मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्यात आलेलं स्थित्यंतर..!

आयुष्यात आलेलं स्थित्यंतर..!

साधारण काल-परवाची गोष्ट असावी,पहाटेचे कोवळे सूर्यकिरणे विंडोग्रीलच्या तावदाणातून सोपासेटवर मी झोपल्या ठिकाणी माझ्या डोळ्यांवर पडत होती,मी त्यांना अनुभवत निपचित लोळत पडलो होतो..!

घरात कुणीही नसल्यानं घरात शांत वातावरण होतं,असेही घरी आई अन् माझ्याशिवाय कुणी नसते,त्यामुळे आमचे घर शांत असते नेहमीच.तर मी लोळत पडलो होतो,बाहेर चिमण्यांचा प्राजक्ताच्या झाडावर चिवचिव करण्याचा आवाज मात्र तितका कानी पडत होता..!

मोबाईल बाजूला असलेल्या तिपाईवर ठेवलेला होता,डोळा लागल्यासारखे झाले,तितक्यात मोबाईल सायलेंट,व्हायब्रेट मोडवर असल्यानं तो वाजू लागला पुढे तो कितीवेळ वाजत होता अन् नंतर कट होवून पुन्हा कॉल आला अन् पुन्हा तो व्हायब्रेट होत राहिला.
एरवी आलेला फोन मी खूप सहज असा लवकर घेत नाही..!

काय कारण असावं माहीत नाही पण अलीकडे मला फोनवर कुणाशीही फारसं बोलायला आवडत नाही,जुजबी बोलणं असतं माझं.समोरचा आपल्यासोबत कितीही उत्साहाने बोलत असला तरी मी माझ्या ठराविक वाक्यांनी,कमी शब्दांनी आलेल्या प्रश्नांना उत्तरे देत बोलत असतो.समोरच्या व्यक्तीला क्वचित प्रसंगी मी प्रश्न करतो तो प्रश्न करायच्या अगोदर मी मलाच तीन-चार प्रश्न करून घेत असतो.
का..?
माहीत नाही पण मला हे सर्व शिस्तप्रिय असं काहीतरी असल्याचं भास करून देणारं वाटतं..!

माझ्या जवळच्या सर्वच मित्र-मैत्रिणींना माझा हा स्वभाव माहीत आहे,त्यामुळे ते सर्वच मला व्हॉटसअपवरती मॅसेज करतात,मग तिथे मी टाईप करून बोलतो अन् ते मलाही फोनवर बोलण्यापेक्षा हेच सोईचे वाटते हल्ली अलीकडे.
कारण तिथं बोलतांना अनामिक भासावं असं कुठलेही दडपण मला येत नाही की,नाही पडत कुठलीच प्रश्न अन् पडलीच तर सहज विचारून घेतो मी अश्यावेळी..!

तर मोबाईल दुसऱ्यांदा व्हायब्रेट होत होता अन् शेवटी काही महत्त्वाचा असेल म्हणून मी तो बघितला अन उचलला एका दूरच्या मैत्रिणीचा तो कॉल होता..!
तिने कॉल घेतल्या घेतल्या मला प्रश्न केला,
का रे काही कामात आहेस का..?
मी कामात नसतांनाही तिला सांगितले फार काही नाही लिहत 
बसलो होतो अन् सॉरी सायलेंट मोडवर होता मोबाईल..!

पुढे पाच मिनिटे जुजबी बोलणे झाले तिच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे हो,नाही,ठीक आहे,विचार करतो असे दिले अन् तिनं शेवटी माझ्या बोलण्यातून तिनं हेरले,की तिला माझ्या अश्या बोलण्याचा कंटाळा आला म्हणून तिनं ठेवते म्हणून बाय न करता फोन ठेवला..!

मी ही मोबाईल होता त्या जागी ठेवला अन् डायनिंग टेबलवर ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीला हातात घेऊन पाणी पित विचार करत बसलो.
की,काय कारण असावं की मला कॉलवर बोलायला नकोसे वाटते..?
एक अनामिक भिती वाटते.काही महत्वाचा कॉल नसेल तर का मी पहिल्याच रिंगमध्ये कॉल रिसिव्ह करत नाही,व्हायब्रेट होत असलेल्या मोबईलला बघून का मला धडकी भरल्यासारखे वाटते..? एरवी मी लिहायला घेतलं की किती लिहत असतो,मित्र मैत्रिणींना भेटलो की किती सर्व बोलत असतो,मग कॉलवर बोलण्यासाठी का मी इतका अस्वस्थ होत असावा..?
कळायला मार्ग नव्हता,मी या गोष्टीला घेऊन विचार करत बसलो होतो..!

तितक्यात मोबाईल पुन्हा एकदा व्हायब्रेट झाला व्हॉटसअपवर कोणाचा तरी मॅसेज पडला होता,बघतो तर काय मगाशी कॉल आलेल्या मैत्रिणीचा तो मॅसेज होता..!

तुझं कॉलवरचं आजचं बोलणं मला तू मनानं कुठेतरी हरवल्याचा भास करून देणारं होतं,मान्य आहे आपलं रोज बोलणं होत नाही पण तू तुझ्या एका वेगळ्या विश्वात रममाण असल्याचे तुझ्या बोलण्यातून प्रत्येकवेळी हो,नाही,ठीक आहे,विचार करतो या शब्दांच्या आडून मला माझं मन सांगत असल्याचं भासत होत होते..!
तू असा नाहीयेस अन् इतका शांतही नाहीयेस,काही प्रॉब्लेम्स असेल तर शेअर कर मी आहे तुझ्या सोबत..!

तिच्या या मॅसेजला मी रिप्लाय म्हणून मी टाईप करायला घेतलं अन् पुन्हा तिचा मॅसेज इथे फ्रेंडली अन् फ्रीली बोलणार असशील तरच मॅसेज रिप्लाय कर नाहीतर काही बोलू नकोस तू.
झालं मग पुढे बराचवेळ व्हॉटसअपवरती तिला बोलत बसलो,शेवटी तिनं शेवटच्या मॅसेजला टाईप करून मला सेंड करून दिले अन् मी पुन्हा विचारत पडलो..!

मॅसेज होता..!
इतकं सर्व काही अलबेल असताना तूला कॉलवर बोलतांना तुझ्यासाठी मी इतक्या टोकावरचा विचार केला अन् शेवटी मला एकवेळ ते खरेही वाटले.राग येणार नसेल तर एक विचारू बेस्ट फ्रेंड आहे म्हणून विचारतेय की,एकावेळी दोन आयुष्य जगतो आहेस की,एक जे आयुष्य जगतो आहे त्याचसाठी कन्फ्युज होवून रोज रोज स्वतःच्या आत थोडा थोडा तू स्वतः तुटत जातो आहेस..!

मी तिच्या या मॅसेजला रिप्लाय देत असताना माझी बॅकस्पेसच्या बटनाशी तडजोड व्हायला लागली अन् इतक्या वेळेत ती ऑफलाईन गेली होती.आता तिचा ऑनलाईन वेळेचा शेवटचा सिन मला दिसत होता अन् मला माझ्या मनात आलेला शेवटचा विचार टाईप करत असताना मॅसेज अर्धवट सोडून मी मोबाईल पुन्हा जिथं होता तिथं ठेवला अन् पुन्हा विंडोग्रीलच्या तावदाणापल्ल्याड असलेल्या निसर्गाला न्याहाळू लागलो..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...