मुख्य सामग्रीवर वगळा

"रान बाजार"

रान बाजार..!

"रान बाजार"

असंच काहीसं घडलं होतं... कदाचित..?

मराठी वेबसृष्टीवर खळबळ उडवून देणारी बहुचर्चित मराठी वेब सीरिज "रानबाजार" अखेर आज बघितली.राजकारण अन् राजकारणाच्या पलिकडच्या अनेक न कळू शकणाऱ्या गोष्टी अन् यात शिकार ठरत जाणारा सामान्य माणूस.
अश्या एका संवेदनशील विषयाला प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न या वेब सीरिज माध्यमातून करण्यात आला आहे..!

वेब सीरिज मधील काही अश्लील संवाद किंवा काही ठिकाणी खूप ओव्हर झाल्यासारखे वाटते.परंतु शेवटपर्यंत ही वेब सीरिज बघत गेलं की आपल्याला सुरुवातीलाच पडत गेलेल्या एक एक प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत मिळत जाते..!

वर संगितल्याप्रमाणे काही सीन बोल्ड काही संवाद अश्लील वाटतील त्यामुळे ट्रेलर बघूनच वेब सिरीज बघायची की नाही हे आपलं आपण ठरवावे..!

रेगे’ आणि ठाकरे’ सारखे संवेदनशील विषय प्रभावीपणे हाताळणारे दिग्दर्शक "अभिजित पानसे" या वेबसीरिजच्या रुपाने आपली नवी कलाकृती घेऊन आपल्या समोर येतात अन् त्यांनी त्यांच्या कलाकारीतून असो किंवा दिग्दर्शनातून या वेब सिरीजला अक्षरशः न्याय दिला आहे..!

मराठीतील या भव्य वेब सीरिजची निर्मिती "प्लॅनेट मराठी","अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल" कंपनीने केली आहे.मराठीतील आघाडीची अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेली "प्राजक्ता माळी" यांनी या वेबसीरिजमध्ये केलेलं कामसुद्धा मराठी वेब विश्र्वात प्रथमतःच इतकी टोकाची भूमिका केल्याचं पाहायला मिळते.

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेब सिरीजमध्ये अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" आणि "प्राजक्ता माळी" यांच्यासह "मोहन आगाशे" आणि "सचिन खेडेकर" देखील प्रमुख भूमिकेत आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेले सीन्स पाहायला मिळतात..!

एका मंत्री पदाच्या दावेदार असलेल्या उमेदवाराच्या छुप्या खुनापासून वेब सिरिज सुरू होते.मग त्या खून करण्यामध्ये असलेले असंख्य अदृश्य हात,पोलीस दल तपास करत असताना पुराव्याजवळ पोहचताच त्या व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा आपण एका खूप मोठ्या रॅकेट मध्ये फसलो असल्याची जाणीव होणं अन् त्यातून स्वतःच स्वतःला संपवून टाकणं..!

पोलिसांचे असंख्य पुराव्यांना,शक्यतांना हाताळून पुरावे शोधणं,पत्रकारांचे या सगळ्याकडे बारकाईने लक्ष असणं.अखेर सर्वच त्या खुनाच्या तपासापर्यंत पोहचणं.परंतु शेवटी सगळ्यांना राजकारण आड येणं अन् अनेक बेकसूरू लोकांचा त्यात जीव जाणं..!

एकूणच खूप गुंतागुंतीची वाटणारी ही वेब सिरीज जसजशी शेवटाकडे येते,तसेतसे एक-एक पदर उलगडू लागते अन् शेवट पुढे अजून काय होईल हा प्रश्न आपल्या मनाला करून संपते..!

"सस्पेन्स थ्रिलर" म्हणावी अशी ही वेब सिरीज पुढच्या भागात काय होईल याची वाट बघायला लावते,यासाठी नक्कीच तिचा पुढचा भाग लवकर यावा..!

प्राजक्ता माळी,सचिन खेडेकर,मकरंद अनासपुरे,अनंत जोग,वैभव मांगले,माधुरी पवार, उर्मिला कानिटकर,मोहन जोशी,डॉ.मोहन आगाशे,तेजस्विनी पंडित या सगळ्यांची भूमिका कमाल आहे..!

माझे सगळ्यात जास्त आवडणारे पात्र कोणते असेल तर "अभिजित पानसे" दादा यांनी साकारलेला "मोकाशी" हे,सोबतच "मकरंद अनासपुरे" यांचा पत्रकार "आप्पा दिवेकर" सुद्धा आपल्याला त्यांच्या भूमिकेशी खिळवून ठेवतो."प्राजक्ता माळी" यांनी साकारलेली वेश्या वस्तीतील "रत्नाची" भुमिकासुद्धा लक्षवेधी ठरणारी आहे..!

Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड