मुख्य सामग्रीवर वगळा

अंत एका भाषेचा,अंत एका संस्कृतीचा..!

अंत एका भाषेचा,अंत एका संस्कृतीचा..!

अंत एका भाषेचा,एका संस्कृतीचा..!

काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता..? काय करत होता..?कसं आयुष्य जगत होता..? त्याचं राहणीमान कसं होतं..? हे आपल्याला काही माहीत नाही..!
अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते..!

मूळात त्याला मानव जातीचा राग,तिटकारा होता किंवा कदाचित भितीसुद्धा वाटत असेल.कारण त्याच्या जमातीतील,त्याच्या रक्ताच्या नात्यातील माणसांना व्यवहारी व्यवस्थेचं भूत मानगुटीवर बाळगलेल्या आपल्यातल्याच काही व्यवहारी माणसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा अंत केला अन् शेवटी हा एकटाच उरला..!

२६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात,अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला.परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं.तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला..!

त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे..!
२३ तारखेला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले.ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता.अखेर २३ ऑगस्ट रोजी पाला पाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्या झोपडीच्या बाजूला असलेल्या एक झोक्यात त्याचा मृतदेह आढळला..!

नैसर्गिक पद्धतीने त्याला मृत्यू आलेला होता सांगितलं जाते.सोबतच त्यावेळी त्याच्या शरीराच्या चहू बाजूंनी पक्ष्यांचे रंगीबिरंगी पंख लावलेली होती अन् त्याचा अंतिम विधीसुद्धा त्याचा शेवट ज्या झोपडीत झाला त्या ठिकाणी करण्यात येणार आहे असं ब्राझील सरकारनं सांगितलं मृत्यू समयी त्याचे वय अंदाजे ६० वर्षांच्या जवळपास असल्याचे सांगितल्या जाते..!

तेथील अधिकारी म्हणतात १९९० साली त्याला बघितल्या गेले होते,यापुढे ब्राझील पोलिसांनी हेही सांगितले की त्याच्या मृत शरीरावर निरक्षण,अभ्यास करून काही निष्कर्ष काढले जातील अन् त्याचे रिपोर्ट तयार केले जातील..! 

"ऑब्जर्वेटरी फॉर द ह्यूमन राइट्स ऑफ आइसोलेटेड एंड रीसेंट कॉन्टैक्ट इंडिजिनस पीपल्स" (ओपीआई) ने त्या व्यक्तीच्या मृत्यूवर सांगितले की ती व्यक्ती कुठल्या जातीची होती किंवा घराच्या आत केलेल्या खड्ड्यांचा उपयोग ते कश्यासाठी करत हे न कळताच त्यांचा मृत्यू झाला आहे..!

द गार्जियन यांच्या मतानुसार,असं रहस्यमय जीवन जगणारी ही व्यक्ती ब्राझीलमधील एका जगाच्या समोर न आलेल्या संस्कृती समूहाची शेवटची सदस्य होती...

ती व्यक्ती गेली तिच्या बरोबर आज पुन्हा एका पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचा अंत झाला,त्या व्यक्तीच्या जाण्याबरोबर अनेक गोष्टींचे खुलासे होणं राहून गेलं,एक संस्कृती,रीतिरिवाज,भाषा यांचाही त्याच्या बरोबर अंत झाला काही वर्षांपूर्वी असच काहीसं घडलं होतं ते इथे देतोय..! 

एक भाषा संपणे ही जगाच्या पाठीवर झालेली एक खूप मोठी हानी आहे,जी कधीही न भरून निघणारी असेल.जगाच्या या नकाशावर अनेक जवळ-जवळ तेवीसशे भाषा आज घडीला बोलल्या जातात,म्हणजे तेवीसशे प्रकारच्या विविध भाषा,संस्कृती यांचे जतन विश्वात केले जातात....

म्हणजेच एका शब्दाला पर्यायी तेवीसशे शब्द आपल्याला भेटतात,आज यातील अनेक भाषा कायमच्या संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.काही भाषा तर शेवटचा श्वास घेत आहेत,हो श्वासच कारण अजूनही या भाषांची या तंत्रज्ञानाच्या युगात कोठेही लिखित स्वरूपात जपवणूक केली गेली नाहीये.
कदाचित त्याची दखलही घेतली गेली नाहीये..!

एक भाषा संपते म्हणजे तिचा इतिहास पूर्णपणे संपला जातो,इतिहास संपणे म्हणजे आपल्या पुढील पिढीला आपण काही महत्त्वाच्या गोष्टी,रीतिरिवाज,संस्कार,जे फक्त त्या भाषेतच उपलब्ध होते,ते देण्यापासून कायमचेच वंचित होतो..!

पुन्हा एकदा जर तेवीसशे भाषांचा विचार केला,अभ्यास केला तर हे खूप मोठे शब्द भांडार आहे,त्याचा विचार करणे हे तंत्रज्ञानाच्या या युगाच्याही खूप पुढे आहे.विविध देशात तर ती भाषा संपुष्टात येणार आहे म्हणुन ती फायद्याची नाही,म्हणून तिच्यावरचा होणारा अभ्यास ही थांबवला आहे..!

हे किती वाईट अन् भयावह आहे,कारण एक भाषा संपणार म्हणजे त्या भाषेत केलेले संस्कृतीचे निसर्गाचे,मानवीजीवन,जतन,लिप्या,वेशभूषा,पाककला
हे संपून जाईल.जेव्हा एक भाषा इतक्या सहज संपुष्टात येते,तिच्यासोबत आपण खूप काही विसरून जातो कींवा ते आपल्याला विसरण्या भाग पडते..!

हजारो वर्षांच्या जगण्याचा सांस्कृतिक,भौगोलिक,मानवी उत्क्रांतीचा यावर त्या भाषेत झालेलं लिखाण नाहीये,यांमुळे हे सर्व त्यांच रोजच्या जीवनात जगण्याची विशिष्ट पद्धत,दस्तावेज यामुळे जिवंत असेल.परंतु जेव्हा या भाषेतील त्या शेवटच्या व्यक्तीचा मृत्यु होतो त्या वेळी भाषेसंबंधीचे शब्दांमध्ये दडलेले वेगवेगळे संकेतक मरत असेल कायमसाठी त्या व्यक्ती सोबतच..!

पुढे जाऊन फक्त आपल्याच देशाचा विचार कधी केलाततर,आपला देश ओळखल्या जातो तो विविध भाषा,संस्कृती,वेशभूषा,वेद,पोथी,पुराण,विविध धर्मग्रंथ,जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती,राहणीमान,पाककला,सण,वार,शिक्षण यांमुळेच..!

आपल्या देशातही अनेक भाषा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे,परंतु या भाषांवरही अजूनही कुठला अभ्यास,लिखित स्वरुपात केलेला अनुवाद,लेखन भेटत नाही ही शोकांतिका आहे..!

भारत या देशाला सर्वदूर ओळख दिली जाते याचे एक महत्त्वाचे कारण भारतात असलेली भाषा संस्कृती..!

मानाने सर्वदूर सर्वाधिक जुन्या भाषा म्हणून आपण ज्या भाषांना मिरवतो त्या संस्कृत,उर्दू या भाषा कदाचित पुढील काही शतकात नामशेष होईल,याची भीती वेळोवेळी वाटत आहे.
कारण अलीकडेच्या काळात या भाषांबद्दल न झालेला अभ्यास.नव्या पिढीला अजूनही बऱ्यापैकी या भाषा शाळेत उपलब्ध नाही,अजूनही त्या कोणाला येत नाही.या भाषा संपल्या तर किती मोठा इतिहास,माहिती,संस्कृती,साहित्य हे कायमसाठी संपुष्टात येईल.या भाषांवर बऱ्यापैकी (अल्प प्रमाणात) लेखन झाले आहे. परंतु त्याचे जतन,संवर्धन करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडत आहोत असेही वाटून जाते..!

आज तांडे,वाडे,पाड्यात जेव्हा कधीतरी जावून भेट देतो तेव्हा तेथील आदिवासी जमातींचा जगण्यासाठीचा संघर्ष खूप जवळून दिसून येतो.मुळात हा लढा फक्त जगण्यासाठीच आहे का..? की याही पुढे जावून आपली संस्कृती,पिढ्यांपासून असलेली आपली बोलीभाषा,वेशभूषा,पाककला ही आपल्या पुढील पिढीला देण्यासाठी,ती भाषा ती संस्कृती टिकवण्यासाठी चालू असलेला हा संघर्ष आहे याचे उत्तर भेटत असते किंवा तो मिळवण्या हेतु असतो..!

कधीतरी डोंगर दऱ्यात,वाडीत हा प्रवास झाला की जगण्यासाठीचा,संस्कृती टिकवण्यासाठीचा हा लढा खूप जवळून अनुभवायला येतो.भाषा,संस्कृती जपवली जावी यासाठी चालू असलेले प्रयत्न अन् या विषयावर चालू असलेला अभ्यास मिळवण्या हेतु जेव्हा वाचन होते,तेव्हा लक्षात येतं हे सर्व खूप मागे पडून राहीलेले आहे..!

कुठलीही भाषा असो ती जेव्हा संपुष्टाच्या कगारावर आहे तेव्हा तिचे जतन,संवर्धन अन् तिच्यावर विस्तृत अभ्यास,लेखन व्हावं.जेणेकरून उद्या जेव्हा ही भाषा कायमची संपुष्टात येणार असल तर तिचा पूर्णपणे आपला अभ्यास झालेला असेल,जो लिखित स्वरूपात आपल्याकडे असेल.ज्यामुळे ती संस्कृती,भाषा जपवण्याचा कुठेतरी प्रयत्न होत राहील... 

काल परवा वाचनात आले की २०१६ मध्ये अंदमान निकोबार बेटांवर ६५०० वर्षांपासून बोलली जाणारी "बो" नावाची बोलीभाषा होती २०१६ मध्ये "सिनियर बोवा" नावाची  "बो" बोलीभाषा बोलणारी ती म्हातारी मेली तिच्या बरोबर "बो" नावाची ती बोलीभाषा सुद्धा संपुष्टात आली,नष्ट झाली.

काही दिवसांपूर्वी असाच "ईयाक" नावाच्या भाषेचा अंत झाला ती संपुष्टात आली,झाले काय एक संस्कृती जी हजारो वर्षे हयात होती तिचा अंत झाला.ती कशी होती याचा कुठलाही अभ्यास किंवा लेखन नाही हे खूप दुःखद आहे.
अश्या आपल्या तीन पिढीच्या काळात तब्बल २०० भाषा सोबत संस्कृती नष्ट झाल्या मृत्यु पावल्या...

मरणाऱ्या आदिवासी बोलीभाषा जगाव्यात म्हणून संयुक्त राष्ट्र संघटना यु नो ने २०१९ हे जागतिक आदिवासी बोलीभाषा वर्ष जाहीर केले.महाराष्ट्रात ९४ बोलीभाषा बोलल्या जातात,त्यापैकी ३६ आदिवासी बोली आहे ज्यांना जपवणे खूप महत्त्वाचे जरुरीचे आहे.कारण त्या संपुष्टाच्या कगारावर आहेत..!

कातकरी,कोलमी,कोकणी,देहबोली,धाणका,हलबी,माडीया,डांग,कोरकु,कोटली,गावित या आणि अश्या अनेक भाषा यांचे संवर्धन व्हावे,लेखन व्हावे या भाषांना जोडून साहित्य निर्मिती व्हावी जेणेकरून या भाषांवर सखोलपणे अभ्यास होईल..!

हे फक्त या भाषांसाठी नाहीतर भारतात,नव्हे तर जगातील अश्या अनेक भाषांसाठी आहे.
तेव्हा एक भाषा संपणे हे खूप वाईट गोष्ट आहे,हे नुकसान कधीही न भरून निघण्यास सारखे आहे.एका भाषेचा असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये इतकंच.कारण यामुळे एका भाषेला,संस्कृतीला आपली पुढची पिढी कायमची मुकलेली असेल जे नको वाटते..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...