मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...
अलीकडील पोस्ट

Holiday's Thought's

Holiday's Thought's..! सुट्टीचा दिवस निवांत असावं. दुपारची उन्हं खिडकीच्या अलीकडे येऊ लागली की काहीसं जीवावर करतच दुपारचं जेवण करायला म्हणून खानावळीच्या दिशेनं निघावं. रस्त्यानं भयंकर ट्रॅफिक, वाहनांचा धूर, माणसांची नकोशी वाटणारी गर्दी अन् घामाने मातकट झालेले चेहरे घेऊन खानावळीत येऊन बसावं.  तुंबलेल्या सिंकमध्ये बघून श्र्वासावर नियंत्रण आणत सिंकसमोर असलेल्या शिंतोडे पडलेल्या आरश्यात बघून चेहरा, हात धुवून घेणं. सत्तरीच्या दशकातील या फळकटा असलेल्या खोलीवजा टपरीच्या खानावळीत एका अंगाला असलेल्या लाकडी टेबलला लागून असलेल्या खुर्चीवर बसून खानावळीतून येणाऱ्या बचकभर जेवणाची वाट बघत बसावं. कॉर्पोरेट ऑफिसेसमधल्या पोरांचं या खानावळीत जेवणं काय. समोर असलेल्या एका उंच ईमारतीच्या कामावर रोजंदारीने काम करणाऱ्या पोरांचं इथे जेवणं काय, सगळं सारखं आहे. समाजातील श्रीमंत, गरीब असं इथे काहीच नाही. तांब्याच्या ताट, वाटीत जेवायचं, चिल्लर चाळीस रुपये द्यायचे. उपरण्याला तोंड पुसत पुन्हा तांब्याच्या गिल्लासात खिश्यात दहा रुपये असेल गिल्लासभर थंड दही पिऊन घ्यायचं. खानावळीत जेवायला वाढून देणार...

Touch to Mind Story..!

रात्रीच्या साडे अकराच्या शिफ्टवरून त्याची सुट्टी झाली अन् औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून तो चेकआउट करून बाहेर पडला. नुकतच शिफ्ट सुटली असल्या कारणाने औद्योगिक वसाहतीतील रस्ते काही दहा पंधरा-मिनिटं आता शुष्क काट्याच्या झाडाप्रमाणे झालेल्या, सुखुन गेलेल्या माणसांच्या, तरुण पोरांच्या गर्दीने आता वाहणार होती. दीड किलो वजनाचा पायात असलेला सेफ्टी शूज घालून तोही त्याचा फ्लॅट जवळ करत होता. आता पावसाची संततधार सुरू झाली होती. अजून फ्लॅटवर काहीतरी खायला म्हणून घ्यायचं होतं. आतापर्यंत उंचपुऱ्या असलेल्या त्याच्या अंगावरील सदरा पाण्याने पूर्ण भिजला होता. रस्त्याच्या आडोश्याला लागून असलेल्या झाडांच्या अडुंगी पावसापासून स्वतःचा बचाव करत तो एकदाचा अकबर चाचाच्या अंडाभुर्जीच्या गाडीवर आला.  एक फुल अंडाभुर्जी अन् दोन बॉईलचे पार्सल घेऊन तो फ्लॅटवर पोहचला फ्लॅट पार्टनर थर्ड शिफ्टसाठी म्हणून कंपनीत निघून गेला होता. दीड किलो वजनाचा सेफ्टी शूज पायातून काढत त्यानं सॉक्स पलंगावर उभ्यानेच फेकले. टॉवेलने डोकं पुसत तो बराचवेळ खिडकीतून बाहेर बघत बसला, पाऊस अजूनही बरसत होता. पन्हाळ्यातून पडणाऱ्या पाण्याच...

काहीबाही लिहिलेलं..!

काहीबाही लिहिलेलं..! कुठेतरी शब्दांना धारदार तलवारीच्या पात्यांचे स्वरूप देऊन संविधानाला लक्षात घेऊन लिहणारा तू नामदेव ढसाळ वाटतो.तर कधी सांजेच्या प्रहरी शब्दांना चांदण्यात मोजणारा,अन् कधीतरी स्मशानात जळत्या प्रेताच्या उजेडात उडत्या विस्तवावर कविता करणार तू ग्रेस वाटतो.कधीतरी रेल्वे स्थानकात तुझ्या कविता रेल्वेच्या आवजाशी हितगुज घालू बघता,अन् तू तिथेच तुझे तारुण्यातले जीवन कवितेला वाहून देतो.तेव्हा खरच तू कवितेला शोभणारा,तिच्यासाठी असणारा बालकवी शोभतोस... हे आणी... इतर सर्वच कवी आहेना हे जगायला शिकवतात.तुम्ही म्हणाल मी पण आता काहीतरी कवितेशी जुळवून व्यक्त होणे,अव्यक्त राहणे याबद्दल लिहत असेल तर तसे काहीही नाही.पण काय असतं जेव्हा कुठेतरी त्या क्षणाची (जो क्षण आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी झुरवत ठेवत असतो) आपल्याला जाणीव होत असते,तो तेव्हाच कृतीत व्यक्त करून मोकळे होऊन जायचे असते... कसे आहेना, लिहत्या हाताला आपण खूप वेळा विचारून बसतो की, तुम्ही हे कसे लिहतात...?  कसं सुचतं..? कोणासाठी..? असे अनेक प्रश्न... या प्रश्नांना खरंतर उत्तरं नाही, फक्त कोणाला विचारांना लिखित स्वरूपात व्यक्त क...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...