मुख्य सामग्रीवर वगळा

वाऱ्याच्या संगती आठवणी..!

वाऱ्याच्या संगती आठवणी..!

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई,भाऊसाठी परी मन खंतावतं..!

लहानपणीच्या काही गोड आठवणी या कवितेशी आहे अन् लहानपणी म्हणजे वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी इतक्या उंचीवरच्या,अर्थपूर्ण कविता जेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात तेव्हा नक्कीच आपलं भविष्य सुखकर असणार हे त्यावेळी वडिलांनी दिलेल्या संस्कारातून मला सांगता येतं..!

तर लहानपणीच्या या कवितेशी जुळवून आलेल्या आठवणी अन् याच इतक्या वर्षांनीसुद्धा वडिलांच्या आवाजात ऐकलेली ही कविता जशीच्या तशी आजही माझ्या कानी पडते अन् तितक्या सुंदर इतर कुणाच्या आवाजात ती मी आजवर ऐकली नाही..!

सांज सरून गेलेली असायची घराच्या चहूबाजूने काळोख दाटलेला असायचा,या काळोखात अंगणात वडिलांनी लावलेल्या त्यांच्या आवडत्या रातराणीच्या फुलांचा सुगंध सर्वदूर अंगणात,घरात दरवळत असायचा..!

अश्यावेळी वडील दिवसभर काम करून थकून यायचे,ते फ्रेश झाले की दिवसभर आम्ही वडिलांची वाट बगणारे तिघे भाऊ-बहीण कंदिलाच्या मिणमिणत्या उजेडात वडिलांच्या मांडीवर विसावा घ्यायचो.कुणी मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं असायचं तर कुणी वडिलांच्या मांडीवर बसून राहायचं,तर कुणी वडीलांचा तो दिवसभर काम करून रापलेला हात आपल्या कापसासारख्या मऊसूत हातात घेऊन वडिलांच्या जवळ बसून राहायचं..!

आईचा किचनवजा असलेल्या छोट्याश्या खोलीत एका चिमणीच्या उजेडात परातीत भाकरी बडवण्याचा आवाज कानी यायचा अन् या आवाजात दिवसभर आई तिघा भावंडात कुणाला रागावली असेल तर या सांजेच्या वेळी मग वडिलांच्या मांडीवर बसवून त्या लाडक्या मुलाचे वडील लाड करायचे..!
मग लाड करवून घेतले की वडिलांकडे किंवा वडिलांची इच्छा असेल तर वडील त्यांच्या सुंदर आवाजात अश्या कविता,मराठी सुंदर अर्थपूर्ण मनाला भावतील असे गीत,अभंग,गवळणी वडील आम्हाला म्हणवून दाखवायचे..!

मला आठवते वडील जेव्हा जेव्हा "घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात" ही कविता म्हणायचे तेव्हा शेवटी आपसूकच माझ्या डोळ्यांत अश्रू दाटून यायचे..! ते का..? या प्रश्नाला त्या नकळत्या वयात माझ्याकडं उत्तर नव्हते पण पुढे जेव्हा मोठा झाल्यावर कळले की मनापासून मला काही कविता,गीत मला हवे तसे मनासारख्या आवाजात मी ऐकले की मी खूप भावूक होतो अन् ही सवय मला आजतागायत आहे,त्यावेळी मला वडील नेहमी म्हणायचे तू स्वभावाने खूप हळवा आहेस अन् भविष्यातही तसाच असशील अन् तो आजही आहे..!

बालपणी वडिलांच्या आवाजात इतके कविता,गीत,अभंग,गवळणी ऐकल्यात की त्या आजही तोंडपाठ झालेल्या आहेत.त्या कुठं ऐकल्या वडिलांचा आपल्याला  इतक्या कमी वर्ष लाभलेल्या सहवासात वडिलांनी आपल्याला त्या कवितांची ओळख करून दिली,ज्यांचा अर्थ इतका गहन आहे.कदाचित त्यामुळेच माझी ओढ साहित्याकडे असावी असे कधी कधी मला वाटते..!

घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई,भाऊसाठी परी मन खंतावतं..!

विसरली का ग भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला ग मन आचवलं
फिरुन-फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो..!

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे..!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला

-कृ.ब.निकुंभ

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड