मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

हृदयात वाजे Something..!

हृदयात वाजे Something..! सारे जग वाटे Happening..! कदाचित पुढील पंधरा मिनिटांच्या आत जोरदार पाऊस येईल असं वाटत आहे.मी खिडकीत बसून काचेच्या पलीकडं असलेलं हे मनमोहक दृश्य न्याहाळत बसलो आहे... इमारतीच्या आठव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून मी हे सर्व बघत असतांना दूरवरून येणाऱ्या पावसाच्या सरी क्षणाक्षणाला जवळ येत असल्याचा भास होतो आहे.  काही वेळापूर्वी हिरवाईने नटलेला शहराच्या चहूबाजूंनी असलेला डोंगररांगेचा परिसर आता मात्र जिथवर नजर जाईल तिथवर पावसाने न्हाऊन निघाला आहे.इमारतीच्या खाली असलेली माणसे त्यांची कामे आवरती घेत आपलं बाडबिस्तर झाकूनपाकून ठेवत आहे. सिक्युरिटी गार्ड सोसायटीच्या आवारात अस्तव्यस्त गाड्यांना पार्कींगमध्ये नीट लावायला सांगतो आहे.इतक्या उंचावरून तो हातवारे करत जे काही लोकांना सांगत आहे,त्यावरून तो रोजच या  माणसांना सांगून कंटाळला असल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर जसे दिसत असतील तसे माझे नजरेसमोर येऊन गेले आहेत. हॉलीबाॅल खेळणारी मुलं खेळाच्या मैदानावरून घराच्या दिशेने सायकली घेऊन निघाली आहे.त्यातील एकाच्या सायकलची कदाचित चैन उतरली असावी,त्यामुळं तो सायकल...

पिंगळा..!

पिंगळा..! आपल्या महाराष्ट्राला अनेक कलांचा वारसा लाभला आहे.काळानुरूप पिढीजात अश्या अनेक कलांना संबंधित पिढीतल्या कलाकारांनी जपवले आणि अश्या अनेक लोककला आजवर जिवंत आहे; काही काळाच्या ओघात लुप्त होत चालल्या आहे..! हे महाराष्ट्राला लाभलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे,हे जपल्या जावं त्याबद्दल लिखित स्वरूपात दस्तावेज उपलब्ध असावे म्हणून हा लेख.आज आपण अश्याच एक लुप्त होण्याच्या कगारावर असलेल्या लोककलावंत अन् लोककलेबद्दल जाणून घेऊया...! ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजन आणि प्रबोधनासाठी या कलांचा जन्म झाला असला तरीही आजकाल शहरातही त्यातील काही कलाकार मंडळींचा वावर असतो.प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलाकार करीत असतात. पण नव्या पिढीला या कलांची जाण नाही की त्याविषयी आपुलकीही नाही असे अलीकडे दिसून येते; किंवा असेही न म्हणता त्यांचं या लोककलेच्या सादरीकरणावर अवलंबून राहून त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी नवीन मार्ग स्वीकारले असं म्हणायला हरकत नाही..! पहाटेच्या वेळी दारोदार फिरून देवाच्या नावाने भिक्षा स्वीकारून आपला उ...

Morning Walk With Gautala Wildlife Sanctuary..!

Morning Walk With Gautala Wildlife Sanctuary..!  आज पहाटे पाचला उठलो तेव्हा घराच्या बाहेर येऊन वातावरणाचा अंदाज घेतला तर सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझीम पाऊस पडत होता.पावसात काही फारसा जोर नसल्यानं मी माझी तयारी करून नेहमीच्याप्रमाणे पहाटे फिरायला निघालो..! रिमझीम पाऊस सतत चालू होता,रस्त्याने माझ्या खेरीज एखाद दुसरा माझ्यासारखा हौशी सोडला तर फिरायला आज कुणीही आलेलं दिसत नव्हते.ठरल्या प्रमाणे 4 की.मी रनिंग चालू झाली अन् तसे काही एक दीड की.मीच्या अंतराने पाऊसाचा ओघही वाढला..! मी राहतो किंवा फिरायला ज्या ठिकाणी जातो तो भाग "गौताळा अभयारण्य" परिसरात येत असल्यानं पहाटे फिरायला येणं म्हणजे निसर्गाचा नयनरम्य सोहळा बघायला भेटणंही भेटणं होतं.त्यामुळेच हा हट्टहास असतो की पहाटे इकडे फिरायला येऊन जायचं..! बरोबर सहा वाजता गौताळा अभयारण्य चौकी जवळ येऊन मी थांबलो,रिमझीम पावसात मी पूर्णपणे ओला झालो होतो अन् भिजण्यातही शरीरारतून घाम निथळत होता काहीवेळ पायी चालत चालत स्वतःला रीलेक्स केलं अन् रोजचे काही ठराविक व्यायाम थोडेफार करून अभयारण्यात पडत असलेल्या पावसाचा नजरा अनुभवत बसलो..! गेल...

🃏 BLACK DJACK 🃏

🃏 BLACK DJACK 🃏  Novak Djokovic wins his 21st (!!) Grand Slam, defeating Kyrgios 4-6 6-3 6-4 7-6 to win Wimbledon..! 🎾💙🎾 नदालच्या माघारीमुळे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हाच यंदाच्या विम्बल्डन जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि निकालही तसाच लागला. जोकोविचने सेंटर कोर्टवर शांतपणे खेळ करीत अंतिम लढत ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) अशी जिंकली. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या स्पर्धेत आता जोकोविचने फेडररला मागे टाकले आहे. २२ विजेतेपदांसह नदाल अव्वल आहे, तर जोकोविच २१ विजेतेपदांसह दुसरा. फेडरर २० विजेतेपदांसह तिसरा आहे. राफेल नदालने दुखापतीमुळे ऐन उपांत्य फेरीच्या सामन्यातून त्याने माघार घेतली अन् ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसची लॉटरी लागली.नदालच्या माघारीमुळे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हाच यंदाच्या विम्बल्डन जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि काल झालेल्या मॅचमध्ये निकालही तसाच लागला. नोव्हाकने सातव्यांदा विम्बल्डनजेतेपद पटकावले. त्याने यापूर्वी २०११, २०१४,  २०१५, २०१८, २०१९ व २०२१ मध्ये येथे जेतेपदाचा चषक उंचावला होता. हे त्याचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले आणि त्य...

निसर्ग,आयुष्य अन् गणितं..!

निसर्ग,आयुष्य अन् गणितं..! आयुष्याचं गणित जुळवायचं म्हणजे वेळेची गणितं वेळेतच सुटायला हवी.नाहीतर ; आयुष्यभर आयुष्याचं गणित जुळत नाही मग वेळेची अन् आयुष्याची होणारी वेळोवेळी होणारी फरफट ठरलेली असते..! असंच काहीसं आयुष्यात आलेल्या माणसांच्या बाबतीत आहे.आयुष्यात आलेली काही माणसं वेळीच सोडचिठ्ठी देऊन देऊन सोडता आली पाहिजे अन् ;काही आयुष्यभर आपल्या सोबत हवी म्हणून त्यांना जपता आली पाहिजे.आयुष्यात ही गणितं जमली की मग पुढील आयुष्य सहज,सुखकर होवून जातं..! हल्ली लिहायला फारसं मन धजावत नाही पण आभाळ दाटून यावं तसं सध्याच्या आयुष्यात मळभ दाटून येतं अन् मग त्यापासून मोकळीक म्हणून काही दोन-चार दिवसांनी या दोन-चार ओळी लिहण्याचा मनाचा अट्टहास असतो.जो पूर्णत्वाला नाही गेला की,राहून राहून दिवसभर काहीतरी चुकत असल्याचे भास होत राहतात. अन् सोप्पं असलेलं आयुष्य मग मला गुंतागुंतीचं वाटायला लागतं..! मग ते लिहणं विचारांनी पोजिटीव्ह असो वा निगेटीव्ह ते असं लिहून टाकायला हवं आहे.कोण वाचल,कोण काय म्हणेल,कोणाला कसे वाटेल हा विचार अश्यावेळी माझ्या मनात येत नाही.बरेच दिवस हे पाळत असल्यानं सवयीचं झालेलं आ...

AGNIPATH RECRUITMENT SCHEME

AGNIPATH RECRUITMENT SCHEME साधारण दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय डिफेन्स क्षेत्रात भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी नवीन मार्गाचा अवलंब करण्यात आला जो निर्णय अत्यंत धक्कादायक असा आहे..! वरवर जरी हे सर्व खूप सहज अन् सोप्पं वाटणारं असले,तरीही भविष्याचा विचार केला असता ही योजना कितपत काम करेल हा प्रश्न आहे..! तर चला जाणून घेऊया भारतीय सैन्याच्या तिन्ही प्रकारात भरतीसाठी जो नवीन मार्ग अवलंबिला गेला त्या "अग्निपथ" या नवीन योजनेबद्दल..! काय आहे अग्निपथ योजना..? भारत सरकारने नवीन भरती प्रक्रिया अग्निपथची घोषणा दोन तीन दिवसांपूर्वी केली.या भरती प्रक्रियेतून जे सैनिक तयार होतील त्यांना अग्निवीर म्हंटल्या जाईल..! "अग्निपथ" माध्यमातून पुढील काही वर्षात होणारी सैन्य दलातील भरती. IndianArmy - 40000-45000-50000. Indian Air Force - 3500-4400-5300. Indian Navy - 3000-3000-3000. अग्निवीरची पहिली बॅच पुढील 90 दिवसांत सुरू होईल अन् ही पहिली बॅच 2023 मध्ये येईल. शिपाई,एअरमन,सेलर्स या पदासाठी अग्निपथ माध्यमातून भरती होत राहील.ज्यामधे वयोमर्यादा ही  कमीत कमी 17 वर्ष ते जास्तीत...

MARRY HERSELF..! 💙

MARRY HERSELF..! 💙 SOLOGAMY..! 💙 वयाच्या २४ व्या वर्षी तिने स्वतःशीच लग्न करण्याचा घेतलेला निर्णय.तिच्या बाबतीत जेव्हा या बातम्या न्यूजवर झळकू लागल्या तेव्हा माझ्यासाठी हे सर्व खूप आनंद वाटणारं असं होतं.कारण तिचं स्वतःवर असलेलं प्रेम हे गेले कित्येक दिवस तिच्या इंस्टाग्राम आयडी माध्यमातून बघून होतो..! तिच्या या निर्णयाने अनेकांना अनेक प्रश्न पडले,अनेकांनी तिच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाची खिल्ली उडविली अन् अनेकांनी तिला तिच्या या निर्णयात सोबतही केली जी की खूप कौतुकास्पद बाब आहे..! मान्य आहे आपल्या देशातील संस्कृती,पिढीदर पिढी होत आलेले संस्कार,समाजाने आखून दिलेली रेषा. जिच्या पल्याड जाऊन तिने घेतलेला हा निर्णय,तिचा हा प्रवास पुढे अनेक प्रश्नांना तिला उत्तरे शोधायला लावणारा असणार आहे. परंतु "काहीतरी वेगळं केलं" असं म्हणता येणार नाही. आपल्या सभोवताली बघितलं तर हे आपल्या सगळ्यांना अनोखं,वेगळं असं काहीसं वाटणार आहे. परंतु परदेशात हे असं स्वतःवर मुक्तपणे प्रेम करत आयुष्य जगणं कधीच सुरू झालं आहे..! आपल्या देशात हे सर्व प्रथमतः घडत आहे,त्यामुळे अनेकांना हे पचनी पडणारं नाहीये हे आ...