाच्या सान्निध्यात जावून अस्ताला जाणाऱ्या सूर्याला,खडकात साचलेल्या पावसाच्या पाण्याला अन् वेळोवेळी दूरवरून आपण आलेल्या वाटेवर चालणाऱ्या नॉर्मल व्यक्तींना बघत बसलेले असतात..!
 
मग पुन्हा त्यांच्याशी त्यांचं आपल्याला जुळवून बघणं होतं.अश्यावेळी आपण आयुष्याच्या या टप्प्यावर काय मिळवलं आहे अन् भविष्यात आपल्याला काय करायचं आहे याची जुळवाजुळव होवू लागते मग ती त्यांच्या स्वतःशीच..!

मग पुन्हा शून्यात बघत एकटक विचार करत राहते ती व्यक्ती अश्यावेळी जगण्यात आलेलं रिकामपण,आयुष्याला घेऊन केला जाणारा विचार यामुळे तो अजूनच एकाकी होत जातो अन् पुन्हा त्याला कुणीही नकोसे वाटते,कुणाचाही सहवास नकोसा वाटतो..!

त्यांना वेळोवेळी समजून घेणारी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात असली की मग ते फक्त त्या व्यक्तीसाठी अन् तिच्या उज्वल भविष्यासाठी विचार करत असतात.अशी ही माणसे विचारांनी फार हळवी झालेली असतात,कुणाचे दुःख त्यांना बघितले जात नाही अन् ते बघण्यात आलेच तर त्याच्याशी ते आपल्या आयुष्यातील वर्तमान काळाला जोडून बघत असतात..!

अश्या व्यक्तींच्या दिवसातील झोपेचे ५% हे प्रत्यक्ष न अनुभवता कळत नाही,कारण त्यांची झोपसद्धा विचारांच्या गर्तेत अन् त्याच स्वप्नांचा पाठलाग करत जात असते ज्यात भविष्यातील उज्ज्वल काळासाठी काही प्लॅनिंग रचलले असतात..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...