मुख्य सामग्रीवर वगळा

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..!भाग-तीन

वाभळेवाडीचा तलाठी अण्णा..!
भाग-तीन 

रामा कुंडूर एक बाजूला गिलास, डेचकी ठेवून उख्खड बसून बिड्या फुकीत त्याचा धूर वरती काळीकुट्ट पळती ढगाड बघत त्या दिशेनं सोडीत, बसून गप्पा झोडीत होता. जगण्या लक्षी आईच्या पिंपळ पारावर उख्खड बसून त्यांच्या गप्पाच्या तालावर तंबाखू मळीत होता. तंबाखू मळून झाली तसं तो संतू आण्णा तलाठीकडे बघत म्हंटला,

ओ सरकारी जावई घेताय का व्ह आयतावयता मळून दिलेला तंबाखुचा विडा..! 

अन् ; संतू आण्णानं झोपल्या जागीच हात लांबवत तो विडा एक चुटकीत पकडला अन् ओठाखाली टाईट दाबून धरत बसल्या जागीच एका हाताच्या डोपरावर एका अंगाला होत सडकीवर जोरात पीक हानली..!

मग गावच्या गप्पा सुरू झाल्या, तिशीच्या संतू अाण्णा मावळजे ते संतू आण्णा तलाठी इथ पर्यंतचा प्रवास संतू आण्णा रामा अन् जगण्याला सांगू लागले. गावची बारबापी लोकं कोण, कोण सरकारी कामात दखलंदाजी करतो. गावचा सरपंच कसा आहे, तो कसा त्याच्या कारभारणी पुढं बैल होवून वागतो हे सगळं जगण्या अ्न रामा एकमेकांना बघत सांगू लागले..!

गावची शाळा, शाळामास्तर, जुना तलाठी, आठ दिवसाला येणारा ग्रामसेवक. ग्राम पंचायतीची इमारत पावसाळ्यात गळतीला लागल्यामुळे झोल्या आईच्या पडघरात तात्पुरती उभी केलेली ग्रामपंचायत हाफीस. गावाच्या एकांगाला असलेलं तलाठी हाफीस..!

जुन्या तलाठीशी गावच्या लोकांनी घातलेली हुज्जत अन् गावच्या काही बांड तरुणांनी रात्री जावून तलाठी हाफीसचा अर्धा तोडून टाकलेला दरवाजा या साऱ्या हकीकती दोघं संतू आण्णाला सांगू लागले होते..!

संतू आण्णा तलाठी, रामा कुंडूर अन् जगण्या मध्यरात्र सरास्तोवर लक्षी आईच्या पिंपळ पारावर गप्पा झोडीत बसले होते. जशी मध्यरात्र कलली तसं जगण्या संतू अण्णा तलाठीचा निरोप घेऊन घराच्या दिशेनं वाटचाल करीत निघाला.

जगण्या तर्जनी अन् अंगठ्यात धरलेल्या बिडीला फुंकीत उंचावर तोंड करून तिचा धूर सोडू लागला. तो धूर दूरवरून बघितला की वाटायचं लक्षी आईच्या पिंपळ पारावर कोणी शेकोटी पेटवली आहे..!

आता संतू अण्णा तलाठी आजची रात्र कशीतरी काढायची अन् उद्या पहाटच्याला पहीले रहायला एखादी गावच्या वस्तीला असलेली खोली बघायची हा विचार करत अंगावर घेऊन एकाअंगाला कलून झोपी गेला.

रामा कुंडूर आपला बिडीवर बिडी शिलगावीत ती ओढत होता अन् अधून मधून खोकल्याची उबळ आली की मोठ्यानं खोकलत होता. तिशी पस्तीशितला रामा कुंडूर या बिडीच्या व्यसनापायी आतून पूर्ण खोकडा झाला होता. बोडख्या बाभळीगत पार कंबरातून वाकला होता.

खोकल्याची उबळ अनावर झाली, जिवाच्यावर गेली की त्याला कसस व्हायचं अन् तो आपल्या बायकोला जी आठ-दहा महिन्यांपूर्वी गावातल्या एका गड्यासोबत पळून गेली. होती तिच्या नावाचा उद्दार करायचा. 

ऐन तारुण्यात त्याला हे बायको असूनही नशिबाला आलेलं विदुरपण सहन होत नव्हते. पण; आपल्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या आईकडे बघून तो तिचा आधार अन् ती त्याचा आधार बनून कसेतरी आले दिवस काढत होते.

गावातल्या त्याच्या वयाच्या मित्रांच्या संगतीने त्याचा दिवस सहज कलून जायचा. पण; त्याची प्रत्येक रात्र त्याला वैऱ्याची वाटायची. मग कधीतरी सावत्या माळ्याच्या देवळात, कधी गावच्या एकांगाला असलेल्या धोंडी बाबांच्या आश्रमात तर कधी लक्षी आईच्या पिंपळ पारावर तो झोपून जायचा.

रात्र सरली की पहाटेच उठून नदीच्या एकांगगाला तो भटकायचा. शिवा तात्याच्या वावरात असलेल्या नदीच्याकडेला असलेल्या पायऱ्यांवर बायका धुणे धुवायला यायच्या आत तो अंघोळपाणी करून महादेवाच्या मंदिरात देवपूजा करायला बसायचा..!

मध्य रात्र कलून गेली दीड-दोन झाले तेव्हा कुठे रामा कुंडूरचे डोळे लागायला लागले अन् तो संतू अण्णा तलाठीच्या बाजूलाच पारावर अंग टाकून देत त्याच्या बायकोच्या नावाचा उध्दार करत झोपी गेला.

त्याच्या जवळ खेळणारी कुत्रे पाराच्या चहूबाजूने असणाऱ्या लाल मातीत खेळली खेळली अन् तिथेच मातीची होऊन मातीत झोपून गेली. गावच्या पाटलीन बाईचं मडं जळून कधीच कोळसा झालं होतं.

स्मशानातील लांडगे, व्होलगे उंच उंच आवाज करत गावच्या सलग असलेल्या डोंगराच्या दाट अरण्यात गेली अन् मोठ्यानं इवळू लागली होती. गावापर्यंत त्यांच्या इवळण्याचा आवाज येत होता, संतू अण्णा तलाठी इकडची कूस तिकडे करीत झोपण्याचा प्रयत्न करत होता. रामा कुंडूर आता निवांत झोपी गेला होता. सारं गाव लुटून नेल्यागत शांत शांत पहुडलं होतं..!

भारत लक्ष्मण सोनवणे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड