मुख्य सामग्रीवर वगळा

IT क्षेत्र आणि "जॉब कट ले ऑफ"

IT क्षेत्र आणि "जॉब कट ले ऑफ"

गेले काही दिवस "जॉब कट ले ऑफ" या शब्दांना बऱ्याच ठिकाणी वाचनात आले. या शब्दांना लागून असलेले लेख वाचले की, निःशब्द व्हायला होत आहे. 
कारण अलीकडच्या दोन - तीन महिन्यांच्या काळात अनेक नामांकित कंपन्यांनी कुठलेही कारण न देता कर्मचाऱ्यांची केलेली कपात.

कर्मचाऱ्यांची इतक्या मोठ्या संख्येने झालेली कपात व तेही इतक्या मोठ्या नामांकित कंपन्यांमधून. बऱ्यापैकी लिस्टेड, स्टेबल असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून जर अश्या प्रकारे कर्मचाऱ्यांची कपात होत असेल तर छोटछोट्या कंपन्यांच्या धरतीवर असणारी अवस्था किती वाईट असेल यांची कल्पना करवत नाही.

गुगलवर "आय.टी. जॉब कट ले ऑफ" असे सर्च केले की समोर येणारी माहिती किती भयावह व वास्तव किती भीषण आहे हे दिसून येत आहे. पुढे भविष्यात ही अवस्था अजून किती वाईट होऊ शकते याची आपल्याला कल्पना हे सर्व बघितले की येते.

कामगारांच्या कपातीच्या अनेक वेगवेगळी कारणे आहेत लॉकडाऊनच्या दोन वर्षाच्या कालावधीत आय टी क्षेत्रातील कंपन्यांना न मिळालेली कामे, वर्क फ्रॉम होमसारखी फोफावलेली संकल्पना, डॉलरची घसरण
शेअर बाजारातील घसरण, सगळ्या आय.टी. कंपन्यांना या दोन्ही वर्षी झालेला तोटा, जागतिक / अमेरिकेतील मंदी, फक्त उच्च दर्जाची क्षमता असणारेच कर्मचारी कंपनीत राहतील त्यामुळे कंपनीचा दर्जा चांगला राहील ही भावना असे अनेक कारण याबाबतीत विचार केला की समोर येत आहे.

"काही नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून कुठलेही कारणे न देता,देण्यात आलेला ले ऑफ"

साधारण दोन तीन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा गुगल कंपनीने भारतातील ४५० कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता काढून टाकले आहे.
अलीकडे गेल्या वर्षाभरात जगभरातील कंपन्यांमधील कर्मचारी चालू असलेली कपात बघितली तर भविष्यात आय टी क्षेत्रात कामगारवर्गाला येणाऱ्या अडचणी, त्यांच्यात निर्माण होणारी स्पर्धा व कामगारवर्गाचे अंधारात दिसणारे भवितव्य ही सर्व चिंतेची बाब आहे.

महिन्याभरापूर्वी  गुगल (Google) ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट (Alphabet) ने १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे कामगिरी खालावत असल्याचे कारण देत हे कर्मचारी काढण्यात आले.

या जागतिक आर्थिक मंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणारी ॲमेझॉन, फेसबुकनंतर गुगल ही सर्वांत मोठी तंत्रज्ञान कंपनी आहे. गूगलने नवीन कामगिरी व्यवस्थापन प्रणाली योजना लागू केली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ज्यांची कामगिरी कमकुवत आहे अशा हजारो कर्मचाऱ्यांची निवड करण्यात त्याच्या व्यवस्थापकाला मदत होईल. गूगल व्यवस्थापक त्यांना बोनस किंवा स्टॉक अनुदान देण्यापासून रोखण्यासाठी याचा वापर करू शकतात.

या सोबतच मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान कंपनीनेही १०,००० कर्मचारी कपात केली होती. ॲमेझॉननेही १८,००० तर फेसबुकने ११,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

भारतासह जगभरात जानेवारी महिना रोजगाराच्या (Employment) दृष्टीने वाईट ठरला आहे आणि आता फेब्रुवारी महिन्यातही कामगार कपातीचे हे सावट कायम आहे.जगभरातील अनेक देशांवर मंदीचे (Financial Crisis) सावट दिसून येत आहे, ज्याचे गंभीर परिणाम कर्मचाऱ्यांना भोगावे लागत आहेत. 

जानेवारीमध्ये दररोज सरासरी ३,००० लोकांनी टेक कंपन्यांमधील (Tech Companies) आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यामुळं जागतिक आर्थिक संकट आणि मंदीच्या चिंतेमध्ये नोकरकपातीचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात १६६ टेक कंपन्यांनी ६५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याची माहिती मिळत आहे.

मायक्रोसॉफ्टनेही काही दिवसांपूर्वी १०,००० लोकांना नोकरीवरून काढून टाकण्याबाबत भाष्य केले होते. तर Amazon ने देखील १८,००० लोकांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यापैकी १००० कर्मचारी भारतात कार्यरत आहेत. २०२२ मध्ये, एक हजाराहून अधिक कंपन्यांनी १,५४,३३६ लोकांना कामावरून काढून टाकले आहे. शेअरचॅटने एकूण कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के म्हणजेच ५०० लोकांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची योजना आखली आहे.

विप्रोने खराब कामगिरीमुळे ४०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. तर सायबर सिक्युरिटी कंपनी Sophos ने भारतात ४५० लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. तर लिंकडीन (LinkedIn) ने लेऑफची योजना मांडली आहे. 

भारतात, एंड-टू-एंड डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म MediBuddy ने आपल्या ८ टक्के कर्मचारी किंवा सुमारे २०० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. स्विगीने ३८० लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. 

जगातील आर्थिक मंदीचा परिणाम तंत्रज्ञान कंपन्यांवर दिसून येत आहे. अ‍ॅमेझॉन, ट्विटर, फ्लिपकार्ट, फेसबुक, विप्रो, सिस्को यांसारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

अ‍ॅक्टिव्हिस्ट हेज फंडांनी बाजारातील प्रतिकूल व्यावसायिक परिस्थिती आणि खर्चात कपात करण्यासाठी कर्मचारी कमी करण्यासाठी गूगलवर दबाव आणला आहे. या निर्णयामुळे अजूनही अल्फाबेटच्या काही कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केले जाऊ शकते असे कळून येत आहे. वार्षिक मूल्यमापनात कमी कामगिरीचे रेटिंग मिळालेल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे हे ही कळून येत आहे.

मेटाने गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या १३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. मायक्रोसॉफ्ट, सेल्सफोर्स, स्ट्राइप आणि ट्विटरही कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. सिस्कोही सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.

 ही कर्मचाऱ्यांची कपात करण्यामागे कंपन्या कारण असे सांगत आहेत की त्यांची मागील वर्षी कामगिरी चांगली नव्हती. त्यातील काहींना त्यांच्या बायोडाटा मधील कौशल्यांना साजेसा प्रोजेक्ट कंपनीत नसल्याने ते बरेच महिने रिकामे होते.(त्याला बेंच / बफर सिस्टम असे म्हणतात). त्यामुळे त्यांना दुसरा जॉब शोधायला सांगण्यात आला आणि राजीनामा देण्यास सांगितले. 

पगारवाढ नको पण कमीत कमी आम्हाला तरी कामावर कायम राहू द्या असे आता कर्मचाऱ्यांना म्हणण्याची पाळी आलेली आहे. एकूण अशी बिकट परिस्थिती सध्या आय टी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर आली आहे. ही नक्कीच चिंताजनक बाब आहे.  

लेखन व माहिती संकलन:
Bharat Sonawane .
MBA - (Production & Operations Management.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड