मुख्य सामग्रीवर वगळा

"तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत"

"तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत" 


आठ दिवसांपूर्वी प्रख्यात कवी लेखक समीक्षक आणि प्रकाशक "अविनाश साळापुरीकर" सर यांची भेट झाली अन् सरांनी मला त्यांचा "तुझं आहे खंडी भर भरून उदंड प्रचंड उदंड आहे अखंड स्वागत" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट दिला..!

खरंतर या काव्यसंग्रहावर अनेक दिग्गज साहित्यिकांनी लिहलेले आहे,अश्यावेळी माझ्यासारख्या नवख्या लेखकाने काय लिहावं. पण ; लिहायला हवं आहेच.
त्यामुळे जे काही लिहतो आहे ते खूप काळजीपूर्वक अन् माझ्या साहित्य,लेखन,कविता,आयुष्याला घेऊन आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन या सर्व गोष्टींवर हे सर्व अवलंबून आहे..!

कारण सरांच्या कविता फक्त वाचून समजण्या इतपत सोप्या नाही,त्यासाठी तुम्ही तितकं पाईक असावं लागतं.तुम्ही आयुष्याकडे किती सिरियस होवून बघता,आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे.जर हे तुम्हाला जमत असेल तरच सरांच्या या कविता तुमच्या परिघात बसतील आणि त्यावेळी त्या तुम्हाला आपसूकच जवळच्या वाटतील..!

कारण या कविता काही दिवसांच्या,किंवा काहीतरी अनागोंदी कारभार भासावा अश्या नाहीतर सरांच्या आयुष्यातील असंख्य क्षणांचा उलगडा करणाऱ्या,आयुष्यात आलेल्या असंख्य अनुभवांच्या आधारे लिहल्या गेल्या आहे.सर आयुष्याकडे कसे बघता हे सांगणाऱ्या या कविता आहे.त्यामुळे या कवितांना एक अर्थ प्राप्त होतो जो खूप खोल,आर्त अन् तितकाच गहन असा आहे..!

"काव्यसंग्रह" हा आगळावेगळा अन् उजवा यासाठी सुद्धा ठरतो की त्याचे मुखपृष्ठ असो की मलपृष्ठ हे स्वतः सरांनी त्यांच्या कल्पनेतून साकारले आहे,जे की खूप युनिक वाटावं असं आहे.असे मुखपृष्ठ माझ्या बघण्यात आजवर तर नाहीच.

सोबतच कुण्या प्रसिद्ध साहित्यिकाची,कवीची प्रस्तावना किंवा पाठराखण या काव्यसंग्रहाला नाही किंवा ब्लर्ब नाही.इतकंच नाहीतर हे पुस्तकही सरांनी त्यांच्या स्वतःच्या प्रकाशनामार्फत प्रकाशित केलं आहे,संग्रहाच्या आत केलेलं काही चित्रण हे खूप खोलात घेऊन जाणारं असं आहे जे की आपणास वाचनाशी खिळवून ठेवते..!
या सर्व गोष्टी लक्ष वेधून घेणाऱ्या अन् काव्यसंग्रहाला उजवं ठरवणाऱ्या अश्या आहे..!

काल सायंकाळी हा काव्यसंग्रह वाचायला घेतला अन् १६६ पानांचा ११ दीर्घ कवितांचा हा काव्यसंग्रह मी दोन बैठकीत वाचून संपवला.माझ्या बाबतीत मला नेहमीच असं वाटत आलं आहे की,कथा लेखन,ललित लेखन करण्यापेक्षा काव्य लेखन करणं नेहमीच अवघड आहे..!

याचा प्रत्यय सरांनी केलेली प्रत्येक रचना वाचताना आपल्याला येत असतो.कारण कविता ही कुण्या फक्त एका कवीची किंवा लेखकाची नसून ती अवघ्या समाजाचं,त्या काळाचं ती प्रतिनिधित्व करत असते,ज्यामुळे की कविता लेखन करणे म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे असं मला वाटतं..!

कारण,पुढे हाच काही ओळींचा संदर्भ घेऊन आपल्या पुढील पिढ्या संस्काररूपानं तगत्या असतात आणि ही आपली पूर्वापार साधारण आठशे-नऊशे वर्षांपूर्वीची परंपरा आहेच.त्यामुळं एक अर्थपूर्ण रचना निर्माण होणं हे कवीची जबाबदारी वाढवणारं आहे..!

सरांच्या या संग्रहातील प्रत्येक रचना ही खूप गहन,अर्थपूर्ण आणि मनाचा तळ गाठायला लावणारी अशी आहे.दीर्घ स्वरूपाच्या या रचना आयुष्यातील रोजच्या गणिताशी,जगण्याशी एकरूप होवून लेखणीत कैद झालेल्या आहे.

यातील बहुतांश रचना या आपल्या मनाशी रुंजी घालू बघणाऱ्या अश्या आहे,या रचना आपण जेव्हा वाचत असतो त्यावेळी आपण आपल्या परिघात 'स्व' च्या शोधार्थ भटकत असतो,आयुष्याला घेऊन खूप खोलवर विचार करत असतो.
काव्यसंग्रहाच्या नावाप्रमाणेच या रचना खूप दीर्घ अन अर्थपूर्ण आयुष्याची गणितं त्यांची वजाबाकी,बेरीज करायला लावणाऱ्या आहे..!

यातील काही रचना या फार जिव्हारी लागणाऱ्या अश्या आहेत.कारण,आपण ते आपल्या वर्तमानात जगत असतो आणि तेच सर्व हुबेहूब सरांनी आपल्या रचनेत कैद केलेलं असतं.अश्यावेळी आपण या रचनांच्या अधिकच समीप जावून हे सर्व अजून-अजून खोलात जाऊन समजून घेतो..!

तर काही रचना या सरांच्या आयुष्यात त्यांना आलेले अनुभव कथन करणाऱ्या अश्या वाटतात,ज्यातील लेखन हे खूप आतून आलेलं आहे असा भास करून देतं.अन् ; मग पुढे आपल्या मनाचा तळ आपण ढवळत राहतो.
आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांना त्या रचनांशी जोडू बघत राहतो..!

काही ठिकाणी सरांनी केलेलं मनाशी स्वगत,मनाचीच घातलेली समजूत तटस्थ राहून घेतलेली भूमिका आणि आयुष्यात यामुळे घडून आलेले बदल सर त्यांच्या रचनेतून सांगू बघत आहेत.आपल्याला ते कळून येतं अन् मग त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्याकडे 
Move on करत असतो..!

वेळोवेळी केलेलं आत्मचिंतन,आयुष्यभराची गणितं सोडवायची आहे अन् तेही आयुष्याने आखून दिलेल्या "यशस्वी व्यक्ती" साठीच्या पात्रतेच्या मीटर पट्टीत राहून हे सर्व कसं करायचं आहे हे सांगणाऱ्या या सगळ्याच रचना खूप वेगळ्या अन् अर्थपूर्ण वाटतात..!

हा सर्व प्रवास सरांच्या या दीर्घ कवितांच्या,या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून सरांनी आपल्या समोर ठेवला आहे.जो प्रवास आपण अनुभवला की नक्कीच आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेला असतो अन् आपण माणूस म्हणून अजूनच समृध्द झालेलो असतो..!

मला भावलेल्या काही ओळी इथे देतो अन् माझ्या अभिप्रायास पूर्णविराम देतो..!

तो अबोल आहे
विचारी मानी वगैरे आहे
हे तर तुम्हालाही माहीतच आहे
तुमच्याप्रमाणे मी देखील
काळाच्या ओघात
या गोष्टी सोडून दे
धरून चालणार नाही 
असंच बजावत होतो त्याला
त्याला काही गोष्टी 
आवडायच्या नाहीत त्या मीही
कटाक्षाने पाळत गेलो
शेवटी मलाही 
व्यवहार आहे संसार आहे
बाजारात चार मित्र माझेही आहेत

तो माझ्यावर नाराज होता
की स्वतःवर नाराज आहे
माहित नाही
नात्यातनं फक्त औपचारिकताच
बाहेर येते
अन् औपचारिकतेनं
माणसांची धार बोथट होते
अन् बोथट धारेचेच मैत्रीच्या
 गोट्या खेळत राहतात
 असंच जाताना
 माझ्या दिशेने
 फेकल्यासारखं 
 काहीबाही बोलून गेला तो.!

सरांच्या मराठी साहित्यातील पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा..!

- भारत सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड