मुख्य सामग्रीवर वगळा

कित्येक दशकं "Industrial Revolution" च्या दिशेनं औरंगाबाद शहराचा होत असलेला प्रवास..!

कित्येक दशकं "Industrial Revolution" च्या दिशेनं औरंगाबाद शहराचा होत असलेला प्रवास..!

१९८५ साली औरंगाबाद येथे बजाज कंपनीचा प्लांट उभारण्यात आला आणि औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख मिळण्यास सुरुवात झाली. यापूर्वी औरंगाबाद पर्यटन क्षेत्रात "पर्यटन राजधानी" म्हणून आपले स्थान कायम ठेवून होतेच.परंतु आता नव्याने "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब" ही औरंगाबाद शहराची नवी ओळख झाली होती...

नव्वदीच्या दशकात औरंगाबाद शहराची बऱ्यापैकी अर्थव्यवस्था ही औद्योगिक वसाहतीत नव्याने निर्माण झालेल्या कंपन्यांनवर अवलंबून होती. यात मुख्यत्वे बजाज कंपनी ही त्यावेळी औरंगाबाद शहरासाठी खूप महत्त्वाची कंपनी होती, जी आजही आहे. शेकडो कंपन्या आजमितीला शहराच्या चहूबाजूने औद्योगिक वसाहतीत उभारल्या गेल्या आहे.

औरंगाबाद शहरातील काही जुने लोकं आजही म्हणतात की, दिवाळीच्या दिवसांमध्ये जोवर बजाज कंपनीतील कामगारांना बोनस मिळत नाही तोवर शहराची बाजारपेठ ही थंडावलेली असायची. ज्या दिवशी दिवाळीचा बोनस कंपनीतून कामगारांना मिळत असायचा त्या दिवशी बाजारपेठ बघण्यासारखी फुललेली असायची.

अर्थात औरंगाबाद शहराचे अर्थकारण हे या कंपनीच्या चक्रावर फिरत असायचे, इतका रोजगार त्यावेळी बजाज माध्यमातून कामगारांना बजाज कंपनी देत होती. त्यामुळेच कदाचित औरंगाबादकरांचे "हमारा बजाज"शी एक भावनिक नाते आहे..!

असो बजाज कंपनीला घेऊन मी औरंगाबाद शहराची ऑटोमोबाईल क्षेत्रातील एक नवीन ओळख थोडक्यात सांगितली. आजमितीला अश्या अनेक कंपन्या या औरंगाबाद शहराशी जोडल्या गेल्या आहेत. औरंगाबाद शहराला एक नवीन ओळख देण्याचं काम यासर्व कंपन्या करत आहे.

माझ्यामते जवळजवळ बऱ्यापैकी औरंगाबाद शहराची अर्थव्यवस्था, आर्थिक उलाढाल ही औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या कंपन्यांच्या बळावर औरंगाबाद शहर करत आहे. आशिया खंडात एक नवी ओळख औरंगाबाद शहराला नव्वदीच्या दशकातच "ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल हब" ही ओळख वाळूज एमआयडीसी, चिखलठाण एमआयडीसी, चितेगाव एमआयडीसी, रेल्वे स्टेशन परिसरातील एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी, शेंद्रा औद्योगिक वसाहत यांनी दिली.

पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणजेच दिल्ली आणि मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरम यांच्या संयुक्त विद्यमाने आलेला 'ऑरिक आधुनिक वसाहत' हा प्रकल्प याची एक नवीन भर पडली आहे. उद्योग वाढीला, उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकीला विविध कंपन्यांना औरंगाबाद शहरात एक मोठी स्पेस, प्लेटफाॅर्म उपलब्ध झालेला आहे. बरेच देश विदेशातील नवीन प्रकल्प ऑरीकच्या माध्यमातून समोर येत आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला रोजगार.

इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असल्यामुळे औरंगाबादचा औद्योगिक क्षेत्रातील विकास पुढील काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल,यात शंका नाही.औरंगाबाद शहर औद्योगिक वसाहतींचे शहर म्हणून जो आलेख रेखाटला गेला आहे तो नियमित उंचावत राहीलेला असेल.

'ऑरिक सिटी' हा केंद्र सरकारचा हा एक महात्वाकांशी प्रकल्प आहे. देशातील स्मार्ट औद्योगिक वसाहतीमध्ये ऑरीक सिटी आणि संबंधित औद्योगिक समुहांचे प्रामुख्याने यामध्ये नाव घेतली जाते. जपान सरकारच्या सहकार्याने भारतात राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पात विकास, अतिउच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे जे लक्ष होते ते पुर्णपणे पुर्णत्वास आले आहे.

औरंगाबाद शहरात ज्याप्रमाणात ऑटोमोबाईलशी निगडित कंपन्यांना येण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. तेव्हढ्या प्रमाणात कुठेतरी आयटी क्षेत्रात असलेल्या कंपन्यांना, प्रकल्पांना प्राधान्य दिलेले दिसत नाही. ही एक खंत कायम वाटते.
आयटी क्षेत्रातसुद्धा आपल्या शहराचा आलेख हळूहळू का होईना गेले काही वर्ष उंचावता आहे, बऱ्याच छोट्या-छोट्या कंपन्या या औरंगाबाद शहरात आयटी पार्कमध्ये आपली नावे करत आहेत. परंतु काळाची गरज ओळखून याबाबतीत लवकरच मोठे निर्णय घेतल्या गेले तर औरंगाबाद शहराच्या विकासास चालना मिळेल.

या क्षेत्रातील कंपन्यांना जर औरंगाबाद शहरात स्थान दिले, ते आणण्यासाठी प्रयत्न केले. तर बराच सुशिक्षित बेरोजगार तरुण आपले कौशल्य दाखवून या क्षेत्रातही रोजगार मिळवू शकतो. यामुळे औरंगाबाद शहराला अजून एक नवी ओळख आय टी हबच्या रूपाने मिळेल 
हे सगळं आणि औरंगाबाद शहराचे अर्थकारण बघता "रिअल इस्टेट" क्षेत्रातसुध्दा शहर कसे मागे राहील. गेल्या दोन दशकात औरंगाबाद शहरातील नागरिकांनी रिअल इस्टेट विश्वात केलेली गुंतवणूक आणि त्यामुळे गृहनिर्माण संस्थांचे उभे राहिलेले असंख्य प्रोजेक्ट्स,फ्लॅट सिस्टम,रो-हाऊसेस यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती हे सगळं विचार करायला लावणारं आहे.

औरंगाबाद शहर कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हा ही विचार अश्यावेळी मनात येऊन जातो. आशिया खंडात सर्वाधिक महाग रेडी पोझिशन घरांच्या किंमती असो किंवा जागेच्या किंमती यांची नोंद असलेल्या यादीतसुद्धा औरंगाबाद शहर पुणे शहराची बरोबरी करू बघत आहे.

औरंगाबाद शहराच्या लगत जाणारा समृद्धी महामार्ग जो की खूप भव्यदिव्य असा आहे ज्यामुळे दळणवळण करणे अजूनच सोयीचे झाले आहे. औरंगाबाद शहरातील विमानतळ तेथून होणारी आयात-निर्यात हे सर्व लक्ष वेधून घेणारं आहे. शहराचा दिवसेंदिवस वाढणारा विस्तार आणि औरंगाबाद शहराचे बदलणारे रूप नक्कीच औरंगाबाद शहराची वाटचाल ही आशिया खंडातील एक महत्त्वपूर्ण शहर आहे या दिशेनं होणारी आहे.

औरंगाबाद शहरात उपलब्ध झालेला रोजगार आणि एकीकडे कोरोनोत्तर काळात उद्योग विश्वात झालेला बदल,नवीन रुजु झालेल्या संकल्पना अन् पुन्हा एकदा आता औरंगाबाद शहराजवळील औद्योगिक वसाहती नव्यानं येणाऱ्या कंपन्यांचा चढता आलेख,कोरोनाच्या वाईट काळातील दिवसांना अनुभवत पुन्हा पुर्ववत औद्योगिक वसाहतींमध्ये चालु झालेला कारभार या सर्व गोष्टी औरंगाबाद शहर हे आशिया खंडातच नव्हे तर जगतात औद्योगिक क्षेत्रात किती उंचीवरील अन् महत्त्वपूर्ण शहर आहे हे दाखवून देत आहे...

नवीन निर्माण होणारा रोजगार लक्षात घेता आगामी काळात येथे मोठ्या प्रमाणावर रहिवासी प्रकल्पाची गरज भासणार आहे.अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले रहिवासी प्रकल्प 'रिअल इस्टेट'च्या जगतात सुगीचे दिवस आणु बघत आहे,एकुण शहराचा विकास औद्योगिक क्षेत्राच्या आधारावर भरभराटीस येऊ बघत आहे...

सोबतच काही अंशी का होईना परंतु आता नव्याने काही नवीन प्रकल्प उभे राहण्यासाठी स्थानिक उद्योजक असो किंवा परदेशी उद्योग विश्वातून उद्योजक भारत देशात आपले प्रकल्प या ठिकाणी स्थायिक करण्याचा प्रयत्न करत आहे,औरंगाबाद शहरात आपले पावलं रोवू बघत आहे.दिवसेंदिवस आधुनिक टेक्नॉलॉजी मुळे होणारे बदल स्वीकारत शहरात एमआयडीसी मधील प्रकल्पा अंतर्गत औद्योगिकविश्वात होणाऱ्या घडामोडी हे सर्व बघण्यासारखे आहे...

औरंगाबाद शहर फक्त ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल एरियासाठी मर्यादित न राहता,फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपलं स्वतंत्र नाव उभे करत आहे. आज देशा-परदेशातील नामांकित फार्मा ५०-६० कंपन्या या औरंगाबाद शहराला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीत आपले प्लांटस उभे करत आहे काही वर्षानूवर्ष चालू आहेत. एकीकडे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईल इंडस्ट्रीयल क्षेत्रात आपले मुळं रूजवून आहे तर सोबतच,फार्मा क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी बघता फार्मा क्षेत्रातील औरंगाबाद शहरालगत औद्योगिक वसाहतीत असलेल्या कंपन्या बघता आॅटोमोबाईल क्षेत्रानंतर सर्वाधिक कंपन्या असलेलं फार्मा क्षेत्र ठरत आहे.

आजमितीला या कंपन्यांच्या माध्यमातुन खूप मोठ्या प्रमाणात रोजगार हा औरंगाबाद शहर अन् जवळपास असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांना उपलब्ध झालेला आहे.
औरंगाबाद शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीत अनेक जगप्रसिद्ध नामांकित कंपन्यांनी आपलं प्रोडक्शन हाऊस उभारले आहे,ज्या माध्यमातून सर्व विश्वात मेडीसिन पुरवण्याचे कार्य या कंपन्या करत आहेत.कोरोना ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरलेला होता,त्यावेळी रात्रंदिवस या कंपन्यानी प्रोडक्शन चालू ठेवून आपली कामगिरी पूर्ण केली आहे अन् खूप मदत प्रशासनाला केली आहे .!

औरंगाबाद शहरालगत असलेल्या पाच औद्योगिक वसाहतीत आज घडीला अनेक देश विदेशी फार्मा कंपन्यांनी आपले पाय रोवले आहे.यातील काही कंपन्यानी जवळ जवळ दोन दशकांपूर्वी येथील औद्योगिक वसाहतीत आपले प्रोडक्शन हाऊस चालू केले आहे..!
यात खालील फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलबध करून देत आहेत..!

1) Wockhardt Pharma,Wockhardt Research Center.
2) Lupin Limited.
3) Maylan Laboratories. 
4) Glenmark Pharma.
5) Harman Finochem Limited.
6) Ajanta Pharma.
7) Sun Pharma Limited.
8) ATRA Pharmaceutical Company.
9) Midas Care Pharmaceutical.
अश्या अन् अनेक छोट्या मोठ्या विविध कंपन्या या ठिकाणी कार्यरत आहेत...

औरंगाबादसह मराठवाड्यासाठी भूषण असलेल्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) शेंद्रा टप्प्यात साधारण जानेवारी २०२१ मध्ये आणखी पाच नवीन कंपन्यांची भर पडली आहे.या कंपन्यांना भूखंडांचे वितरण नुकतेच करण्यात आली.या कंपन्यांमधून १६० कोटींची गुंतवणूक झाली असून जवळजवळ २५० जणांना रोजगार मिळणार आहे. 

दरम्यान,Covid-19 परिस्थितीनंतर प्रथमच 'ऑरिक' व्यवस्थापनाकडे मागणी केलेल्या उद्योगांपैकी पाच उद्योगांना प्लॉट हस्तांतरित करण्यात आले.यामध्ये "Sindhiya Pharma",यासह औषधनिर्मितीतील आणखी एक कंपनी,लिक्विड ऑक्सिजनसह ऑक्सिजन प्रॉडक्टस् तयार करणारी "Inox Air Products Private Limited",फूड प्रोसेसिंगमधील एक आणि सॅनिटरी नॅपकिन बनविणाऱ्या एका उद्योगाचा समावेश आहे..!
त्यामुळे फार्मा विश्वातसुद्धा औरंगाबाद शहर आपले स्थान निर्माण करत आहे..!

त्यानंतर २०२२ मध्येसुद्धा काही दिवसांपूर्वी दिल्ली- मुंबई औद्योगिक पट्ट्यातील बिडकीन येथील औद्योगिक वसाहतीमध्ये दोन कंपन्यांनी १५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांना ३११ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. "Cosmofilm" व "Piramal Pharma Private Limited." असे या दोन कंपन्यांची नावे असून या दोन्ही कंपन्या सुरू झाल्यानंतर २ हजार ७०० जणांची प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असा औद्योगिक विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीमध्ये (ऑरिक) शेंद्रा येथील ३३३ भूखंड उद्योगांना देण्यात आले असून येथून उत्पादनही सुरू झाले आहे. मात्र, बिडकीन येथील क्षेत्रात अद्याप गुंतवणूक झाली नव्हती. दोन कंपन्यांनी आता गुंतवणूक केली आहे. कॉस्मोफिल्मसाठी १७३ एकर जमीन देण्यात आली असून ही कंपनी १०२० कोटी रुपयांची तर पिरामल फार्मा या कंपनीस १३८ एकर जागेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कॉस्मोफिल्मचा प्रकल्प २०२४ पर्यंत सुरू होईल तर पिरामलचे उत्पादन २०२३ मध्ये सुरू होईल असे सांगितले जात आहे.

सोबतीने औद्योगिक वसाहतीत निर्माण झालेला कच्चा माल असो किंवा तयार झालेली पार्टस यांना दुसऱ्या राज्यात,देश विदेशात निर्यात करण्यासाठी किंवा तेथील काही गोष्टी कंपन्यांत ज्या महत्त्वाच्या आहेत त्यांना आयात करण्यासाठी दळणवळणाची साधने निर्माण झालेली आहे..!

औरंगाबाद शहराच्या जवळून जाणारा समृध्दी महामार्ग असो किंवा एन एज २११ महामार्ग, एन एज ५२ धुळे - सोलापूर महामार्ग त्यानंतर शहरातून अनेक पर्यायी मार्ग यामुळे हा प्रवास सहज झाला आहे,त्यानंतर आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू असलेली "कार्गो सेवा" आणि त्या माध्यमातून होणारे दळणवळण.

औरंगाबाद शहर आॅरीक सिटीच्या माध्यमातून एकीकडे देश-जगतातील उद्योगविश्वात महत्त्वाचे शहर म्हणून नावारूपास येण्याचा प्रयत्न करत आहे.आॅरीक सिटीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे,औरंगाबाद शहराच्या भूमीवर येणारे विविध मोठाले देश विदेशातील प्रकल्प यामुळे भविष्यात औरंगाबाद शहराचे नाव उद्योग विश्वात देशातीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शहर म्हणून नावारूपास येणारे शहर ठरणार आहे,त्यामुळे नक्कीच पुढील काळ हा औरंगाबाद येथील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे..!

Written by,
Bharat Sonawane .
MBA-(Production & Operations Management.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड