मुख्य सामग्रीवर वगळा

व्यथा कंत्राटी कामगारांच्या..!

व्यथा कंत्राटी कामगारांच्या..!

पहाटेचे सहा वाजले की कामगार चौक कामगारांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो.आयुष्यभर औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणारे कंत्राटी कामगार वयाने चाळीशीच्या आतचेच असतात सगळेच..!

कारण नियमाप्रमाणे वयाच्या ३० वर्षा पर्यंतच कुठल्याही कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामगार काम करू शकतो असा नियम आहे.परंतु कामातील ईमानदारी,सातत्य आणि कंत्राटाशी असलेलं सौख्य त्यामुळं या बिचाऱ्या कामगारांच्या आयुष्यातील दोन-चार वर्ष इकडं तिकडं होतात अन् बिचाऱ्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था होते...!

औद्योगिक क्रांती झाली पण वसाहतीत काम करणाऱ्या या कामगारांचे प्रश्न आजवर सुटले नाही हे दुःख बोचणारे आहे.अन् ; हे तेव्हाच कळते जेव्हा आपण त्यांच्या वंशाला जातो किंवा त्यांच्या संगतीने काम करतो..!

पूर्वी आपल्यात असलेलं कौशल्य,मेहनतीची तयारी हेरून आपल्याला या कामात नियमित केलं जात असायचं,आता बराच सुशिक्षित वर्गही कंत्राटी पद्धतीने काम करतो,पर्याय नाहीये बेकारी वाढली आहे.
गावाकडची बापजाद्याने पोटाला चिमटा घेऊन पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली जमीनही किती दिवस किती लोकांचं पोट भरणार म्हणून तांडेच्या तांडे शहराच्या वस्तीला येऊन बसले..!

इतक्या सात-आठ दशकात काहीएक बदल झालेला नाहीये फक्त गावची तांडा म्हणून ओळखली जाणारी वस्ती शहराच्या वस्तीला आले अन् त्यांचे नाव बदलून कामगार नगर झालं एक हक्काची पाटी चौकात त्यांच्या नावाने लागली..!

काम बदलली पण जसा घाण्याला वेळ बघून बैल जूपावा तसं घड्याळाच्या काट्यावर कंपनीत माणसं जुपली जात आहेत.देवानं पोट दिलंय,भूक दिलीय म्हणून हे सगळं करावं लागतं.नाहीतर हे सगळं सोप्पं नाही..!

अन्; लईच अंगावर कधी आलं तर शहराच्या एकांगी अंगाला असलेल्या रेल्वे पट्टीवर झोपून रहायचं अन् जीवन साजरं करायचं इतकंच काम असतं.कारण कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अश्या लोकांच्या आयुष्यभराच्या एक पट्टीत राहून सुरू असणाऱ्या कथा संपणाऱ्या नाहीये..!

इतकंच कधीतरी उंच-उंच इमारती अन् ही चकचकीत दुनिया बघून जीवाला काही क्षणांचा विसावा मिळतो म्हणून माझ्यासारखी कित्येक जण इथे तग धरून आहे.नाहीतर गावाकडे शेताच्या बांधावर आंब्याच्या नाहीतर बोडक्या झालेल्या बाभळीच्या झाडाला फाशी घेणं असो काय अन् इथे एखाद्या यंत्रात हात घालून आयुष्यभराचं अधूपण घेऊन मिरवणे काय अन् रेल्वे पट्टीवर झोपून जीव देणं काय सारखंच आहे...!

माणसाची जगण्याशी स्पर्धा निर्माण झाली अन् माणूस आयुष्य जगायचं सोडून त्या स्पर्धेच्या खेळातच खेळत राहिला.शंभरात एखादा जिंकला बाकी सगळे हळूहळू मरत,हरत राहिले.बस इतकी सोप्पी आयुष्य जगण्याची गणितं आपण माणसाने करून टाकली आहे..!

तर सकाळ होती कामगार चौक कामगारांनी फुलून गेलेला असतो कुणी रिक्षाने,कुणी कंपनीच्या बसने,कुणी तिघात तिघे सख्खे भाऊ भासावे असं सौख्य निर्माण करून एकाच्या जुन्या दुचाकीवरून गेली कित्येक वर्ष कंपनीत जात आहे..!

त्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही,फक्त कामाने रापलेला चेहरा दिवसेंदिवस रापतच राहिला,एखाद्याची तब्येत सुटून पोट पुढे आलं तर एखादा काम करून करून पार खंगून गेला.एक बदल इतकाच झाला पाच-सहा सेफ्टी बुटांचे जोड घासून घासून बदली झाली उभ्या आयुष्यभरात.
होय पाच-सहाच कारण दीड किलो वजनाचा सेफ्टी बूट असतो तो नीट वापरला तर कित्येक दिवस जातो..!

कंपनीत काम करायचं म्हणजे अश्या कंत्राटी कामगारांना तितकाच विरंगुळा म्हणून तंबाखूचं व्यसन असतं.कंपनीत आत न्यायला बंदी असली तरी सेफ्टी बुटाच्या आतमध्ये टाकून घेऊन जातात की ही माणसं.सुपरवायझर तरी काय करल तो उभे आयुष्य हे काम करून कंटाळला असतो...!

दोन-चार सालची गोष्ट आमचा सुपरवायझर रात्रीची नाईट शिफ्ट करत होता सारी पोरं कामाला लावली त्यानं कँटीनपाशी येऊन धाडकन खाली कोसळला घाटीत जास्तोवर या जगण्यातून मुक्त झाला होता बिच्चारा.उंचापुरा आर्मीत जवान नसावा इतका भारी होता तब्येतीने पण गेला..!

पहाटेच्या साडे-सहापर्यंत कंपनीच्या गेटवर येईपर्यंत बऱ्याच गप्पा चालतात या कंत्राटी कामगारांच्या एकमेकांशी,एकदा गेटच्या आत गेलं की मग फक्त काम चालतं अन् माणूस ते करत राहतो.मुतायला जायचं म्हंटल तरी सावड राहत नाही मग बोलणं तर अवघडच आहे..!

औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचं जगणं कसं असतं सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर...
औद्योगिक वसाहतीत कंपनीच्या गेटवर कधी बघितली असेल तर एक कँटीन नावाची टपरीवजा दुकान असते बस तिचं चालणं ज्या पद्धतीचं असतं,तिथला चहा घेतल्यावर जे काही वाटतं अन जेव्हा हफ्त्यातून रविवारी ती बंद असली की तिच्या बंद असलेल्या सापळ्याकडं बघायचं बस जे काही वाटतं तसंच या कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचं जगणं असतं..!

बाकी सांगेल नंतर कधीतरी..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड