मुख्य सामग्रीवर वगळा

"रान बाजार"

रान बाजार..!

"रान बाजार"

असंच काहीसं घडलं होतं... कदाचित..?

मराठी वेबसृष्टीवर खळबळ उडवून देणारी बहुचर्चित मराठी वेब सीरिज "रानबाजार" अखेर आज बघितली.राजकारण अन् राजकारणाच्या पलिकडच्या अनेक न कळू शकणाऱ्या गोष्टी अन् यात शिकार ठरत जाणारा सामान्य माणूस.
अश्या एका संवेदनशील विषयाला प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या वेब सीरिज माध्यमातून करण्यात आला आहे..!

वेब सीरिज मधील काही अश्लील संवाद किंवा काही ठिकाणी खूप ओव्हर झाल्यासारखे वाटते.परंतु शेवटपर्यंत ही वेब सीरिज बघत गेलं की आपल्याला सुरुवातीलाच पडत गेलेल्या एक एक प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत मिळत जाते..!

वर संगितल्याप्रमाणे काही सीन बोल्ड काही संवाद अश्लील वाटतील त्यामुळे ट्रेलर बघूनच वेब सिरीज बघायची की नाही हे आपलं आपण ठरवावे..!

रेगे’ आणि ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक "अभिजित पानसे" या वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी कलाकृती घेऊन आपल्या समोर येतात अन् त्यांनी त्यांच्या कलाकारीतून असो किंवा दिग्दर्शनातून या वेब सिरीजला अक्षरशः न्याय दिला आहे..!

मराठीतील या भव्य वेब सीरिजची निर्मिती "प्लॅनेट मराठी","अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल" कंपनीने केली आहे.मराठीतील आघाडीची अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेली "प्राजक्ता माळी" यांनी या वेबसीरिजमध्ये केलेलं कामसुद्धा मराठी वेब विश्र्वात प्रथमतःच इतकी टोकाची भूमिका केल्याचं पाहायला मिळते.

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" आणि "प्राजक्ता माळी" यांच्यासह "मोहन आगाशे" आणि "सचिन खेडेकर" देखील प्रमुख भूमिकेत आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेले सीन्स पाहायला मिळतात..!

एका मंत्री पदाच्या दावेदार असलेल्या उमेदवाराच्या छुप्या खुनापासून वेब सिरिज सुरू होते.मग त्या खून करण्यामध्ये असलेले असंख्य अदृश्य हात,पोलीस दल तपास करत असताना पुराव्याजवळ पोहचताच त्या व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा आपण एका खूप मोठ्या रॅकेट मध्ये फसलो असल्याची जाणीव होणं अन् त्यातून स्वतःच स्वतःला संपवून टाकणं..!

पोलिसांचे असंख्य पुराव्यांना,शक्यतांना हाताळून पुरावे शोधणं,पत्रकारांचे या सगळ्याकडे बारकाईने लक्ष असणं.अखेर सर्वच त्या खुनाच्या तपासापर्यंत पोहचणं.परंतु शेवटी सगळ्यांना राजकारण आड येणं अन् अनेक बेकसूरू लोकांचा त्यात जीव जाणं..!

एकूणच खूप गुंतागुंतीची वाटणारी ही वेब सिरीज जसजशी शेवटाकडे येते,तसेतसे एक-एक पदर उलगडू लागते अन् शेवट पुढे अजून काय होईल हा प्रश्न आपल्या मनाला करून संपते..!

"सस्पेन्स थ्रिलर" म्हणावी अशी ही वेब सिरीज पुढच्या भागात काय होईल याची वाट बघायला लावते,यासाठी नक्कीच तिचा पुढचा भाग लवकर यावा..!

प्राजक्ता माळी,सचिन खेडेकर,मकरंद अनासपुरे,अनंत जोग,वैभव मांगले,माधुरी पवार, उर्मिला कानिटकर,मोहन जोशी,डॉ.मोहन आगाशे,तेजस्विनी पंडित या सगळ्यांची भूमिका कमाल आहे..!

माझे सगळ्यात जास्त आवडणारे पात्र कोणते असेल तर "अभिजित पानसे" दादा यांनी साकारलेला "मोकाशी" हे,सोबतच "मकरंद अनासपुरे" यांचा पत्रकार "आप्पा दिवेकर" सुद्धा आपल्याला त्यांच्या भूमिकेशी खिळवून ठेवतो."प्राजक्ता माळी" यांनी साकारलेली वेश्या वस्तीतील "रत्नाची" भुमिकासुद्धा लक्षवेधी ठरणारी आहे..!

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...