मुख्य सामग्रीवर वगळा

प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..!

Book Review..!
प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..!



आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील प्रसिद्ध कवयित्री. "माधवी देवळाणकर" यांचा "प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट मिळाला.
खरंतर मॅडमना हा काव्यसंग्रह मला भेटून देण्याची इच्छा होती अन् मलाही तो त्यांच्या हातानेच हवा होता..!

परंतु,मॅडम अनेकदा औरंगाबाद येऊनही काही कारणास्तव माझी त्यांच्याशी भेट होवू शकली नाही अन् मग अनायसे मॅडमला हा त्यांचा काव्यसंग्रह मला पोस्टाने पाठवावा लागला अन् अखेरीस तो मला मिळाला..!

खूप सुंदर,मनातील अलवार भाव भावनांना शब्दांची जोड देऊन त्या शब्दांची गुंफण करून काव्य संग्रहातील प्रत्येक ती प्रिय एक ओळ,एक एक रचना करत हा काव्यसंग्रह आकाररूपास अाला आहे..!
प्रत्येकाला वाचावासा वाटेल असा हा त्यांचा काव्यसंग्रह..!

आठ-दहा दिवसांपूर्वी काव्यसंग्रह मिळाला पण माझ्या इतर कामाच्या व्यस्थतेमुळे तो वाचायची इच्छा असूनही वाचल्या जात नव्हता.परंतु अखेरीस काल सायंकाळी वाचायला घेतला अन् एका बैठकीत वाचून संपवला.
९६ पानांचा का काव्यसंग्रह त्यातील कवितांप्रमानेच नाजूक अन् छोटासा आहे,बोलकेसे मुखपृष्ठ संग्रहाची शोभा वाढवते.औरंगाबाद येथील "गोदा प्रकाशन" यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.प्रसिद्ध साहित्यिक "डॉ.कैलास अंभुरे सर" यांची खूप अभ्यासपूर्ण प्रस्तावना या काव्यसंग्रहाला मिळाली आहे ..!

काव्य संग्रहातील काही रचना खूप गहन अन् अर्थपूर्ण अश्या विचार करायला लावणाऱ्या आहे.काही रचना या हळुवार आपल्या मनास रुंजी घालू बघणाऱ्या अश्या आहेत.की प्रेम ही भावना किती सुंदर आहे अन् ती किती समर्पकपणे कवियित्रीने आपल्या प्रत्येक रचनेत कैद केली आहे..!

सारे सारे संपले जरी
तरी तुझेच नाव
अंतिम श्वासापर्यंत ओठी
एक चुकार क्षणी
जर भेटलोच कधी
तर एक स्मित येऊ दे
ह्या आपल्या वेड्या ओळखीसाठी
म्हणून प्रिय...
ही एक ओळ तुझ्यासाठी...

काव्यसंग्रहाचे एक विशेष मला खूप जवळचे वाटले अन् यातूनच कवियित्री आपण साकारत असलेल्या प्रत्येक रचनेवर,ज्यांच्यासाठी हा काव्यसंग्रह अर्पण करते आहे त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम करते हे दिसून येते.
संग्रहातील प्रत्येक रचनेचा शेवट हा काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेल्या "एक ओळ तुझ्यासाठी" या ओळीने होते अन् ही फक्त एक ओळ नसून संपूर्ण एक काव्यसंग्रह आहे..!

काव्यसंग्रहाचे विशेष कौतुक यासाठीही मला वाटते की कवयित्री "माधवी देवळाणकर" यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह.
"कैलास अंभुरे सर" प्रस्तावनेत ज्याप्रमाणे म्हणतात की व्यवहारी जगात पहिलं असणं...पहिलं येणं जसं महत्त्वाचं तसंच जगातील पहिलं प्रेम... पहिल्या प्रीतीची अनुभूती... पहिला विरह... पहिली मैत्री... इत्यादी स्वजीवनातील पहीलेपणाच्या स्मृतींचा दरवळ मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजून बसलेला असतो.

त्या अलवार,आल्हादायक स्मृतीचेतना 'स्व' ला प्रसन्न करतात. तर कधी दुखय्रा खपल्या अस्वस्थ करत.स्वस्थअस्वस्थता,ऊन-सावल्या,सुख-दुःखात्म स्मृती भावतरंग हा कवीयित्री माधवींच्या "प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी" चा गाभा आहे..!

कवियित्री त्यांचे मनोगत व्यक्त करतांना शेवटच्या तीन ओळींत लिहतात की,
"प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी"  काव्यसंग्रह आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद आहे.तिचे हितगुज चोखंदळ वाचकांना कितीपत रुचते हा निर्णय मी रसिकांवर सोडून थांबते..!
आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद काव्यसंग्रहाच्या शेवटच्या रचनेपर्यंत आपल्याला रूचलेली असते अन् हा काव्यसंग्रह पसंतीस उतरलेला असतो.खूप सुंदर,खूप आवडलेला काव्यसंग्रह..!

खूप प्रेमासह खूप शुभेच्छा,असेच लेखन तुमच्या माध्यमातून मराठी साहित्यात होत राहो..!

लेखक-भारत सोनवणे.
संपर्क-९३०७९१८३९३.
औरंगाबाद.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड