मुख्य सामग्रीवर वगळा

मृत्यू अन् त्याच्या संगतीच्या कथा..!

मृत्यू अन् त्याच्या संगतीचा कथा..!


अंतिमसंस्कारचे सर्व विधी उरकून घराकडे वळलो पंधरा दिवस या काळात सरून गेले होते,आयुष्यात आयुष्याला घेऊन आता भूतकाळ अन् वर्तमानकाळ यांच्यासोबत प्रत्येक वाक्याला जोडून बघत होतो.येणारा काळ खूप कसोटीचा अन् आयुष्यातून एकतर मी उठून जाईल,नाहीतर मी त्या अवस्थेत तगून राहील अन् मरणाला कारण न होता जगत राहील असं काही मनात चालू होतं.
आयुष्याला घेऊन इतका विचार त्या दिवसापूर्वी किंवा त्या एका घटकेत केला तितका कदाचित आजवरही केला नसेल..!

घरी आलो घर ओळखीचे पण दिशा अनोळखी वाटू लागल्या होत्या,डाळिंबाच्या झाडाची पानगळ सुरू असल्यानं साऱ्याच अंगणात वाळलेल्या पानांचा सडा पडलेला होता.धूनी-भांडी करत असलेल्या ठिकाणची माती पोपडे धरू बघत होती,जसं तिलाही आता इथला सहवास नकोसा झाला होता.
कोणाचं जाणं आयुष्यात इतकं रितेपण घेऊन येईल हे स्विकारण्याची ती पहिलीच वेळ होती अन् ते मनाला न झेपणारे होते..!

सर्वच कसं शांत-शांत भासत होते,दुपारचं रणरणते ऊन हवेहवेसे वाटू लागले होते,आयुष्यात इतकी शांतता यावी की पक्षांनीसुद्धा आपल्या जवळपास फिरकू नये.कधीतरी विटांना मातीत रचलेल्या वॉलकंपाऊंडची माती दोन्ही विटेच्या फटीतून रिते होवून खाली वाळलेल्या पानांवर पडायची तेव्हा येणाऱ्या आवाजाला ऐकून असं वाटायचं की भविष्याला घेऊन बघितलेली सर्वच स्वप्ने इतक्याच सहज रिते होवून,आयुष्याच्या वाटांवर अंधार होईल,अंधार झाला आहे..!

माणसं जगायला हवी आहे अन् माणसं मरायलाही हवी आहे पण जन्म मरणाचा हा सोहळा जेव्हा खूप जवळून अनुभवायला येतोना तेव्हा मरण फार अवघड नाही.आपल्या माणसांना आपण सोडून जाणे ही भावना ज्यांना आपण गेलो त्यांच्यासाठी खूप वाईट्ट असते.जेव्हा केव्हा आपल्या खूप जवळचं कुणी आपल्या आयुष्यातून अनामिक वेळी उठून जातेना तेव्हा लागून असणारी हुरहूर अन् आपलं ते स्वीकारत आयुष्याकडे बघणे होतेना तेव्हा आपण आयुष्याला घेऊन खूप समंजस झालेलो असतो..!

तेव्हा गरिबांचे दुःख आपल्या डोळ्यांना सहज दिसायला लागते.फुटपाथवर रात्रीच्या प्रहरी झोपणारे दिसले की आपण त्या व्यक्तींमध्ये आपल्याला सोडून गेलेल्या माणसांचा चेहरा शोधू लागतो.मग नकळत मनात हा ही विचार येऊन जातो की त्या वाटसरूच्या अंगावर एखादी शाल टाकून पुढं जावं,हा विचार येणं म्हणजे आपल्या माणसांच्या जीवाला शांतता भासणे होय..!

या पंधरा दिवसांच्या काळात अन् नंतर महिनाभर मला फक्त निळसर असलेल्या आकाशात बघायला आवडायचं,जेव्हा जेव्हा निळसर आकाशात पांढरे शुभ्र ढग दाटून यायचे तेव्हा त्यांच्या पुंजक्यात आपल्या सोडून गेलेल्या माणसांचे अस्तित्व मला नजरीस पडायचं.तासंतास न कंटाळता ते निरभ्र आकाश डोळ्यातून आसवे गाळत बघत राहणं अन् आपल्या जवळच्या व्यक्तीला त्यात बघत राहणं हे जवळचं वाटायचं.रात्रीचा काळोख अन् आपल्या माणसाची अनुपस्थिती रात्री 
हुंदके देत आतल्या आत तुटायला लावायची...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड