मुख्य सामग्रीवर वगळा

व्यथा कंत्राटी कामगारांच्या..!

व्यथा कंत्राटी कामगारांच्या..!

पहाटेचे सहा वाजले की कामगार चौक कामगारांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो.आयुष्यभर औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे कंत्राटी कामगार वयाने चाळीशीच्या आतचेच असतात सगळेच..!

कारण नियमाप्रमाणे वयाच्या ३० वर्षा पर्यंतच कुठल्याही कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामगार काम करू शकतो असा नियम आहे.परंतु कामातील ईमानदारी,सातत्य आणि कंत्राटाशी असलेलं सौख्य त्यामुळं या बिचाऱ्या कामगारांच्या आयुष्यातील दोन-चार वर्ष इकडं तिकडं होतात अन् बिचाऱ्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था होते...!

औद्योगिक क्रांती झाली पण वसाहतीत काम करणाऱ्या या कामगारांचे प्रश्न आजवर सुटले नाही हे दुःख बोचणारे आहे.अन् ; हे तेव्हाच कळते जेव्हा आपण त्यांच्या वंशाला जातो किंवा त्यांच्या संगतीने काम करतो..!

पूर्वी आपल्यात असलेलं कौशल्य,मेहनतीची तयारी हेरून आपल्याला या कामात नियमित केलं जात असायचं,आता बराच सुशिक्षित वर्गही कंत्राटी पद्धतीने काम करतो,पर्याय नाहीये बेकारी वाढली आहे.
गावाकडची बापजाद्याने पोटाला चिमटा घेऊन पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली जमीनही किती दिवस किती लोकांचं पोट भरणार म्हणून तांडेच्या तांडे शहराच्या वस्तीला येऊन बसले..!

इतक्या सात-आठ दशकात काहीएक बदल झालेला नाहीये फक्त गावची तांडा म्हणून ओळखली जाणारी वस्ती शहराच्या वस्तीला आले अन् त्यांचे नाव बदलून कामगार नगर झालं एक हक्काची पाटी चौकात त्यांच्या नावाने लागली..!

काम बदलली पण जसा घाण्याला वेळ बघून बैल जूपावा तसं घड्याळाच्या काट्यावर कंपनीत माणसं जुपली जात आहेत.देवानं पोट दिलंय,भूक दिलीय म्हणून हे सगळं करावं लागतं.नाहीतर हे सगळं सोप्पं नाही..!

अन्; लईच अंगावर कधी आलं तर शहराच्या एकांगी अंगाला असलेल्या रेल्वे पट्टीवर झोपून रहायचं अन् जीवन साजरं करायचं इतकंच काम असतं.कारण कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अश्या लोकांच्या आयुष्यभराच्या एक पट्टीत राहून सुरू असणाऱ्या कथा संपणाऱ्या नाहीये..!

इतकंच कधीतरी उंच-उंच इमारती अन् ही चकचकीत दुनिया बघून जीवाला काही क्षणांचा विसावा मिळतो म्हणून माझ्यासारखी कित्येक जण इथे तग धरून आहे.नाहीतर गावाकडे शेताच्या बांधावर आंब्याच्या नाहीतर बोडक्या झालेल्या बाभळीच्या झाडाला फाशी घेणं असो काय अन् इथे एखाद्या यंत्रात हात घालून आयुष्यभराचं अधूपण घेऊन मिरवणे काय अन् रेल्वे पट्टीवर झोपून जीव देणं काय सारखंच आहे...!

माणसाची जगण्याशी स्पर्धा निर्माण झाली अन् माणूस आयुष्य जगायचं सोडून त्या स्पर्धेच्या खेळातच खेळत राहिला.शंभरात एखादा जिंकला बाकी सगळे हळूहळू मरत,हरत राहिले.बस इतकी सोप्पी आयुष्य जगण्याची गणितं आपण माणसाने करून टाकली आहे..!

तर सकाळ होती कामगार चौक कामगारांनी फुलून गेलेला असतो कुणी रिक्षाने,कुणी कंपनीच्या बसने,कुणी तिघात तिघे सख्खे भाऊ भासावे असं सौख्य निर्माण करून एकाच्या जुन्या दुचाकीवरून गेली कित्येक वर्ष कंपनीत जात आहे..!

त्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही,फक्त कामाने रापलेला चेहरा दिवसेंदिवस रापतच राहिला,एखाद्याची तब्येत सुटून पोट पुढे आलं तर एखादा काम करून करून पार खंगून गेला.एक बदल इतकाच झाला पाच-सहा सेफ्टी बुटांचे जोड घासून घासून बदली झाली उभ्या आयुष्यभरात.
होय पाच-सहाच कारण दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट असतो तो नीट वापरला तर कित्येक दिवस जातो..!

कंपनीत काम करायचं म्हणजे अश्या कंत्राटी कामगारांना तितकाच विरंगुळा म्हणून तंबाखूचं व्यसन असतं.कंपनीत आत न्यायला बंदी असली तरी सेफ्टी बुटाच्या आतमध्ये टाकून घेऊन जातात की ही माणसं.सुपरवायझर तरी काय करल तो उभे आयुष्य हे काम करून कंटाळला असतो...!

दोन-चार सालची गोष्ट आमचा सुपरवायझर रात्रीची नाईट शिफ्ट करत होता सारी पोरं कामाला लावली त्यानं कँटीनपाशी येऊन धाडकन खाली कोसळला घाटीत जास्तोवर या जगण्यातून मुक्त झाला होता बिच्चारा.उंचापुरा आर्मीत जवान नसावा इतका भारी होता तब्येतीने पण गेला..!

पहाटेच्या साडे-सहापर्यंत कंपनीच्या गेटवर येईपर्यंत बऱ्याच गप्पा चालतात या कंत्राटी कामगारांच्या एकमेकांशी,एकदा गेटच्या आत गेलं की मग फक्त काम चालतं अन् माणूस ते करत राहतो.मुतायला जायचं म्हंटल तरी सावड राहत नाही मग बोलणं तर अवघडच आहे..!

औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचं जगणं कसं असतं सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर...
औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या गेटवर कधी बघितली असेल तर एक कँटीन नावाची टपरीवजा दुकान असते बस तिचं चालणं ज्या पद्धतीचं असतं,तिथला चहा घेतल्यावर जे काही वाटतं अन जेव्हा हफ्त्यातून रविवारी ती बंद असली की तिच्या बंद असलेल्या सापळ्याकडं बघायचं बस जे काही वाटतं तसंच या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचं जगणं असतं..!

बाकी सांगेल नंतर कधीतरी..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...