मुख्य सामग्रीवर वगळा

प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..!

Book Review..!
प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी..!



आठ-दहा दिवसांपूर्वी मराठवाड्यातील प्रसिद्ध कवयित्री. "माधवी देवळाणकर" यांचा "प्रिय..! एक ओळ तुझ्यासाठी" हा काव्यसंग्रह अभिप्रायार्थ भेट मिळाला.
खरंतर मॅडमना हा काव्यसंग्रह मला भेटून देण्याची इच्छा होती अन् मलाही तो त्यांच्या हातानेच हवा होता..!

परंतु,मॅडम अनेकदा औरंगाबाद येऊनही काही कारणास्तव माझी त्यांच्याशी भेट होवू शकली नाही अन् मग अनायसे मॅडमला हा त्यांचा काव्यसंग्रह मला पोस्टाने पाठवावा लागला अन् अखेरीस तो मला मिळाला..!

खूप सुंदर,मनातील अलवार भाव भावनांना शब्दांची जोड देऊन त्या शब्दांची गुंफण करून काव्य संग्रहातील प्रत्येक ती प्रिय एक ओळ,एक एक रचना करत हा काव्यसंग्रह आकाररूपास अाला आहे..!
प्रत्येकाला वाचावासा वाटेल असा हा त्यांचा काव्यसंग्रह..!

आठ-दहा दिवसांपूर्वी काव्यसंग्रह मिळाला पण माझ्या इतर कामाच्या व्यस्थतेमुळे तो वाचायची इच्छा असूनही वाचल्या जात नव्हता.परंतु अखेरीस काल सायंकाळी वाचायला घेतला अन् एका बैठकीत वाचून संपवला.
९६ पानांचा का काव्यसंग्रह त्यातील कवितांप्रमानेच नाजूक अन् छोटासा आहे,बोलकेसे मुखपृष्ठ संग्रहाची शोभा वाढवते.औरंगाबाद येथील "गोदा प्रकाशन" यांनी हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.प्रसिद्ध साहित्यिक "डॉ.कैलास अंभुरे सर" यांची खूप अभ्यासपूर्ण प्रस्तावना या काव्यसंग्रहाला मिळाली आहे ..!

काव्य संग्रहातील काही रचना खूप गहन अन् अर्थपूर्ण अश्या विचार करायला लावणाऱ्या आहे.काही रचना या हळुवार आपल्या मनास रुंजी घालू बघणाऱ्या अश्या आहेत.की प्रेम ही भावना किती सुंदर आहे अन् ती किती समर्पकपणे कवियित्रीने आपल्या प्रत्येक रचनेत कैद केली आहे..!

सारे सारे संपले जरी
तरी तुझेच नाव
अंतिम श्वासापर्यंत ओठी
एक चुकार क्षणी
जर भेटलोच कधी
तर एक स्मित येऊ दे
ह्या आपल्या वेड्या ओळखीसाठी
म्हणून प्रिय...
ही एक ओळ तुझ्यासाठी...

काव्यसंग्रहाचे एक विशेष मला खूप जवळचे वाटले अन् यातूनच कवियित्री आपण साकारत असलेल्या प्रत्येक रचनेवर,ज्यांच्यासाठी हा काव्यसंग्रह अर्पण करते आहे त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम करते हे दिसून येते.
संग्रहातील प्रत्येक रचनेचा शेवट हा काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेल्या "एक ओळ तुझ्यासाठी" या ओळीने होते अन् ही फक्त एक ओळ नसून संपूर्ण एक काव्यसंग्रह आहे..!

काव्यसंग्रहाचे विशेष कौतुक यासाठीही मला वाटते की कवयित्री "माधवी देवळाणकर" यांचा हा पहिलावहिला काव्यसंग्रह.
"कैलास अंभुरे सर" प्रस्तावनेत ज्याप्रमाणे म्हणतात की व्यवहारी जगात पहिलं असणं...पहिलं येणं जसं महत्त्वाचं तसंच जगातील पहिलं प्रेम... पहिल्या प्रीतीची अनुभूती... पहिला विरह... पहिली मैत्री... इत्यादी स्वजीवनातील पहीलेपणाच्या स्मृतींचा दरवळ मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुजून बसलेला असतो.

त्या अलवार,आल्हादायक स्मृतीचेतना 'स्व' ला प्रसन्न करतात. तर कधी दुखय्रा खपल्या अस्वस्थ करत.स्वस्थअस्वस्थता,ऊन-सावल्या,सुख-दुःखात्म स्मृती भावतरंग हा कवीयित्री माधवींच्या "प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी" चा गाभा आहे..!

कवियित्री त्यांचे मनोगत व्यक्त करतांना शेवटच्या तीन ओळींत लिहतात की,
"प्रिय... एक ओळ तुझ्यासाठी"  काव्यसंग्रह आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद आहे.तिचे हितगुज चोखंदळ वाचकांना कितीपत रुचते हा निर्णय मी रसिकांवर सोडून थांबते..!
आर्त भावनांची लेखणीला घातलेली व्याकुळ साद काव्यसंग्रहाच्या शेवटच्या रचनेपर्यंत आपल्याला रूचलेली असते अन् हा काव्यसंग्रह पसंतीस उतरलेला असतो.खूप सुंदर,खूप आवडलेला काव्यसंग्रह..!

खूप प्रेमासह खूप शुभेच्छा,असेच लेखन तुमच्या माध्यमातून मराठी साहित्यात होत राहो..!

लेखक-भारत सोनवणे.
संपर्क-९३०७९१८३९३.
औरंगाबाद.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...