मुख्य सामग्रीवर वगळा

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!


माणसांच्या गर्दीत मी असतो,माणसांच्या गर्दीत माझ्या शरीराचं प्रतिनिधित्व मी करत असतो,सगळ्याच ठिकाणी मी शरीराने उपस्थित असतो.जोवर मी माझ्यात असतो,तोवर मला सर्वांचा सहवास हवा असतो..!
जेव्हा मी शरीराने माझ्यात असून मनाने मी माझ्या भविष्यासाठी आखून ठेवलेल्या जगात असतो,तेव्हा मात्र मी कुणाचा नसतो.तेव्हा माणसांच्या जगतात असूनही माणसांच्या सहवासात मी नसतो,मलाच मी शोधत असतो मला जिथे मी माझ्या भविष्यात आखून ठेवलेल्या जगाला शोधत असतो.

मला माणसे नकोसे वाटता,माणसांचा सहवास नकोसा वाटतो.आयुष्याला "जगणं" या अवस्थेचा विचार केला की,मग माझी "जगणं" या अवस्थेला घेऊन मनाची द्विधा मनस्थिती होते.जगण्याला मी कारण शोधू लागतो,आयुष्याला घेऊन मग विचार करू लागतो.मग मला काळोख जवळचा वाटतो..!
दिवसभर गाड्यांचा भार वाहून थकलेला पुल मला आठवू लागतो,एरवी रोजच्या जगण्यात त्याचा विचार त्याच्यावरून गेलं की नेहमीच येतो पण काळोखाच्या वेळी मला त्याला न्याहाळत रहायला आवडतं..!

स्ट्रीट लाईटच्या उजेडात आयुष्यात असलेल्या काळोखात खाचखळग्याच्या वाटेनं मला माझाच आधार व्हायला आवडतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाच्या परिघात मला माझं आयुष्य बंधिस्थ करायला आवडतं.कुणाच्या जगण्याला कारण व्हायला आवडतं आवडत्या माणसांच्या परिघात असलो की किती बोलू अन् किती सांगू असं मग मला होतं..!

आयुष्याला घेऊन जगण्यासाठी जेव्हा आपण कारण शोधू लागतो तेव्हा आपण जगातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असतो.सध्या आयुष्यात मलाही संवेदनशील व्यक्ती व्हायचं आहे अन् त्यासाठी मी आयुष्याला एका योग्य मार्गावर जगण्यासाठी कारणे शोधू लागलो आहे.माणसांच्या भेटीत मला माणसांची पारख करण्याची सवय लागली आहे,वाईट व्यक्तीसुद्धा जवळची वाटू लागली आहे अन् चांगलीही जवळची वाटू लागली आहे..!

चांगल्या व्यक्तीकडून तिच्या यशाच्या गोष्टी ऐकून घ्यायला आवडायला लागलं आहे,वाईट माणसांचा सहवास स्वीकारत काय चूक काय बरोबर दोघे मिळून गप्पात त्यांची वजाबाकी बेरीज करू लागलो आहे.

यामुळे मला काय भेटतं..?

हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा उत्तर एकच असते,जगण्यासाठी मिळालेलं एक योग्य कारण अन् भविष्यात माझ्या आखून ठेवलेल्या जगाकडे,माझ्या विश्र्वाकडे जाण्याचा एक योग्य मार्ग मला भेटत असतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...