मुख्य सामग्रीवर वगळा

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!


माणसांच्या गर्दीत मी असतो,माणसांच्या गर्दीत माझ्या शरीराचं प्रतिनिधित्व मी करत असतो,सगळ्याच ठिकाणी मी शरीराने उपस्थित असतो.जोवर मी माझ्यात असतो,तोवर मला सर्वांचा सहवास हवा असतो..!
जेव्हा मी शरीराने माझ्यात असून मनाने मी माझ्या भविष्यासाठी आखून ठेवलेल्या जगात असतो,तेव्हा मात्र मी कुणाचा नसतो.तेव्हा माणसांच्या जगतात असूनही माणसांच्या सहवासात मी नसतो,मलाच मी शोधत असतो मला जिथे मी माझ्या भविष्यात आखून ठेवलेल्या जगाला शोधत असतो.

मला माणसे नकोसे वाटता,माणसांचा सहवास नकोसा वाटतो.आयुष्याला "जगणं" या अवस्थेचा विचार केला की,मग माझी "जगणं" या अवस्थेला घेऊन मनाची द्विधा मनस्थिती होते.जगण्याला मी कारण शोधू लागतो,आयुष्याला घेऊन मग विचार करू लागतो.मग मला काळोख जवळचा वाटतो..!
दिवसभर गाड्यांचा भार वाहून थकलेला पुल मला आठवू लागतो,एरवी रोजच्या जगण्यात त्याचा विचार त्याच्यावरून गेलं की नेहमीच येतो पण काळोखाच्या वेळी मला त्याला न्याहाळत रहायला आवडतं..!

स्ट्रीट लाईटच्या उजेडात आयुष्यात असलेल्या काळोखात खाचखळग्याच्या वाटेनं मला माझाच आधार व्हायला आवडतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाच्या परिघात मला माझं आयुष्य बंधिस्थ करायला आवडतं.कुणाच्या जगण्याला कारण व्हायला आवडतं आवडत्या माणसांच्या परिघात असलो की किती बोलू अन् किती सांगू असं मग मला होतं..!

आयुष्याला घेऊन जगण्यासाठी जेव्हा आपण कारण शोधू लागतो तेव्हा आपण जगातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असतो.सध्या आयुष्यात मलाही संवेदनशील व्यक्ती व्हायचं आहे अन् त्यासाठी मी आयुष्याला एका योग्य मार्गावर जगण्यासाठी कारणे शोधू लागलो आहे.माणसांच्या भेटीत मला माणसांची पारख करण्याची सवय लागली आहे,वाईट व्यक्तीसुद्धा जवळची वाटू लागली आहे अन् चांगलीही जवळची वाटू लागली आहे..!

चांगल्या व्यक्तीकडून तिच्या यशाच्या गोष्टी ऐकून घ्यायला आवडायला लागलं आहे,वाईट माणसांचा सहवास स्वीकारत काय चूक काय बरोबर दोघे मिळून गप्पात त्यांची वजाबाकी बेरीज करू लागलो आहे.

यामुळे मला काय भेटतं..?

हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा उत्तर एकच असते,जगण्यासाठी मिळालेलं एक योग्य कारण अन् भविष्यात माझ्या आखून ठेवलेल्या जगाकडे,माझ्या विश्र्वाकडे जाण्याचा एक योग्य मार्ग मला भेटत असतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड