मुख्य सामग्रीवर वगळा

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!

माणसांच्या गर्दीत हरवलेला मी..!


माणसांच्या गर्दीत मी असतो,माणसांच्या गर्दीत माझ्या शरीराचं प्रतिनिधित्व मी करत असतो,सगळ्याच ठिकाणी मी शरीराने उपस्थित असतो.जोवर मी माझ्यात असतो,तोवर मला सर्वांचा सहवास हवा असतो..!
जेव्हा मी शरीराने माझ्यात असून मनाने मी माझ्या भविष्यासाठी आखून ठेवलेल्या जगात असतो,तेव्हा मात्र मी कुणाचा नसतो.तेव्हा माणसांच्या जगतात असूनही माणसांच्या सहवासात मी नसतो,मलाच मी शोधत असतो मला जिथे मी माझ्या भविष्यात आखून ठेवलेल्या जगाला शोधत असतो.

मला माणसे नकोसे वाटता,माणसांचा सहवास नकोसा वाटतो.आयुष्याला "जगणं" या अवस्थेचा विचार केला की,मग माझी "जगणं" या अवस्थेला घेऊन मनाची द्विधा मनस्थिती होते.जगण्याला मी कारण शोधू लागतो,आयुष्याला घेऊन मग विचार करू लागतो.मग मला काळोख जवळचा वाटतो..!
दिवसभर गाड्यांचा भार वाहून थकलेला पुल मला आठवू लागतो,एरवी रोजच्या जगण्यात त्याचा विचार त्याच्यावरून गेलं की नेहमीच येतो पण काळोखाच्या वेळी मला त्याला न्याहाळत रहायला आवडतं..!

स्ट्रीट लाईटच्या उजेडात आयुष्यात असलेल्या काळोखात खाचखळग्याच्या वाटेनं मला माझाच आधार व्हायला आवडतं.स्ट्रीट लाईटच्या उजेडाच्या परिघात मला माझं आयुष्य बंधिस्थ करायला आवडतं.कुणाच्या जगण्याला कारण व्हायला आवडतं आवडत्या माणसांच्या परिघात असलो की किती बोलू अन् किती सांगू असं मग मला होतं..!

आयुष्याला घेऊन जगण्यासाठी जेव्हा आपण कारण शोधू लागतो तेव्हा आपण जगातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असतो.सध्या आयुष्यात मलाही संवेदनशील व्यक्ती व्हायचं आहे अन् त्यासाठी मी आयुष्याला एका योग्य मार्गावर जगण्यासाठी कारणे शोधू लागलो आहे.माणसांच्या भेटीत मला माणसांची पारख करण्याची सवय लागली आहे,वाईट व्यक्तीसुद्धा जवळची वाटू लागली आहे अन् चांगलीही जवळची वाटू लागली आहे..!

चांगल्या व्यक्तीकडून तिच्या यशाच्या गोष्टी ऐकून घ्यायला आवडायला लागलं आहे,वाईट माणसांचा सहवास स्वीकारत काय चूक काय बरोबर दोघे मिळून गप्पात त्यांची वजाबाकी बेरीज करू लागलो आहे.

यामुळे मला काय भेटतं..?

हा प्रश्न जेव्हा मला पडतो तेव्हा उत्तर एकच असते,जगण्यासाठी मिळालेलं एक योग्य कारण अन् भविष्यात माझ्या आखून ठेवलेल्या जगाकडे,माझ्या विश्र्वाकडे जाण्याचा एक योग्य मार्ग मला भेटत असतो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...